Headlines

कानपूर-वडिलांनी जुळ्या मुलींची हत्या केली, तेथेच बसून राहिला:फोन करून पोलिसांना बोलावले, अधिकारी पोहोचले तेव्हा पत्नी म्हणाली- याला आताच फाशी द्या

कानपूरमध्ये रविवारी पहाटे 45 वर्षीय वडिलांनी आपल्या 11 वर्षांच्या जुळ्या मुलींची हत्या केली. वडिलांनी खोलीत मुलींचा गळा चिरला. नंतर मृतदेहाजवळच बसून राहिला. स्वतः पोलिसांना फोन केला. तो म्हणाला – मी माझ्या मुलींना मारले आहे. तुम्ही लोक या. पोलिस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता. पोलिसांनी बेल वाजवली तेव्हा पत्नीने दरवाजा उघडला. पोलिसांना पाहून…

Read More

आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा:अहिल्यानगरमधील घटना, केमिकल्सने आंबे पिकवल्याचा संशय

मुंबईत गेल्या महिन्यात कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातूनही अशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शेवगाव येथे आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा झाली आहे. हे आंबे कृत्रिमरीत्या धोकादायक केमिकल्स वापरून पिकवले असल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त…

Read More

संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट:माझगाव न्यायालयाचा निर्णय; प्रत्यक्ष कोर्टात राहून जामीन घ्यावा लागणार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीत मोठी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर नितेश राणे यांना आता प्रत्यक्ष…

Read More

खडकवासला धरण 76 टक्के भरले, मुठा कालव्यातून विसर्ग सुरू:पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली असून, मंगळवारी धरण 76 टक्के क्षमतेने भरले आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे नवीन मुठा कालव्यातून 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस आणि धरणात येणारा पाण्याचा वाढता ओघ पाहता, येत्या काही तासांतच…

Read More

लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले? सरकारने दिली आणखी एक मुदत:आता ई-केवायसी नाही केलं तर यादीतून नाव वगळणार

राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र, काही महिलांना पात्र असूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत. यामागे ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे मुख्य कारण समोर आले आहे. त्यामुळे आता…

Read More

सियाने मित्राला सांगितले होते – लग्न जे होणार नाही:स्नॅप चॅट समोर आले; केतनच्या हत्येच्या 24 दिवसांपूर्वी बोलणे झाले होते

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी मंगेतर सियाची स्नॅपचॅटवर एका मैत्रिणीसोबतची चॅटिंग व्हायरल होत आहे, ज्यात लिहिले आहे- हे लग्न होणार नाही. या ओळीमुळे केतन खून प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, पोलिस या चॅटची चौकशी करत आहेत. २५ मे रोजीच्या चॅटमध्ये सिया आपल्या एका मित्राकडे लग्नाच्या बुकिंगसाठी आधार कार्ड मागते. पण यानंतर…

Read More

राऊतांना स्वतःची जागा वाचवण्यासाठी ठाकरेंचा पत्ता कट करायचा आहे:विधान परिषद ठाकरेंना, तर राज्यसभा काँग्रेसला असे सपकाळांनी ठणकावले- नवनाथ बन

मविआमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात सांगितले की आता विधान परिषद तुम्हाला हवी असेल तर येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय आताच घ्यावा लागेल. विधान परिषद जर तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल असे त्यांनी ठणकावत सांगितले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

'शांत मन – द सीक्रेट ऑफ लाईफ' पुस्तकाचे प्रकाशन:मनाची शांती समजण्यासाठी नैसर्गिक नाते गरजेचे – डॉ. संप्रसाद विनोद

आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी ‘मनाची शांती समजून घेण्यासाठी त्याच्याबरोबर नैसर्गिक नाते निर्माण करण्याची गरज’ असल्याचे मत व्यक्त केले. लेखक कौस्तुभ साबळे यांच्या ‘शांत मन – द सिक्रेट ऑफ लाईफ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. आयुष प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, प्रसिद्ध नाटककार डॉ….

Read More

अमृतसरमध्ये 12वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या:मरण्यापूर्वी व्हिडिओ बनवला, म्हणाली- प्रिन्सिपलने छळ केला, वेगळ्या खोलीत घेऊन गेली

अमृतसरमध्ये 12वीच्या एका विद्यार्थिनीने विषारी पदार्थ गिळला. तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मरण्यापूर्वी विद्यार्थिनीने रुग्णालयात एक व्हिडिओ देखील बनवला होता. ज्यात तिने सांगितले की, तिला शाळेच्या फीसाठी खूप मानसिक त्रास दिला गेला. यासाठी मुख्याध्यापिका तिला वेगळ्या खोलीतही घेऊन गेल्या होत्या. यामुळे ती त्रस्त होती, म्हणूनच तिने हे पाऊल…

Read More

वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण:अधिकारी म्हणतात – शेतकऱ्याचे नुकसान नाही, जास्तीत जास्त विमा मिळविण्यासाठी प्रयत्न

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण चांगलेच तापू लागले असून या प्रकरणात आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात अधिकारी मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत असून शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जास्तीत जास्त विमा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे गोदाम भाडेतत्वावर घेतांना योग्य…

Read More