Headlines

धनगरवाडी शिवारात शेतकऱ्याची आत्महत्या:न झालेल्या विहिरीचे पैसे भरण्याचा पोलिसांनी तगादा लावल्याचा नातेवाईकांचा आरोप

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्ायची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. शेतात विहीर नसतांनाही त्यासाठी उचलण्यात आलेले पैसे भरण्याचा तगादा पोलिसांकडून लावल्या जात असल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. धनगरवाड येथील गोरख बबन पातळे (२५) यांना धनगरवाडी…

Read More

दीपनगरला ‘चाइल्ड ओबेसिटी' विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

भारतीय युवक संस्था दिल्ली द्वारा आयोजित पाच दिवसीय मोटापा निवारण शिबिराचा चतुर्थ दिवस दीपनगर साताजीरा परिसरात उत्साहात पार पडला. या योग वर्गात एकूण ३३ साधकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटन प्रमुख वसंतराव शेजोळे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आहारतज्ज्ञ डॉ. अनघा संतोषजी नेवपूरकर उपस्थित होत्या. यावेळी राधा मंगल कार्यालय योग वर्गाचे विलास अहिरे, विजया कुलकर्णी…

Read More

Preet Singh Mumbai Club Assault Claims

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही शो स्प्लिट्सविलामध्ये दिसलेल्या प्रीत सिंहने दावा केला की मुंबईतील एका क्लबमध्ये तिच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे तिचा दात तुटला आणि डोळ्यांना सूज आली. प्रीतने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्याचा क्लोजअप दाखवला, ज्यात तिच्या चेहऱ्याची अवस्था खूप वाईट दिसत होती. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘मी नेहमी ऐकले होते की मुंबई…

Read More

60 वर्षांच्या सलमानने शेअर केला शर्टलेस फोटो:टोन्ड अ‍ॅब्स दिसले, म्हणाला- जेव्हा कोणी तुमच्यासोबत राहू इच्छित नाही, तेव्हा एकटेपणा जाणवतो

60 वर्षांच्या सलमान खानने रविवारी शर्टलेस फोटो शेअर केला. फोटोमध्ये त्याचे टोन्ड शरीर, फिट ॲब्स आणि मस्क्युलर फिजिक दिसत आहे. या फोटोत सलमान आराम करताना दिसत आहे, मात्र, त्याच्या फिटनेससोबतच त्याच्या पोस्टच्या कॅप्शनचीही चर्चा होत आहे. कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले आहे, ‘मी, स्वतः आणि फक्त मी… स्वतःसोबत राहण्याचे दोन मार्ग आहेत, अलोन (एकटे) आणि लोनली (एकाकी)….

Read More

प्रा. विजय आठवले यांना पीएचडी पदवी:जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीवर प्रकाशझाेत‎

जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ बुलंद करण्यासाठी संघर्ष करणारे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय विश्वनाथ आठवले यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने आचार्य (पीएच डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ संतोष बनसोड यांच्या मार्गदर्शनात हा शोधप्रबंध सादर करण्यात आला होता. प्रा. आठवले यांच्या संशोधनाचा…

Read More

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांचा अखेर पक्षाला ‘जय महाराष्ट्र’:उपनेते गोपीकिशन बाजाेरिया यांच्या कार्यपद्धतीवर केली नाराजी व्यक्त‎

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आश्विन नवले यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. नवले यांनी राजीनामा पत्रात उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामाचे पत्र त्या . नवले यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे, की ‘साहेब, आपण विचारांची क्रांती केली तेव्हा सर्वप्रथम आपल्या सोबत अकोल्यातून येणारे आम्ही आहोत….

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'माझे समकक्ष' म्हटलेय:डीबेटच्या आव्हानावरून चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, नेमके काय म्हणाल्या?

महिला विधेयकावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली असून जोरदार हल्लाबोलही केला. तसेच त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीबेटसाठी तयार असल्याचे म्हटले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली…

Read More

पुण्यात 'बाल पुस्तक जत्रा २०२६' सुरू:३० एप्रिलपासून गणेश कला क्रीडा मंच येथे ज्ञान-मनोरंजनाचा मेळावा

पुण्यात मुलांसाठी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ही जत्रा भरवली जाईल. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन…

Read More

प्रीती झिंटाकडे युझवेंद्र चहलने केली मागणी:ओपनिंग बॅटिंग करण्याची व्यक्त केली इच्छा, अभिनेत्री म्हणाली- IPL संपल्यानंतर करू

आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्जच्या उत्कृष्ट कामगिरीदरम्यान, फिरकीपटू युजवेंद्र चहलने संघाची सह-मालक प्रीती झिंटाकडे एका सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याची मागणी केली, ज्यावर प्रीतीने मजेशीर उत्तर दिले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जची कामगिरी या हंगामात उत्कृष्ट राहिली आहे. संघाने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये ६ विजय मिळवले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर…

Read More

मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकरी आत्महत्या:सरकारला अजून किती बळी हवेत? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यात अवघ्या 3 महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या सरकारला आणखी किती बळी हवेत, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या…

Read More