![]()
भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील हवामानाबाबत एक अत्यंत मोठी आणि धोक्याची चेतावणी जारी केली आहे. पुढील १० तासांमध्ये देशातील १५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, ५ राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात १२ आणि १३ जून रोजी अवकाळी पावसाचे संकट असेल, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मोसमी पाऊस रेंगाळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार राज्यात मान्सूनची वाटचाल अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे मुंबईसह उत्तर कोकणात उष्मा प्रचंड वाढला आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १० ते ११ जून मानली जाते, मात्र यंदा पोषक वातावरण नसल्याने तो लांबणीवर पडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. सध्या मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात कमालीचे दमट वातावरण असून तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. आता राज्यात १८ जूनपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल, असा नवीन अंदाज आहे. पेरण्या रखडल्या; शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत मान्सून वेळेवर पुढे सरकत नसल्याने राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. पाऊस लांबल्यामुळे अनेक भागांतील पेरण्या खोळंबल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व शेती कामे अंतिम टप्प्यात आणली आहेत. शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर मारून जमीन पेरणीसाठी सज्ज करत आहेत, मात्र आता सर्वांचे डोळे छत्रपती संभाजीनगर, विदर्भ आणि मराठवाड्याच्या आकाशाकडे लागले आहेत, जिथे काही ठिकाणी केवळ किरकोळ अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. रखडलेला मान्सून आणि पाणीटंचाई जून महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला तरी दमदार पाऊस न झाल्याने महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. कोकणच्या काही भागात मान्सूनने हजेरी लावली असली, तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अद्याप मोठी प्रतीक्षा आहे. हवामान खात्याने नागरिकांना पुढील १० तास सतर्क राहण्याचे आणि वादळी वारे असताना झाडांखाली किंवा पत्र्यांच्या शेडखाली आश्रय न घेण्याचे आवाहन केले आहे. बिहारमध्ये वीज कोसळून 9 लोकांचा मृत्यू: राजस्थान-पंजाबमध्ये गारपीट, दिल्लीत वादळासह पावसाचा रेड अलर्ट, 27 राज्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने (IMD) गुरुवारी रात्री दिल्लीतील अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह वादळ आणि वीज कोसळण्याचा रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत 70-90 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात आणि अनेक भागांत धुळीचे वादळही येऊ शकते. दुसरीकडे, गुजरात वगळता इतर सर्व राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव आहे. राजस्थानमधील अलवर, कोटपुतळी-बहरोड, श्रीगंगानगर येथे गुरुवारी पावसासह गारपीट झाली. जयपूरमध्ये रुग्णालयाबाहेर एका कारवर झाड कोसळले. सविस्तर वाचा
Source link
हवामान विभागाकडून इशारा:पुढील 10 तास 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचे सावट; महाराष्ट्रात मात्र मान्सून रेंगाळला, शेतकरी चिंतेत