Headlines

पंढरीत डाळिंबाची आवक वाढल्याने दरात निम्म्याने घट:नाईलाजाने मिळेल त्या‎दराने डाळिंबाची विक्री‎

दिल्ली परिसरात पाऊस झाल्याने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ दिवसांत डाळिंबाची आवक वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर सरासरी १०० रुपये प्रतिकिलो घसरले आहेत. सध्या डाळिंबाचा दर किमान ४० ते कमाल १२० रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. डाळिंबाचे घटलेले क्षेत्र वाढत आहे. शिवाय दिल्ली परिसरात झालेल्या पावसाचा परिणामही दरावर झाला….

Read More

मेहूणबारे:मेहुणबारे येथे मध्यरात्री सहा बंद घरांमध्ये चोरी

चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल ६ बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील ६१ हजार ६०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह इतर घरांमधून ऐवज लांबवला आहे. येथील रहिवासी निर्मला यशवंत महाजन (वय ४८) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा मध्यरात्री १.३० ते सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात…

Read More

महामार्गावरील अपघातामध्ये गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू:कन्नड रुग्णालयावर नातेवाइकांचा तीव्र संताप‎

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नड शहरालगत रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा कन्नड ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारामुळे, वेळेवर रुग्णवाहिका व ऑक्सिजन न मिळाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. गारगोटी (ता. कन्नड) येथील सुभाष मूलचंद राठोड (४०) हे दुचाकीने (एमएच २० ईडब्ल्यू ७२७१) छत्रपती संभाजीनगरकडून कन्नडकडे येत असताना एका ट्रकने अचानक वळण घेतल्याने अपघात…

Read More

विकासाला गती:लासलगावसह 5 गावांना एकत्र करत नगरपरिषद निर्मितीचा प्रयत्न

लासलगाव, टाकळी विंचूर, पिंपळगाव नजीक, ब्राह्मणगाव व निमगाव वाकडा ही गावे एकत्र करून लासलगाव नगरपरिषद निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपरिषद झाल्यास मोठी शासकीय यंत्रणा उपलब्ध होण्याबरोबरच विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळून लासलगाव व परिसराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. लासलगाव येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात…

Read More

कीर्तन सप्ताह:मनुष्याने सर्व धर्म समभावाची भावना ठेवून देश व धर्मासाठी द्यावे योगदान

मानवी देह म्हणजे केवळ काळाचे धन आहे. कुबेराची संपत्ती जरी अथांग असली, तरी या नश्वर देहावर व भौतिक सुखांवर मानवाचा खरा अधिकार कितीसा आहे? शेवटी हा देह मातीत जाणार आहे, त्यामुळे वेळेतच सावध होऊन संसाराच्या मोहातून मुक्त झाले पाहिजे. आणि कर्तव्य म्हणून समाजासाठी शक्य ते योगदान दिले पाहिजे, असा उपदेश कृष्णा महाराज कमानकर यांनी केला….

Read More

सुरक्षेच्या साहित्याअभावी कामगाराचा झाला मृत्यू:दोघांविरुद्ध पैठण पोलिसांत गुन्हा दाखल‎

जायकवाडी धरण परिसरातील इसारवाडी शिवारात डीएमआयसी-बिडकीन पाइपलाइनच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षा साहित्य न पुरवल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी पैठण एमआयडीसी ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नकुल बाबासाहेब शेळके (३३, रा. बोरगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदार विठ्ठल भानुदास अवधुत आणि दत्ता विठ्ठल अवधुत (दोघे रा. बोरगाव, ता. पैठण) यांच्यावर निष्काळजीपणाचा…

Read More

शेतकऱ्यांची चिंता वाढली:पावसाचा तिसरा महिना संपत आला तरी फुलंब्री तालुक्यात केवळ 29% पाऊस

ऑगस्ट महिना संपत आला तरी फुलंब्री तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. तालुक्यात आतापर्यंत मोसमाच्या सरासरीच्या अवघा २९ टक्के पाऊस झाला असून, ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकांनी मान टाकली आहे. पाण्याअभावी ५६ हजार हेक्टरवरील खरीप पिके सुकू लागली आहे. तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना एकदाही मोठा पूर आला नाही. परिणामी…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:विधानसभेत विजयाच्या फरकापेक्षा कट होणारे मतदार 30 ते 460 पट जास्त; 2029 च्या विधानसभेला 288 पैकी किमान 120 मतदारसंघांत ‘एसआयआर’ प्रभावी ठरण्याची शक्यता

निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत राज्यातील २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांचा १८ ऑगस्ट रोजी जारी एसआयआरचा डेटा असे सांगत आहे की, वगळल्या जाणाऱ्यांचा मुद्दा किमान १२ . २०२४ मध्ये २२ मुस्लिम मबहुल मतदारसंघांत महायुती १३ जागी विजयी एसआयआरमुळे २२ प्रमुख मुस्लिमबहुल मतदारसंघांचे चित्र बदलणार असे…

Read More

अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी जाहीर:23 ऑगस्टपासून नोंदणी सुरू, अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम संधी

शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे. संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 15,52,678 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 13,43,418 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले…

Read More

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का!:माजी महापौर विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, शिंदे गटाला लॉटरी लागण्याची शक्यता

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, दादर परिसरातील नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. पालघर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले हे जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिले नसल्याचे जातपडताळणी समितीने नमूद केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार निर्माण झाली असून, त्यांच्या पदाबाबतचा अंतिम निर्णय पालिका…

Read More