मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई
यंदा मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र,कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत वेगाने आटू लागले आहेत. परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्रहोऊ लागल्या अाहेत. प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत बीडआणि धाराशिव हे दोन जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू केले आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या २९ एप्रिलच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर…