मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईल:सरकारच्या बुडाखाली आग लावणारे आंदोलन असेल, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा
“माझे पाच दिवसांचे अन्नत्याग आंदोलन कोणत्याही आमदारकी किंवा खासदारकीच्या स्वार्थासाठी नव्हते, तर राज्यातील पिचलेल्या बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक बैठकीच्या आश्वासनानंतर मी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा किंवा आम्हाला गृहित धरण्याचा प्रयत्न केला, तर गावागावांतील शेतकरी हातात गोफण घेऊन रस्त्यावर…