Headlines

नवी मुंबईत भीषण अपघात:तळोजामध्ये सुसाट कारने 10 जणांना दिली धडक; 2 ठार, 8 जखमी, चालक फरार

नवी मुंबईतील तळोजा परिसरात सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. तळोजा सेक्टर 10 येथे भरधाव कारने रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नियंत्रण सुटले, भरधाव कारने उडवले प्राथमिक माहितीनुसार, तळोजा सेक्टर 10 परिसरातून…

Read More

UP मधील बांदा सलग दुसऱ्या दिवशी सर्वात उष्ण, तापमान 45.6°C:राजस्थानमध्ये धुळीचे वादळ, उष्णतेपासून दिलासा नाही; उत्तराखंड-हिमाचलमध्ये गारपीट

देशातील अनेक शहरे उष्णतेच्या लाटेच्या (हीटवेव) विळख्यात आहेत. बहुतेक भागांमध्ये तापमान 40-46°C च्या दरम्यान आहे. मंगळवारीही उत्तर प्रदेशातील बांदा हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे पारा 45.6°C नोंदवला गेला. याशिवाय, ओडिशातील झारसुगुडा येथे 45.3°C, महाराष्ट्रातील अकोला, वर्धा आणि अमरावती येथे 45°C पेक्षा जास्त तापमान होते. भीषण उष्णता आणि उष्माघातापासून वाचवण्यासाठी प्रयागराजमध्ये जागोजागी वॉटर एटीएम…

Read More

29 वाहन धारकांना 2 लाख 90 हजाराचा दंड:अवैध वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर‎‎

शहरात वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून मंगळवारी २६ मे रोजी विशेष धडक मोहीम राबवण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २९ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित वाहनधारकांकडून एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात काही दिवसांपासून नियमबाह्य पद्धतीने…

Read More

मध्यरात्री इम्तियाज अली यांचे अपहरण झाले होते:कॉलेजच्या दिवसांबद्दल दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाले- पोस्टर काढल्यामुळे टोळीने केले होते अपहरण

चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांतील एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. समदिश भाटिया यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, दिल्लीत शिक्षण घेत असताना वसतिगृहाच्या भिंतीवरून एक राजकीय पोस्टर काढण्यावरून त्यांचा स्थानिक टोळीशी वाद झाला होता. यानंतर टोळीतील लोकांनी मध्यरात्री त्यांना वसतिगृहातून पळवून नेले होते. मात्र, नंतर एका अनपेक्षित घटनेनंतर ते सुखरूप बाहेर पडण्यात…

Read More

धुरंधर चित्रपटातील एसपी असलम यांच्या पत्नी दिग्दर्शकावर नाराज:म्हणाल्या– बलुचांशी शत्रुत्व नव्हते, न रहमान डकैतला घाबरले; आदित्य धरवर खटला भरणार

पाकिस्तानच्या ल्यारीवर आधारित बॉलिवूड चित्रपट ‘धुरंधर’मध्ये संजय दत्तने पाकिस्तानच्या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. या अधिकाऱ्याचे नाव चौधरी असलम आहे, ज्यांना पाकिस्तानचे सुपरकॉप असेही म्हटले जाते. चौधरी असलम पाकिस्तान पोलिसात एसपी पदावर कार्यरत होते. सिंध पोलिसात काम करत असताना त्यांनी 2009 मध्ये ल्यारीतील सर्वात कुख्यात रहमान डकैतचाही एन्काउंटर केला होता. सुमारे चार वर्षांनंतर कराचीमध्ये…

Read More

सूर्याचा प्रकोप!:अकोला अन् कलबुर्गी ठरली जगातील सर्वाधिक उष्ण शहरे, पारा 44 अंशांवर

राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून सूर्याच्या प्रखर किरणांनी नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट असताना विदर्भावर मात्र सूर्याची विशेष वक्रदृष्टी पाहायला मिळत आहे. अकोला शहरात सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, जागतिक नकाशावरही अकोल्याने मंगळवारी उष्णतेचा उच्चांक गाठला. ‘एल्डोराडो’ या जागतिक हवामान संकेतस्थळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी अकोला आणि…

Read More

रक्ताच्या नात्याला काळिमा:जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काटा काढला; चाकूने सपासप वार करून हत्या

धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरात माणुसकीला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका सख्ख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षांच्या पुतण्याचा खून केला आहे. विलास शेळके असे आरोपीचे नाव असून त्याने सुजित शेळके या तरुणावर चाकूने वार करत जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके आणि त्याचा पुतण्या सुजित शेळके यांच्या कुटुंबात जमिनीच्या व्यवहारावरून…

Read More

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:हा सरकारी तिजोरीचा अपहार, योजना राबावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- संजय राऊत

महाराष्ट्रात गाजलेली लाडकी बहीण योजनेत जवळपास 80 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मत विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा हा उघड उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. संजय राऊत म्हणाले, साधारण…

Read More

सेंद्रीय, नैसर्गिक शेती करणाऱ्या 20 शेतकऱ्यांवर कौतुकाची थाप:कृषी दिनानिमित्त कृषी विभागाकडून सन्मान, जिल्हा परिषदेत कार्यक्रम‎

नैसर्गिक व सेंद्रीय पद्धतीने शेती करुनसुद्धा कधीही तोटा न होऊ देणाऱ्या जिल्ह्यातील २० गुणी शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे,…

Read More

पाऊसमान अकोल्यातील मुळा खोऱ्यात आनंद! आंबित ओव्हरफ्लो:गतवर्षीपेक्षा महिनाभर उशीर, तरीही प्रथम भरण्याचा मान कायम

अकोले तालुक्याच्या मुळा खोऱ्यातील दुर्गम आदिवासी भागासाठी रविवार, २८ जूनचा दिवस मोठा आनंदाचा ठरला. मुळा नदीवरील अंबित लघुपाटबंधारे जलाशय पूर्ण १९१ दशलक्ष घनफूट क्षमतेने भरून सकाळी सांडव्यावरून ओव्हरफ्लो झाला. यंदा मान्सूनने सुरुवातीला ओढ दिली असली, तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने अंबित जलाशय तुडुंब भरल्याने संपूर्ण मुळा नदीखोऱ्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे. अकोले तालुक्यातील सर्व…

Read More