Headlines

श्वासातून मधुमेह तपासणी शक्य:नागपूर विद्यापीठाचे संशोधन, 'नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाइस'ला आंतरराष्ट्रीय मान्यता

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी एक महत्त्वाचे उपकरण विकसित केले आहे, ज्यामुळे आता श्वासाद्वारे मधुमेहाची तपासणी करणे शक्य होणार आहे. पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागाने तयार केलेल्या या ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाइस’ला यूके डिझाईन नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाले आहे, ज्यामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडण्याची शक्यता आहे. सध्या मधुमेहाच्या तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेणे आवश्यक असते, जी प्रक्रिया अनेक…

Read More

त्र्यंबकेश्वर दर्शन रॅकेटचा म्होरक्या कडलगचे विश्वस्त पद रद्द होणार:खात्यात 50 लाख रु. भाविकांचे असल्याचा संशय

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडवणूक करून एजंटांच्या माध्यमातून व्हीआयपी दर्शन रॅकेट चालवणारे संशयित व देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्या अटकेनंतर त्यांच्या बँक खात्यात तब्बल १ कोटी १३ लाखांची रोकड सापडली आहे. या प्रकरणात गेल्या २० दिवसांपासून कडलग कारागृहात असल्याने त्यांचे विश्वस्तपद रद्द करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यांची विश्वस्तपदी नियुक्ती धर्मादाय उपआयुक्तांकडून झाली असल्याने हे…

Read More

एन. रंगासामी पाचव्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री:भाजप अध्यक्ष नितीन नवीन शपथविधीला उपस्थित होते; केरळमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

एन. रंगासामी पाचव्यांदा पुडुचेरीचे मुख्यमंत्री बनले आहेत. उप-राज्यपाल कैलाश नाथन यांनी लोक भवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनही उपस्थित होते. रंगासामी यांच्याशिवाय भाजपचे ए नमस्सिवायम आणि एआयएनआरसी नेते मल्लादी कृष्णा राव यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नमस्सिवायम 2021 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले होते. मागील पुडुचेरी सरकारमध्ये ते…

Read More

शबरीमला प्रकरण, न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या- व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीकडून माहिती नको:थरूर यांच्या लेखाच्या उल्लेखावर CJI म्हणाले- लेख वैयक्तिक मत आहे

केरळममधील शबरीमाला मंदिरासह धार्मिक स्थळांमध्ये महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाशी संबंधित याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी सांगितले की, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून मिळालेली माहिती स्वीकारली जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती नागरत्ना यांनी ही टिप्पणी दाऊदी बोहरा समुदायाच्या वतीने हजर झालेले ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना केली होती. कौल यांनी…

Read More

दिंडोरी नाईक महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा:रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य

प्रतिनिधी | दिंडोरी येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या सर्व बॅचचे विद्यार्थी या सोहळ्यासाठी एकत्र आले होते, त्यामुळे संपूर्ण परिसर जुन्या आठवणींनी बहरला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे होते. प्रमुख…

Read More

वेरूळ बसस्थानकात स्मार्ट सिटी बसचा स्फोट:प्रवासी नसल्याने टळली मोठी दुर्घटना; इंजिन स्फोटाने धांदल, घटनेनंतर भीतीचे सावट

वेरूळ येथील भोसले चौक बसस्थानकात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. ‘स्मार्ट शहर बस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनपा बसच्या इंजिनमध्ये अचानक स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर काही क्षणांतच बसमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. त्यामुळे बसस्थानक परिसरात उपस्थित असलेले लोक घाबरून इथून तिथे पळू लागले. ही बस छत्रपती…

Read More

पुण्यात 400 कोटींची मोठी गुंतवणूक:'अग्रेको इंडिया'सोबत सामंजस्य करार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील 10 वर्षांत सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या…

Read More

गंगापुरातील विजेची कामे महावितरण मार्गी लावणार:पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील रोहित्रे होणार दुरुस्त‎

लासूर स्टेशन वजनापुर येथील शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी विजेच्या समस्यांवर महावितरणविरोधात पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांनी बुधवारी लासूर स्टेशन येथील बाजार समितीत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ३० मेपर्यंत विजेसंबंधित कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हल्लाबोल आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. गंगापूर तालुक्यातील गावठाण…

Read More

पार्थ पवारांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास:आज दुपारी मुंबईवरून पुण्याला आले, अनेकांच्या भुवया उंचावल्या; चर्चांना उधाण

अजित पवार यांच्या अपघाती निधनाला कारणीभूत ठरलेल्या ‘व्हीएसआर’ (VSR Ventures) कंपनीच्या विमानानेच त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. एका बाजूला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेऊन चौकशीची मागणी करत असताना, दुसऱ्या बाजूला खुद्द पवार कुटुंबातील सदस्याने त्याच कंपनीची सेवा घेतल्याने अनेकांच्या…

Read More

कांदा प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक:पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन; हजारो शिवसैनिक रस्त्यावर

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना त्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मोठे चक्काजाम आंदोलन करत शिवसैनिकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले….

Read More