Headlines

सिल्लोडमध्ये ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम:10 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प, ‘वृक्षवल्ली टीम सिल्लोड’च्या वतीने श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात उपक्रम‎

वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने केवळ झाड न लावता त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे, याच उद्देशाने येथील ‘वृक्षवल्ली टीम सिल्लोड’च्या वतीने १०,००० वृक्ष लागवडी . कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. या प्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक निशांत म्हस्के होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

राजस्थानच्या जैसलमेर-जयपूरमध्ये वाळूच्या वादळाचा इशारा:पाऊस आणि वादळामुळे मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमध्ये उष्णता कमी झाली, तापमान 40°C च्या खाली

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, छत्तीसगड, बिहार आणि ओडिशा राज्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. या राज्यांमध्ये तापमान ४०°C च्या खाली आले आहे. मात्र, महाराष्ट्रातील विदर्भ भागात तापमान अजूनही ४४°C पेक्षा जास्त आहे. शनिवारी चंद्रपूर (चांदा) देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. येथे तापमान ४४.८°C नोंदवले गेले. याव्यतिरिक्त…

Read More

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून घरी परतत होते 4 मृत

हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. अपघाताशी संबंधित एक लाइव्ह व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आनी येथील दिगेढ शाळेतील हिंदी शिक्षिका आशा यांनी बनवला असल्याचे सांगितले जात आहे….

Read More

"ही कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली योजना", राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप:जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफीची तहसीलदारांमार्फत शासनाकडे मागणी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या चांदूर रेल्वे येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी तहसीलदार पूजा माटोळे यांची भेट…

Read More

MIT एडीटीने विकसित केले देशातील सर्वात मोठे आरसी विमान:९.२५ मीटर विंगस्पॅन, २६१ किलो वजन; रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी संशोधन आणि एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या ‘टीम स्कायट्रेक’ने ‘प्रोजेक्ट गरुडा’ अंतर्गत भारतातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या विकसित केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर:नर्मदा प्रकल्पावरील महत्त्वाच्या बैठकीला उपस्थिती, मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू

राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर लक्ष ठेवत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकींना ते उपस्थित राहणार असून, विशेषतः नर्मदा प्रकल्पासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत ते सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजता नर्मदा प्रकल्पाबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहतील. याशिवाय दिल्ली…

Read More

अन्नामलाई भाजप नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना:नवीन पक्षाच्या चर्चांवर बोलले- दोन दिवसांनी बोलू; भाजपचा झेंडा नसलेल्या गाडीत दिसले

तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई सोमवारी दिल्लीला रवाना झाले. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, ते भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेऊ शकतात. त्यांच्या नवीन राजकीय पक्ष स्थापनेच्या चर्चा सुरू असतानाच हा दौरा होत आहे. चेन्नई विमानतळावर त्यांना भाजप सोडण्याबद्दल आणि नवीन पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आले. यावर ते म्हणाले – ‘वाट बघा. दोन दिवसांनी बसून बोलूया.’…

Read More

अवैध व्यवसाय बंद करा; अन्यथा मोर्चा:दहीहंडा विकास मंचाचा इशारा, पोलिस प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन‎

ऐतिहासिक, सामाजिक आणि क्रांतिकारी वारसा लाभलेल्या दहीहंडा परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी दहीहंडा विकास मंचाने पोलिसांकडे केली आहे. याबाबत मंचाने ठाणेदार गोपाल ढोले यांना निवेदन सादर केले. अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मंचाने दिला आहे. आज खुलेआम वरली मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर अवैध…

Read More

भारत फोर्ज विशाखापट्टणममध्ये मरीन गॅस टर्बाइन केंद्र उभारणार:नौदलाच्या स्वावलंबनासाठी खासगी क्षेत्रातील पहिले दुरुस्ती आणि विकास संकुल

पुण्यातील ‘भारत फोर्ज लिमिटेड’ने आंध्र प्रदेश सरकारसोबत एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या करारानुसार, विशाखापट्टणम येथे ‘आंध्र प्रदेश डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉरिडॉर’मध्ये सुमारे ८० एकर जागेत मरीन गॅस टर्बाइनची (एमजीटी) दुरुस्ती, ओव्हरहॉल आणि स्वदेशी विकास संकुल उभारले जाईल. भारतात खासगी क्षेत्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे, जो नौदलाच्या स्वावलंबनाला बळ देईल. पुट्टपर्थी येथे आयोजित…

Read More

पानगव्हाणला ग्रामस्थांकडून एसटी बसचे स्वागत:78 वर्षांनंतर गावात पहिल्यादाच महामंडळाच्या लालपरीचे आगमन‎

ग्रामीण भागातील प्रवाशांची वाढती मागणी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या प्रयत्नांमुळे वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण ग्रामस्थांचे अनेक दशकांचे स्वप्न साकार झाले आहे. पानगव्हाण गावातून ७ जुलै रोजी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बसची अधिकृत फेरी सुरू झाली. ७८ वर्षांनंतर गावात लालपरीचे आगमन झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. गावातून थेट बस सेवा सुरू झाल्यामुळे पानगव्हाण येथून वैजापूर…

Read More