Headlines

केरळममध्ये फटाका कारखान्यात स्फोट, 13 जणांचा मृत्यू:10 मृतदेह सापडले, 3 लोकांच्या शरीराचे अवयव विखुरलेले आढळले; 40 मजूर काम करत होते

केरळममधील त्रिशूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी 3.30 वाजता फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या दुर्घटनेत 13 लोकांचा मृत्यू झाला. कारखान्यातील अनेक लोक भाजले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, घटनास्थळावरून 10 मृतदेह सापडले, तर 3 लोकांच्या शरीराचे अवयव सापडले. दुर्घटनेच्या वेळी शेडमध्ये सुमारे 40 लोक उपस्थित होते. अग्निशमन दल, पोलिस आणि…

Read More

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी बाप्पू मानकर बिनविरोध:अध्यक्षपदाची गाडी नाकारून वाचलेला निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारत, त्यातून वाचणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या…

Read More

आराध्याला सरप्राइज देण्यासाठी विमानतळावर पोहोचली ऐश्वर्या राय:मुलीच्या मित्रांसोबत व्हिडिओ आणि फोटो घेताना दिसली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्या आपली मुलगी आराध्या बच्चनला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली. आराध्या तिच्या स्कूल ट्रिपवरून परतली होती आणि ऐश्वर्याने विमानतळावर पोहोचून तिला सरप्राइज दिले. व्हिडिओमध्ये दिसते की, आराध्या विमानतळाबाहेर येताच ऐश्वर्या तिला पाहून खूप आनंदी झाली. तिने लगेच आपला फोन काढला आणि आपल्या मुलीचे फोटो आणि…

Read More

'पोलीस भरती' झाल्याचे सांगून तरुणाने वाटले पेढे:नऱ्हे येथे फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुणे, प्रतिनिधी: नऱ्हे येथील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटले आणि चौकात अभिनंदनाचे फलक लावले. नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. समाजात प्रभाव पाडण्यासाठी तरुणाने ही बतावणी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा….

Read More

CSMT स्थानकावर दोन लोकल आमनेसामने:मोठा अनर्थ टळला, स्टेशन मास्तर निलंबित; रेल्वे प्रशासनाची कारवाई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन लोकल एकाच ट्रॅकवर आमनेसामने आल्याची अत्यंत गंभीर घटना घडली असून, याप्रकरणी मध्य रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलत संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला असला, तरी प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड आणि संभाव्य धोक्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून ही मोठी…

Read More

गुजरातमध्ये 200 लोकांना अन्नातून विषबाधा:59 जणांना रुग्णालयात दाखल केले, लग्नात आंब्याचा रस प्यायल्यानंतर बिघडली तब्येत

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात लग्नादरम्यान अन्न विषबाधेमुळे (फूड पॉइझनिंग) 200 हून अधिक लोक आजारी पडले. त्यापैकी 59 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवार रात्रीची आहे. लग्नात 400 हून अधिक लोक उपस्थित होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जेवण सुरू झाले. काही लोकांच्या मते, आंब्याचा रस प्यायल्यानंतर तब्येत बिघडायला लागली. आजारी लोकांना तात्काळ जवळच्या सरकारी आणि…

Read More

संसाराची स्वप्ने राहिली अधुरीच:पाटणमध्ये पिकअप-दुचाकीच्या अपघातात नवदाम्पत्य ठार, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन नातेवाईकाच्या लग्नाला निघालेल्या नवदाम्पत्यावर काळाने भीषण झडप घातली आहे. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात राजू झोरे (वय २५) आणि राणी झोरे (वय २३) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. हातावरची मेहंदी आणि…

Read More

पैसे उकळणारे वाहतूक पोलिस निलंबित:पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांचे कारवाईचे आदेश

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी या निलंबनाचे आदेश दिले. समाजमाध्यमांवर या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे पोलिस हवालदार अंकुश रामा पवार आणि लक्ष्मण बालाजी रामगडे अशी…

Read More

सर्वोच्च न्यायालयाने विचारले- स्पर्श केल्याने देव अपवित्र कसे होतात:शबरीमलाचे वकील म्हणाले- भगवान अयप्पा ब्रह्मचारी, म्हणून पूजेची प्रथाही तशीच आहे

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाशी आणि धार्मिक भेदभावाशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने विचारले, ‘मूर्तीला स्पर्श करणे देवाचा अपमान कसा असू शकते आणि ते अपवित्र कसे होतात?’ सर्वोच्च न्यायालयाने विचारले, ‘संविधान त्या भक्ताच्या मदतीसाठी पुढे येणार नाही का, ज्याला केवळ त्याच्या वंशामुळे आणि जन्मामुळे देवतेला स्पर्श करण्यापासून रोखले जाते?’ यावर शबरीमलाचे वकील ॲडव्होकेट…

Read More

मराठीच्या सक्तीवरून रिक्षाचालक युनियन आक्रमक:4 मे पासून 15 लाख चालकांचा राज्यव्यापी संपाचा इशारा, 28 एप्रिलला अल्टिमेटम

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता मोठा पेच निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाच, रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने याविरोधात एल्गार पुकारला आहे. या नियमाच्या निषेधार्थ ४ मे पासून राज्यातील तब्बल १५ लाख रिक्षाचालक बेमुदत…

Read More