Headlines

पुण्यात 21 लाखांचे अमली पदार्थ जप्त:अंमली पदार्थ विरोधी पथकाची धानोरीत कारवाई, मूळ राजस्थानच्या दोन तरुणांना अटक

पुणे शहराच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (गुन्हे शाखा) ने धानोरी परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २१ लाख १३ हजार ७४८ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, राजस्थानमधील मूळ रहिवासी असलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला धानोरी येथील सिद्धार्थनगर भागात अमली पदार्थांची विक्री…

Read More

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहावे:प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांचे आवाहन, वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व बीएड दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी हजेरी लावली. प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत यांनी प्रास्ताविक केले. परिस्थिती कशीही असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवू नये….

Read More

पुण्याचा भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:खासदार वानखडेंसह अनेकांनी जाणून घेतले फुले दाम्पत्याचे कार्य

अमरावती येथे महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात सुरू केलेली मुलींची पहिली शाळा ‘भिडेवाडा’ चित्ररथाच्या माध्यमातून पोहोचली आहे. हा चित्ररथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्याजवळ थांबला आहे. गुरुवारी खासदार बळवंतराव वानखडे यांच्यासह अनेक नागरिकांनी या चित्ररथाला भेट देऊन फुले दाम्पत्याच्या कार्याची माहिती घेतली. महात्मा फुले यांच्या २०२६ मधील द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने हा उपक्रम…

Read More

समर्थनगर चालवणार संभाजीनगर:महापौर, सभापतीनंतर आता दोन स्वीकृत सदस्यपदे, भाजपचे 5, एमआयएमचे 3, तर शिवसेना (ठाकरे) व शिंदे गटाच्या प्रत्येकी एकाला संधी

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (20 एप्रिल) 10 स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार निश्चित झालेल्या कोट्यानुसार गटनेत्यांनी दिलेल्या बंद लिफाफ्यातील नावांची अधिकृत घोषणा महापौर समीर राजूरकर यांनी केली. राजपत्रात (गॅझेट) नावे प्रसिद्ध झाल्यानंतर या सर्व नवनियुक्त सदस्यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. नियुक्ती झाल्यानंतर मनपाच्या बाहेर डीजे आणि ढोल-ताशाच्या आवाजात जल्लोष साजरा…

Read More

सेवाकार्यात समाजाने सक्रिय सहभाग घ्यावा:'लता-आशा मंगेशकर' रुग्णालयाच्या कोनशिला समारंभात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी समाजाला सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होते, असे ते म्हणाले. खरी सेवा आपुलकीच्या भावनेतून निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात चांगुलपणा टिकून आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. भागवत पुणे जिल्ह्यातील नांदोशी येथे ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ…

Read More

अहिल्यानगरमध्ये 65 वर्षांच्या पित्याचा मुलाकडून खून:किरकोळ वादातून केले चाकूने वार, श्रीरामपूरमधील दत्तनगर येथील घटना

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात 1 मे रोजी रात्रीच्या सुमारास माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. किरकोळ कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसेत होऊन एका 30 वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह दत्तनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मेच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास 65…

Read More

आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून राजू शेट्टींनी सरकार घेरलं:म्हणाले- कायदा मोडून सत्ता टिकवता, मग आमचा लढा चुकीचा कसा?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकार नियम आणि कायदे पायदळी तुडवत सत्ता चालवत असेल, तर शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या न्यायासाठी सविनय कायदेभंग केला तर त्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा…

Read More

पुणे महापालिकेत निधी वाटपात भेदभाव:सुनेत्रा पवारांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; 'सबका साथ, सबका विकास'ची करून दिली आठवण

पुणे महानगरपालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात निधी वाटपावरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक निधी मिळाल्याचे समोर आल्यानंतर, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ची आठवण करून देत, “शहराचा…

Read More

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:पत्रकारितेतील लढवय्या आधारवड हरपल्याची भावना

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक लढवय्या, संघटक आणि अनेकांसाठी आधारवड ठरलेले नेतृत्व हरपल्याची भावना विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. उपस्थित मान्यवरांनी कै. भोईटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कै. प्रकाश भोईटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पत्रकार भवन येथे शनिवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. भोईटे हे पुणे श्रमिक…

Read More

अकोले येथील आदिवासींच्या बाळहिरड्याला कवडीमोल भाव:सरकारनिर्मित आर्थिक संकटात अडकलाय शेतकरी, हमीभावासाठी आंदोलनाची तयारी‎

तालुक्यातील दुर्गम भागात सध्या बाळहिरडा तोडणीचा हंगाम वेगाने सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप हमीभाव जाहीर न केल्यामुळे हक्काचा आर्थिक आधार असलेला हा बाळहिरडा स्थानिक व्यापाऱ्यांकडून अवघ्या १०० रुपये प्रति किलो या कवडीमोल भावाने खरेदी केला जात आ . दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शासनाने १७० रुपये हमीभाव देऊन खरेदी केली होती, परंतु नंतर ती…

Read More