Headlines

NEET UG Scorecard Controversy; Beed Student Moves High Court


देशभरात ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षेतील कथित गैरव्यवहारावरून वाद सुरू असतानाच आता हा मुद्दा न्यायालयातही पोहोचला आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी शुभम नितीन गवते याने आपल्या निकालातील गंभीर तफावत असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभा

.

निकालात मोठी तफावत असल्याचा आरो

याचिकाकर्त्याचे वकील अॅड. महेंद्र गंडले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 16 जुलै रोजी एनटीएने NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला. निकालानंतर विद्यार्थ्याने स्वतःची OMR शीट आणि अधिकृत उत्तरतालिका तपासली असता त्याला 522 गुण मिळणे अपेक्षित असल्याचे दिसून आले. मात्र, एनटीएने जारी केलेल्या स्कोअरकार्डमध्ये त्याला केवळ 95 गुण देण्यात आले आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून आणि पुराव्यांवरून त्याच्या दाव्यात तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

एनटीएकडे सात वेळा तक्रार, प्रतिसाद नाही

शुभम गवतेने निकालातील तफावत लक्षात आल्यानंतर एनटीएकडे सात वेळा ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली. तसेच अनेक वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. एनटीएकडून ई-मेलला 16 तासांच्या आत उत्तर देऊन तक्रारीचे निराकरण करू, असे सांगण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे.

न्यायालयात काय मागणी?

याचिकेद्वारे विद्यार्थ्याने आपल्या निकालाची फेरतपासणी करावी, गुणांमधील कथित तफावतीची चौकशी करावी आणि न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात न्यायालयासमोर उपलब्ध कागदपत्रे आणि पुरावे सादर करून विद्यार्थ्याची बाजू मांडण्यात येणार असल्याचे अॅड. महेंद्र गंडले यांनी स्पष्ट केले.

23 जुलैला सुनावणी

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने याचिकेची 23 जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे. या सुनावणीत न्यायालय कोणते निर्देश देते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

देशभरात अशीच आणखीही प्रकरणे

18-18 तास अभ्यास अन् पदरी फक्त 87 गुण; ज्ञानेश्वरीच्या स्वप्नांचा चक्काचूर!

बीडच्या वडवणी येथील हुशार विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी अनिलकुमार पवार हिची व्यथा कोणत्याही विद्यार्थ्याचे काळीज पिळवटून टाकणारी आहे. वर्षभर जेवणाची आणि झोपण्याची पर्वा न करता ज्ञानेश्वरीने रोज 18 ते 18 तास अभ्यास केला होता. ती टॉपरच्या शर्यतीत होती.

पुन्हा परीक्षा झाल्यानंतर जेव्हा तिने अधिकृत अन्सर की तपासली, तेव्हा तिला 720 पैकी तब्बल 702 गुण मिळत होते. तिने दिल्लीच्या प्रतिष्ठित ‘एम्स’ (AIIMS) रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले होते.

परंतु, जेव्हा स्कोअर कार्ड हातात आले, तेव्हा त्यावर अवघे 87 गुण पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या निकालामुळे ज्ञानेश्वरी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत.

“माझ्या मुलीला मुळात चुकीची ओएमआर (OMR) शीट जोडली गेली आहे. आम्ही पूर्ण पुराव्यानिशी सांगतोय की तिच्यावर अन्याय झाला आहे. ‘एनटीए’ने आम्हा सर्व पालकांना ओएमआर शीट लाईव्ह दाखवावी,” अशी आर्त मागणी तिची आई मीरा पवार यांनी केली आहे.

सोहमचीही तीच कहाणी; 522 गुणांवरून थेट 95 वर घसरण!

असाच धक्कादायक प्रकार बीडच्या सोहम नितीन गवते या विद्यार्थ्यासोबतही घडला आहे. कोणत्याही महागड्या खासगी शिकवण्या किंवा क्लासेस न लावता केवळ स्वतःच्या हिंमतीवर अभ्यास करणाऱ्या सोहमला अन्सर की नुसार 522 गुण मिळत होते. आपला वैद्यकीय शाखेतील प्रवेश निश्चित मानणाऱ्या सोहमला जेव्हा ‘एनटीए’ने ई-मेलवर स्कोअर कार्ड पाठवले, तेव्हा त्यावर अवघे 95 गुण होते. हा निकाल पाहिल्यापासून सोहम कमालीच्या मानसिक धक्क्यात असून, त्याने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. सोहमच्या पालकांनी आता या अन्यायाविरोधात थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा पवित्रा घेतला आहे.

