ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग:15 प्रवासी थोडक्यात बचावले, बस पूर्ण जळून खाक; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सेटीस ब्रिजवर उभी असलेली ‘शिवशाही’ बस अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच बसमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले आणि आगीने भीषण रूप धारण केले. घटनेमुळे स्टेशन परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस ठाणे येथून पालघरमार्गे…