Headlines

स्पॅम कॉल-खराब नेटवर्कसारख्या तक्रारी 15 दिवसांत निकाली काढा:अन्यथा 50 लाख दंड, TRAI ने तक्रार निवारणाचा मसुदा सादर केला

दूरसंचार नियामक ट्रायने टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची तयारी केली आहे. स्पॅम, नको असलेले, फसवणुकीचे कॉल आणि मोबाईल सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारी आता त्यांना 24×7 ऐकाव्या लागतील. तक्रारींचे निवारण करण्यास 15 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास कंपन्यांवर जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. या बाबी टेलिकॉम ग्राहक तक्रार निवारण (चौथी सुधारणा) विनियम-2026 च्या मसुद्याचा भाग…

Read More

वाढीव हद्दीतून ‘7/12’ हद्दपार होऊन ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार:ग्रामीण ओळख पुसली जाणार, राज्य शासनाचा मोठा निर्णय, संभाजीनगरसह सर्वच महापालिकांना फायदा

राज्यातील शहरांचा विस्तार वेगाने होत असताना महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची ‘ग्रामीण’ ओळख आता कागदोपत्रीही पुसली जाणार आहे. या वाढीव क्षेत्रांमधील जमिनींचे ७/१२ उतारे आता कायमचे इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी अधिकृत ‘प . मात्र, या नवीन हद्दींचे नगर भूमापन (सिटी सर्व्हे) रखडल्याने आजही तेथील जमिनींचा व्यवहार किंवा नोंदणी ७/१२ उताऱ्यांवरच होत होती. सिटी…

Read More

कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा:विरोधक महिला विरोधी – सुनेत्रा पवार; रोहित पवार यांचा मोदी सरकारवर निशाणा

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही महिलांना एक तृतीयांश आरक्षण देणारी 131 वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याच्या मुद्यावरून विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणा ठरला. महिला सक्षमीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातला. यावरून विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली, असे त्या…

Read More

'कॉर्पोरेट जिहाद'चे मास्टरमाइंड संभाजीनगरमध्येच:इम्तियाज जलील यांची चौकशी करा, निदा खान केवळ मोहरा, खरे सूत्रधार एमआयएमचे नेते- संजय शिरसाट

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची चौकशी झाली पाहिजे.त्या चौकशीतून एक मोठे षड्यंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. निदा खान आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना जलील जाहीर पाठिंबा देतात. या सर्वांची बाजू घेऊन जलील यांना काय घडवायचे होते? ही लोकांच्या मनात शंका आहे. नाशिकची निदा खान संभाजीनगरमध्येच का आली?…

Read More

गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू:माझ्या लेकाची चिरफाड करू नका.., पालकांचा आक्रोश

गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू पावल्याची घटना आज दिनांक 24 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील गणेश संतोष डोंगरे वय 13 वर्ष , रणवीर यशवंत शिंगाडे वय 14 वर्षे आणि राज अविनाश हनवते वय 11 वर्ष हे तिघे मित्र नेहमीप्रमाणे आजही गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. नगीना…

Read More

Himachal Heatwave Grips; Orange Alert for Hailstorm Tomorrow

Marathi News National Himachal Heatwave Grips; Orange Alert For Hailstorm Tomorrow | Rain Until May 25 शिमला12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हिमाचल प्रदेशमध्ये तीन दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवत आहे. आज (गुरुवारी) देखील पाच शहरांमध्ये उष्णतेची लाट होती. हवामान विभागाच्या मते- शिमला, धर्मशाला, पालमपूर, सोलन आणि ऊना येथे उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण झाले. राज्यात वाढत्या उष्णतेमुळे दिवसा…

Read More

उन्हाळी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यात उष्माघात विद्यार्थी मदत कक्ष:गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे ७५० ओआरएस वाटप‎

प्रतिनिधी | अकोला उन्हाळ्याची तीव्रता आणि वाढते तापमान लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ संलग्न पाचही जिल्ह्यांमध्ये ‘उष्माघात विद्यार्थी मदत कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. विद्यार्थी विकास विभागाच्या पुढाकारातून राबवण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि काळाची गरज ओळखणारा ठरत आहे….

Read More

अभ्यासाची जिद्द ठेवा व पालकांचे ऋण फेडा- मुख्य अभियंता चव्हाण:मतेवाडी फाटा पिंपळगाव येथील विद्यालयात विद्यार्थी-पालक सन्मान सोहळा‎

सध्याचे युग विज्ञानाचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आई-वडील तुम्हाला शिकवण्यासाठी अतोनात कष्ट करतात. ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवावी. पालकांच्या कष्टाचे ऋण फेडायचे असेल तर जिद्दीने अभ्यास करा. मोठ्या पदावर नोकरी मिळवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी केले. मतेवाडी फाटा, पिंपळगाव येथील आदर्श प्राथमिक व ग्रामगीता विद्यालयात शैक्षणिक व…

Read More

मंत्र्यांना आदिवासी नागरिकांनी दाखवल्या मेळघाटातील समस्या:डाॅ. उईके यांनी दिले तत्काळ समस्या सोडवण्याचे आश्वासन‎

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मेळघाट दौऱ्याच्या अनुषंगाने चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा गावास सोमवारी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या आशेने मंत्र्यांपुढे गावातील गंभीर पाणीटंचाई तसेच खराब झालेल्या रस्त्यांची समस्या मांडत निवेदन सादर केले. तारुबांदा गावात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून, येथील प्रसिद्ध कांदरी बाबा देवस्थानास (क) दर्जा मिळालेला असून, या…

Read More

दीड किलोमीटर अंतराचा रस्ता जर्जर:धामोडीच्या पारधी बेड्यावरील नागरिकांचा रस्ते दुरुस्तीसाठी आर्त स्वर‎

आदर्श गाव, स्मार्ट सिटी अशा कितीतरी महत्वाकांक्षी योजना शासनाच्यावतीने सुरू करण्यात आल्या असल्या तरी वास्तव काहीतरी वेगळेच आहे. दर्यापूर तालुक्यातील धामणा हे गाव याची साक्ष देते. शंभर टक्के पारधी वस्ती असलेल्या या गावाला स्वतंत्र रस्ता नाहीच, एका गावांतून नागरिकांनी कसातरी मार्ग काढला. मात्र हा दीड किलोमीटरचा रस्ता म्हणजे मरणयातना भोगण्याशिवाय दुसरं काहीही नाही. त्यामुळे आम्हीही…

Read More