Headlines

चेन्नईमध्ये प्रवाशाने धावत्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला:विमान धावपट्टीवरून टर्मिनलकडे जात होते, पायलटने तात्काळ थांबवले; आरोपीला अटक

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी लँडिंगदरम्यान एअर अरेबियाच्या धावत्या विमानात एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला. हे विमान शारजाहहून चेन्नईला पोहोचले होते आणि त्यात 231 प्रवासी होते. ही घटना सकाळी सुमारे 3:23 वाजता घडली. एअरबस A320 मॉडेलचे G9 471 क्रमांकाचे विमान धावपट्टीवरून टर्मिनलकडे जात होते. घटनेनंतर वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले आणि विमानतळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर…

Read More

अपघातात रिक्षाचालक ठार, मुलगी गंभीर जखमी:जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर हृदयद्रावक घटना

प्रतिनिधी | करमाड मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचालकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर घडली. तुलसी हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. सटाणा येथील राजू जिजा जगधने (३५) हे आपल्या रिक्षातून कौडगाव येथे मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जात…

Read More

राज्यात उष्णतेचा कहर अन् अवकाळीचा तडाखा:एकीकडे कडक उन्हाळा, दुसरीकडे विजांसह पाऊस; शेतकऱ्यांची वाढली चिंता

राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी तो 40 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या दुहेरी परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांसह विशेषतः शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच अवकाळी पावसामुळे पिकांचं…

Read More

संयम ऑलिंपियाडमध्ये हुजुरपागा प्राथमिक विद्यालय अव्वल:२६२ शाळांतील ९ हजार २८० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

पुणे शहर आणि परिसरात आयोजित संयम ऑलिंपियाड या स्पर्धेत कात्रज येथील हुजुरपागा प्राथमिक विद्यालयाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शनिवार पेठ, आणि बी.के.कामठे हायस्कूल, येवलेवाडी, यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, ताराचंद…

Read More

वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये पोहोचली:प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

वन नेशन-वन इलेक्शनच्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या संयुक्त संसदीय समितीने विविध राज्यांचा दौरा करून राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. प्रियंका गांधी, संबित पात्रा आणि बांसुरी स्वराज यांच्यासह समितीचे ३९ सदस्य आजपासून तीन दिवसांसाठी गुजरातमध्ये पोहोचले आहेत. जेपीसी सदस्य मंगळवारी संध्याकाळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे विचार जाणून…

Read More

क्यूआर कोड स्कॅन बंद; शहर ‘कचराकुंडी':स्वच्छता कंत्राटदाराकडून नियमाची पायमल्ली, स्वच्छता अभ्यास गटाने केली दंडाची शिफारस‎

शहरातील घराघरांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमानुसार स्वच्छता कंत्राटदाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या घंटागाड्या दररोज संकलन करतात की नाही, यावर वचक ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घर, वसाहतींमध्ये क्युआर कोड लावण्यात आले आहेत. परंतु, कमी मनुष्यबळ, मर्यादित घंटागाड्या आणि अपुऱ्या साहित्याची बाब दडवण्यासाठी स्वच्छता कंत्राटदार नियमांची पायमल्ली करीत क्युआर कोड स्कॅनच करीत नाहीत. कारण, ते आठवड्यातून केवळ एक किंवा…

Read More

नवी मुंबई विमानतळ वाद:नाव देण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, आता निर्णय सरकारच्या हाती!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज थेट फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे याचिकाकर्त्यांना मोठा कायदेशीर धक्का बसला असून, नामकरणाचा संपूर्ण चेंडू आता पुन्हा एकदा केंद्र आणि…

Read More

पुणे-वाराणसी 'अमृत भारत' एक्सप्रेसला मंजुरी:पुणे-जबलपूर रेल्वेही नियमित होणार, प्रवाशांची प्रतीक्षा संपली

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन ‘अमृत भारत’ रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहोळ यांना पत्र लिहून…

Read More

कांदा उत्पादकांना ₹2000 दर द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन:सासवडमध्ये काँग्रेसचा एल्गार; केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांदा आणि साखर उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत, कांदा उत्पादकांना किमान २००० रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला आहे. पुरंदर तालुका काँग्रेस आणि पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने सासवड येथील…

Read More

चांदी ₹3,754 ने वाढून ₹2.70 लाख किलो:या वर्षी ₹39 हजारने महागली; सोने ₹505 ने वाढले, 10 ग्रॅमची किंमत ₹1.59 लाख

आज म्हणजेच २५ मे रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५०५ रुपयांनी वाढून १.५९ लाख रुपये झाला आहे. तर, १ किलो चांदीची किंमत ३,७५४ रुपयांनी वाढून २.७० लाख रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी सोने २५ हजार आणि चांदी ३९ हजार रुपयांनी महागले यावर्षी…

Read More