Headlines

चांदूर बाजारमधील रस्ता पूर्ण उखडला:विद्यार्थी, रुग्णांची गैरसोय, लोखंडी सळ्या निघाल्या‎

शहरालगत असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ५, प्रल्हादपूर येथील शिवाजी चौक ते शिवाजी नगरकडे जाणारा रस्ता अक्षरशः उखडलेल्या अवस्थेत आहे. या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्णतः निघून गेल्याने आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. परिणामी वाहनधारकांसह पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. चांदूर बाजार-वलगाव मार्गावर शिवाजी चौकातून शिवाजीनगरकडे जाणारा…

Read More

दिव्यांका त्रिपाठीने शेअर केला जुळ्या मुलांचा पहिला फोटो:पोस्टमध्ये लिहिले- मला निवडल्याबद्दल धन्यवाद; लग्नाच्या 10 वर्षांनंतर झाले पालक

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया नुकतेच जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. मे महिन्यात मुलांच्या जन्मानंतर दिव्यांकाने आज सोशल मीडियावर त्यांची पहिली झलक शेअर केली आहे. तिने इंस्टाग्रामवर मुलांचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, ‘मला निवडल्याबद्दल धन्यवाद.’ दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाच्या 10 वर्षांनंतर त्यांच्या घरी पहिल्या मुलांचा जन्म झाला आहे. मात्र, या…

Read More

प्रियंका चोप्रा-महेश बाबूच्या ‘वाराणसी’ची कथा लीक:खलनायकाच्या मिशनवर महेश टाइम ट्रॅव्हल करतील, इतिहासापासून 2027 पर्यंतचा प्रवास दिसेल

एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘वाराणसी’ चित्रपटाचा कथानक (प्लॉट) लीक झाला आहे. प्रियंका चोप्रा आणि महेश बाबू अभिनीत या चित्रपटाची कथा टाइम ट्रॅव्हलवर आधारित असेल, ज्यात महेश बाबू एका शिवभक्ताच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटाच्या कथेचा खुलासा इतर कोणी नाही, तर यात व्हिज्युअल इफेक्ट्सचे काम पाहणाऱ्या प्रसिद्ध ‘सिनेसैट’ (Cinesite) कंपनीने केला आहे. ही तीच कंपनी आहे,…

Read More

ठाण्यात वृद्धाला परप्रांतीयाकडून मारहाणीचे प्रकरण:राज ठाकरेंसह श्रीकांत शिंदेंनीही फोनवरून साधला संवाद, प्रकृतीची केली विचारपूस

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय ओला चालकाने ज्येष्ठ नागरिकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज ठाकरे यांनी वृद्धाशी साधला संवाद या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More

संतांचे विचार साहित्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचे कार्य करावे- प्रदीप निफाडकर

“ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडले. तोच भारतीयत्वाच्या मूळ अस्मितेशी जुळणारा विचार पुढे नेण्याचे कार्य आज साहित्याच्या माध्यमातून करायचे आहे,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स (नवी दिल्ली) व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार…

Read More

सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार:14 वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू, व्यावसायिक वादातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

सांगली शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी घुसून अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात माथाडी नेत्याच्या अवघ्या 14 वर्षांच्या निष्पाप नातवाचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या थरारनाट्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे….

Read More

बी.टी. देशमुख यांनी अमरावतीचा पाणीप्रश्न सोडवला:श्रद्धांजली सभेत न्या. भूषण गवई यांनी केले स्मरण

अमरावती आणि बडनेरावासियांना ६० किलोमीटर अंतरावरील सिंभोरा (ता. मोर्शी) येथील अप्पर वर्धा धरणातून पाणी उपलब्ध करून देणारे माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांचे कार्य अविस्मरणीय आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या श्रद्धांजली सभेत हे प्रतिपादन केले. अमरावतीकर त्यांना कायम स्मरणात ठेवतील, असे गवई म्हणाले. विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. बी.टी….

Read More

सोनिया गांधी म्हणाल्या- गाझात मुलांना संपवण्याचा प्रयत्न:भारत एकटा मौन बाळगून; जग इस्रायलपासून दूर जात आहे, भारत जवळ जातोय

काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाच्या जून २०२६ च्या अहवालात म्हटले आहे की, इस्रायल गाझामधील पॅलेस्टिनींचे अस्तित्व संपवण्याच्या उद्देशाने मुलांना लक्ष्य करत आहे. इतका गंभीर अहवाल आल्यानंतरही मोदी सरकार गप्प आहे.’ सोनिया गांधी यांनी लिहिले की,…

Read More

पाण्याच्या टाकीत 5 दिवस मृत बैल सडत होता,:तेच पाणी 51 गावांना पुरवले- खडसे, मुक्ताईनगरच्या सारोळ्यातील प्रकार विधान परिषदेत

मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा प्रादेशिक जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत धक्कादायक प्रकार विधान परिषदेत चर्चेस आला. या केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडून एका बैलाचा मृत्यू झाला. मात्र, ५ दिवस हा मृत बैल टाकीतच सडत होता आणि याच टाकीतील पाणी मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ५१ गावांतील हजारो नागरिकांना पिण्यासाठी पुरवले गेले. या गंभीर हलगर्जीपणावरून एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सरकारला…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरण:खरातच्या अटकेने शिर्डीतील ‎‎जमीन माफियांचे धाबे दणाणले‎

शिर्डी परिसरात जमीन व्यवहार, खाजगी‎ सावकार की आणि आर्थिक गैरप्रकारांच्या‎ मालिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‎भोंदू अशोक खरात याला राहाता न्यायालयाने‎ जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी 9 मेपर्यंत 5 ‎दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे या‎प्रकरणातील तपासाला निर्णायक वळण‎ मिळण्याची शक्यता व्यक्त होत‎ आहे. फसवणुकीच्या या प्रकरणाची व्याप्ती‎ पाहता खरातच्या अटकेने शिर्डीतील जमीन ‎माफियांचे धाबे दणाणले असून तपासात…

Read More