सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस:मी पाणी सोडायला विरोध करताय हा सत्ताधाऱ्यांचा प्रचार अत्यंत बालिशपणाचा- शशिकांत शिंदे
सातारा जिल्ह्यातील धरणांची घटती पाणी साठवण क्षमता, कालव्यांची दुरवस्था आणि जिहे-कटापूर योजनेतील विस्कळीत नियोजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी आमदारांवर आणि सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस आहे, असा गंभीर आरोप त्यांनी बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. शशिकांत शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील धरणांमध्ये…