Headlines

ग्राउंड रिपोर्ट:‘सूर्यास्त्र’च्या यशस्वी चाचणीनंतर शिर्डीतील डिफेन्स क्लस्टरचा आरंभ, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार उद्या उद्घाटन

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या फतेह-२ या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला सडेतोड उत्तर देण्यासाठी विकसित भारतीय ‘सूर्यास्त्र’ची चाचणी यशस्वी झाल्यानंतर निबे ऑर्डिनन्स अँड मेरीटाइम लिमिटेड या खासगी उद्योग समूहाने शिर्डीत डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स उभारले आहे. वार्षिक ५ लाख तोफगोळ्यांचे उत्पादन करणारा हा देशातील सर्वात मोठा खासगी प्रकल्प ठरेल. त्यासाठी शिर्डी औद्योगिक वसाहतीत निबे ग्रुपच्या ग्लोब फोर्ज या कंपनीने…

Read More

अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स-ॲपेचा ‎अपघात; १ तास वाहतूक कोंडी‎:दोन जण गंभीर जखमी, ३ दिवसांत तिसऱ्यांदा घडला अपघात‎

प्रतिनिधी | फर्दापूर अजिंठा घाटातील अपघाताची मालिका सुरूच असून, शुक्रवार आणि शनिवारनंतर पुन्हा रविवारी घाटात ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक ॲपेचा समोरासमोर अपघात झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगावला दाखल केले आहे. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. अजिंठा घाटात रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडुन ट्रॅव्हल्स…

Read More

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शेतकऱ्यांचे आंदोलन:मक्रणपूर पुलावर शीवरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून सत्याग्रह‎

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मक्रणपूर पुलावर शीव रस्त्यासाठी शेतकरी सोमवारपासून सत्याग्रह करत आहेत . शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध केला. यासंदर्भात किसान सभेचे कार्यकर्ते बापू गवळी यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग गट नंबर ५२ ते गट नंबर २१ अशा तीन किलोमीटर शिव रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात…

Read More

राजुरवाडीजवळ जंगलाला आग, वीज केंद्राजवळ पोहोचली:अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

राजुरवाडी गावाजवळच्या जंगल परिसरात आज, बुधवारी दुपारी भीषण आग लागली. ही आग महावितरणच्या वीज केंद्राजवळ पोहोचल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवून संभाव्य धोका टाळण्यात यश आले. वनविभागाच्या कम्पार्टमेंटमध्ये दुपारच्या सुमारास ही आग लागली. वाढत्या तापमानामुळे आणि कोरड्या झाडाझुडपांमुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. ही…

Read More

Attari-Wagah Border Retreat Ceremony Timing Change

अमृतसर10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमृतसर येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणाऱ्या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार, आता रिट्रीट सेरेमनी संध्याकाळी 6 वाजता सुरू होऊन 6:30 वाजेपर्यंत चालेल. यापूर्वी रिट्रीट 5:30 वाजता सुरू होऊन 6 वाजता संपत होती. हवामान आणि दिवसाच्या कमी-जास्त होणाऱ्या प्रकाशाचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांचे…

Read More

राज्यातील हवामानात मोठा बदल:सोलापूर, इंदापूर आणि परभणीत पावसाचा धुमाकूळ; विविध ठिकाणी विजा कोसळल्या

राज्यात हवामानाचा मोठा विरोधाभास पाहायला मिळत असून, एका बाजूला उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला सोलापूर, पंढरपूर, परभणी आणि इंदापूरसह अनेक भागांत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. वेगवान वादळी वारा आणि विजांच्या लखलखाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इंदापूर तालुक्यात रात्री पावणे…

Read More

मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून तिघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा:पेठवडगाव येथील प्रकरण

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत पेठवडगाव येथे मयताच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन पंचनामा करण्यापासून रोखत मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून तिघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेेठवडगाव येथील नवनाथ लाखाडे या तरुणाने पेठवडगाव शिवारात शनिवारी सायंकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस…

Read More

कोथळी उपकेंद्रात रोहित्राचा ‎स्फोट; मुक्ताईनगर अंधारात‎:रात्री 8.55 वाजेची घटना, युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या तालुक्यातील कोथळी येथील १३२/३३ केव्ही उपकेंद्रात सोमवारी रात्री सुमारे ८.५५ वाजेच्या सुमारास पोटेन्शिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये उष्णतेमुळे अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात वीजपुरवठा तत्काळ खंडित झाला. सर्वत्र अंधार पसरला. घटनेनंतर उपकेंद्रातील ऑपरेटर व संबंधित अभियंत्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने स्फोटाची तीव्रता असूनही कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा…

Read More

अस्थमा नियंत्रणासाठी 'ॲक्शन प्लॅन' महत्त्वाचा:भारतात 3.5 कोटी लोकांना दम्याचा त्रास, 'कंट्रोलर इनहेलर्स'चा नियमित वापर करा- तज्ज्ञ

दमा (अस्थमा) हा केवळ तात्पुरता त्रास नसून, श्वसनमार्गातील सूज (इन्फ्लेमेशन) हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे केवळ खोकला किंवा श्वास लागणे यांसारखी तात्पुरती लक्षणे कमी करण्याऐवजी श्वसनमार्गातील सूज नियंत्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. रुग्णांनी तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन व्यवस्थापनाकडे वळणे अत्यावश्यक असल्याचे मत पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ज्ञ…

Read More

संयम ऑलिंपियाडमध्ये हुजुरपागा प्राथमिक विद्यालय अव्वल:२६२ शाळांतील ९ हजार २८० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

पुणे शहर आणि परिसरात आयोजित संयम ऑलिंपियाड या स्पर्धेत कात्रज येथील हुजुरपागा प्राथमिक विद्यालयाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शनिवार पेठ, आणि बी.के.कामठे हायस्कूल, येवलेवाडी, यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, ताराचंद…

Read More