Headlines

महिनाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार:पिकनुकसानीची भरपाईही मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्त्वाची माहिती

“राज्यातील कर्जमाफीबाबतच्या सर्व माहितीचे संकलन पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या एक महिन्याच्या आत यावर अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली…

Read More

वादग्रस्त होर्डिंग धोरण पुन्हा येणार:प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू, भाजपच्या निर्णयानंतरही प्रस्ताव

पुणे शहरात वादग्रस्त ठरलेले होर्डिंग धोरण पुन्हा नव्याने आणण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांच्यात या धोरणावरून वाद झाला होता. भाजपने पक्षस्तरावर हे धोरण पुढे न नेण्याचा निर्णय घेतला असतानाही प्रशासकीय स्तरावर नव्याने प्रस्ताव तयार केला जात आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी…

Read More

धार्मिक कार्यासाठी कुणी पॅनकार्ड देतं का?:खोटं बोलण्याचा निगरगट्टापणा आणतात कुठून? चाकणकरांच्या दाव्यावर सुषमा अंधारे सवाल

समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) प्रतिभा चाकणकर यांची प्रदीर्घ चौकशी केली. “धार्मिक कामाच्या नावाखाली आम्ही अशोक खरातला कागदपत्रे दिली आणि फसलो,” असा दावा प्रतिभा चाकणकर यांनी चौकशीदरम्यान केला आहे. मात्र, त्यांचा हा दावा हास्यास्पद असून “खोटं बोलण्यासाठी एवढा निगरगट्टापणा आणतात तरी कुठून?” अशा शब्दांत सुषमा अंधारे…

Read More

राऊतांनी पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवावी, त्यांच्यामुळेच उबाठा'ला अश्व लागले:ममता-स्टॅलिन घरी गेले, 'इंडिया' आघाडीत आता फक्त काँग्रेसच शिल्लक- नवनाथ बन

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ‘इंडिया’ आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आघाडीला बाजूला सारून निवडणूक लढवली, मात्र या निकालांनी आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आणल्याचे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टॅलिन हे उद्धव ठाकरेंचे जवळचे मित्र होते. मात्र, जनतेने या…

Read More

संभाजीनगरमध्ये गॅस टंचाई:तापमान 40 च्या पुढे असताना रणरणत्या उन्हात सिलिंडरसाठी रांगा, अनेकांच्या तब्बल 35 किमीवरून रोज फेऱ्या

छत्रपती संभाजीनगरमधील लोकांना पुन्हा गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय. शहराचे तापमान तब्बल 40 अंशाच्या पुढे जात आहे. मात्र, अशा रणरणत्या उन्हात लोकांना दिवसभर गॅस सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय. सरकार आणि प्रशासनाने लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळित करावा. सिलिंडर घरपोच द्यावे, अशी मागणी होतेय. अमेरिका आणि इराण युद्धामुळे शहरात…

Read More

हिंगोलीत अंगावर हळद लागण्यापूर्वीच भावी नवरदेवाची आत्महत्या:सेनगाव तालुक्यातील वाघजाळी गावावर शोककळा

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे अंगावर हळद लागण्यापुर्वीच भावी नवरदेवाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ता. 5 सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तर एकुलता एक मुलगा गेल्याने गांधीले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील आनंद हरिभाऊ…

Read More

एकनाथ शिंदेंकडून मंत्रिमंडळात बदलांचे संकेत:मंत्र्यांची धाकधूक वाढली! दिवाळीपूर्वी फेरबदल, नव्या चेहऱ्यांना मोठी संधी

राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य बदलांमुळे सध्या मंत्रिपदावर असलेल्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता…

Read More

धार्मिक कामाच्या नावाखाली आधार-पॅन दिलं आणि फसलो:ईडी चौकशीत प्रतिभा चाकणकरांचा स्फोटक दावा, खरातवर गंभीर आरोप

समता नागरी सहकारी पतसंस्थेतील मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीची कारवाई अधिक तीव्र झाली असून, रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीत धक्कादायक दावे समोर आले आहेत. धार्मिक कामासाठी दिलेल्या आधार-पॅन कार्डचा गैरवापर करून बनावट खाती उघडल्याचा आरोप त्यांनी अशोक खरातवर केला आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. समता नागरी…

Read More

हुंड्यासाठी महिला डॉक्टरचा बळी; लग्नानंतर दीड वर्षात संपवले जीवन:फ्लॅट घेण्यासाठी 12 लाखांची मागणी,पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा‎

नवी मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १२ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका २६ वर्षीय महिला डॉक्टरने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. डॉ. गौरी सुनील चौरे (दळवी) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. २ मे रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी…

Read More

कस्तुरीचा "आत्मजागर'' सोहळा:कामगार दिन श्रमाची प्रतिष्ठा, सन्मान करण्याचा दिवस- पाठक, निराधार महिलांना शिलाईमशिनचे वितरण‎

कस्तुरी या सेवाभावी संस्थेने कामगारांप्रती आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी “आत्मजागर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत समाजातील २० निराधार व गरजू कामगार महिलांना स्वयंसिद्ध करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यात आत्महत्या, आकस्मिक आजार व इतर कारणांमुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या पत्नी, परित्यक्ता व काही गरजू महिला कामगारांचा समावेश होता. जागतिक कामगार दिन हा जगभरातील सर्व…

Read More