‘एनटीए’च्या पारदर्शकतेवर देशपातळीवर प्रश्नचिन्ह; 2.79 लाख विद्यार्थ्यांची पाठ

हा केवळ तांत्रिक घोळ आहे की गुण घोटाळा? असा प्रश्न आता संपूर्ण देशातून उपस्थित होत आहे. कारण अन्सर की मधील गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये शेकडो अंकांचा फरक आहे. बीडमधील या दोन प्रकरणांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अशा कितीतरी विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला असण्याची भीती आहे. ‘एनटीए’वरील उडालेल्या विश्वासामुळेच यंदाच्या पुनर्ररीक्षेला तब्बल 2.79 लाख विद्यार्थी अनुपस्थित राहिले. नीट परीक्षेच्या इतिहासातील अनुपस्थितीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे, जो विद्यार्थ्यांमधील नैराश्य स्पष्ट करतो.

नीट पेपरफुटीचे सिंहावलोकन

नीट पेपरफुटीचे धागे यापूर्वीच लातूरपर्यंत पोहचले आहेत. शिवराज मोटेगावकरला अटक झाली. त्यामुळे लातूरचे नाव देशभरात बदनाम झाले. सूत्रांनुसार, मोटेगावकर आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अभ्यासात सरासरीपेक्षा चांगले असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत असे. पालकांशी करार झाल्यानंतर त्यांना नियमित बॅचमध्ये समाविष्ट केले जात असे. परीक्षेपूर्वी शेवटच्या 15 दिवसांत ‘वन-ऑन-वन मेंटरिंग कोर्स’ चालवला जात असे. पेपर मिळताच या विद्यार्थ्यांना प्रश्न-उत्तरे पाठ करून घेतली जात होती. सीबीआयला यासंबंधीचे अनेक व्हिडिओही मिळाले आहेत.

सीबीआयनुसार, मोटेगावकर अनेक वर्षांपासून पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमारे यांच्यामार्फत प्रा. पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांच्या संपर्कात होता. नेटवर्कमध्ये सामील असलेल्या गुरुग्रामच्या यश यादवने जयपूरच्या विकास बिवालला NEET चा पेपर विकला होता. त्याला हा पेपर नाशिकच्या शुभम खैरनारकडून मिळाला होता.

लातूरचा कोचिंग संचालक आधी पार्ट-टाइम शिक्षक, आज ₹1500 कोटींची संपत्ती

NEET पेपरफुटी प्रकरणात नवीन मोठे खुलासे झाले आहेत. CBI ला सुगावा लागला आहे की, गेल्या वर्षीही NEET चा पेपर परीक्षेपूर्वी महाराष्ट्रातील लातूर येथील रेणुकाई करिअर सेंटर (RCC) पर्यंत पोहोचला होता. कोचिंग संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकरची पेपरफुटी नेटवर्कशी जुनी संगनमतही समोर आली आहे. त्याची एकूण संपत्ती ₹1500 कोटी सांगितली जात आहे.

भास्करने या कोचिंगमध्ये शिकणाऱ्या NEET 2025 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. यात 19 विद्यार्थ्यांचे AIIMS मध्ये सिलेक्शन झाले होते. 2 विद्यार्थ्यांचे AIIMS दिल्लीत, 5 विद्यार्थ्यांचे हैदराबादमध्ये आणि प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांचे भोपाळ व वाराणसी AIIMS मध्ये सिलेक्शन झाले. नागपूर, देवघर, गोरखपूर, राजकोट, रायपूर आणि मंगलगिरी AIIMS मध्येही प्रत्येकी एक-एक विद्यार्थी पोहोचले.

या संदर्भातील ही देखील बातमी वाचा

NEET UG 2026:’नीट’च्या निकालात गुणांचा घोटाळा; ‘अन्सर की’मध्ये अव्वल, पण स्कोअर कार्डवर विद्यार्थी थेट ‘फेल’च्या उंबरठ्यावर, आता कोर्टात जाण्याच्या तयारीत

देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या ‘नीट यूजी 2026’ (NEET UG 2026) परीक्षेचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषण सुरू केले आहे, तर दुसरीकडे ‘एनटीए’ने (NTA) जाहीर केलेल्या पुनर्परीक्षेच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.