Headlines

आठवीच्या पुस्तकात मराठा साम्राज्य नकाशा पूर्ववत समाविष्ट करावा:अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎

प्रतिनिधी | अकोला आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्यामुळे मराठा समाजात संतप्त प्रक्रिया उमटत आहे. वगळलेला नकाशा पूर्ववत समाविष्ट करा, अशी मागणी करीत अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक दिली. यापूर्वी अनेकदा इतिहास बदलण्यात येत असल्याचा आरोप करत शिवप्रेमी आक्रमक झाले होते. कधी जाहीर भाषण तर कधी लिखाणातून इतिहासाचे संदर्भ बदलण्याचा प्रयत्न…

Read More

मनीषा वाघमारेनेच नीट पेपरफुटीच्या रॅकेटसाठी मनीषा मांढरेला अचूक हेरले:पुण्यातील सोसायटीत एकत्रच वास्तव्य; दोघींमध्ये होता कौटुंबिक एकोपा

देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील ब्यूटी पार्लर चालक महिला मनीषा वाघमारे व मॉर्डन महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक करण्यात आली. योगायोग म्हणजे या दोघी या कात्रज परिसरातील गंगाओशन या सोस . प्राप्त माहितीनुसार मनीषा मांढरे ही संबंधित सोसायटीत एकटीच वास्तव्यास होती. या ठिकाणी सन २०१२ मध्ये तिने फ्लॅट विकत घेतला. ती…

Read More

विचारांना उत्तर विचारांनीच द्या!:अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एमजीएमचे विद्यार्थी एकवटले; संजय गायकवाड यांच्या शिवीगाळांचा निषेध

गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकासंदर्भात उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ एकत्र येत जाहीर निषेध नोंदवला. संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या कथित धमक्या आणि केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एमजीएम युनिव्हर्सिटीतील चिंतनगाह येथे दुपारी 4 वाजता आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी “विचारांना उत्तर विचारांनीच दिले पाहिजे” असा ठाम…

Read More

वादळामुळे वीजपुरवठा खंडित; नागरिकांनी जागूनच काढली रात्र:महावितरण अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप – खांब जमीनदोस्त‎

प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा येथे सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. वेळीच दुरुस्ती झाली असती. तर कदाचित नागरिकांचा त्रास टळला असता. त्यामुळे महावितरणच्या ढिसाळ नियोजनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते. त्यामुळे…

Read More

शीतल तेली-उगले यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला:क्रीडा आयुक्त पदावरून बदली; अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदींनी केले स्वागत

भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी शीतल तेली-उगले यांनी आज पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्या २००९ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांची राज्याच्या क्रीडा आयुक्त पदावरून पुणे विभागीय आयुक्तपदी बदली झाली होती. अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी नूतन विभागीय आयुक्तांचे स्वागत केले. तेली-उगले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कला शाखेच्या पदवी परीक्षेत सुवर्णपदक पटकावले आहे….

Read More

नीट – एसएस काउन्सिलिंगला विलंब:देशभरातील डॉक्टरांवर बेरोजगारीची वेळ, ‘फेमा’चा आंदोलनाचा इशारा

नीट-एसएस २०२४-२५ च्या काउन्सिलिंग प्रक्रियेला होत असलेल्या अनिश्चित विलंबामुळे देशातील सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ’ने (फेमा) वैद्यकीय समुपदेशन समितीला पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमसीसीच्या वेळापत्रकानुसार सुपर-स्पेशालिटीचे शैक्षणिक सत्र १० एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार होते, मात्र मे महिना संपत…

Read More

अमरावतीजवळ डबा पार्टीस गेलेल्या भावंडांसह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू:घातखेडा तलावातील गाळात एकामागाेमाग चाैघेही अडकले

अमरावतीमधील खोलापुरी गेट परिसरातील दहा मुले-मुली रविवारी शहरापासून १० किमी अंतरावरील घातखेडा तलावाजवळ डबा पार्टीसाठी गेले होते. जेवणानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या १२ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागोमाग चौघेजण तलावातील गाळात अडकले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य ऊर्फ मानव नरेंद्र जोशी (१३), पायल बबलू पंडित (२१), यश गजानन काकणे (१३, सर्व…

Read More

चिखलदरा अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के:सर्व 17 दृष्टीबाधित विद्यार्थी उत्तीर्ण, यशाची परंपरा कायम

चिखलदरा येथील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) संचालित निवासी अंध विद्यालयाने यावर्षीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवला आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व १७ दृष्टीबाधित विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. आकाश वाघमारे याने ८५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, ऋतुजा नांदुरकर आणि आरती गायकवाड यांनी प्रत्येकी ८३.८० टक्के गुण मिळवले….

Read More

गुजरातमध्ये 200 लोकांना अन्नातून विषबाधा:59 जणांना रुग्णालयात दाखल केले, लग्नात आंब्याचा रस प्यायल्यानंतर बिघडली तब्येत

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात लग्नादरम्यान अन्न विषबाधेमुळे (फूड पॉइझनिंग) 200 हून अधिक लोक आजारी पडले. त्यापैकी 59 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवार रात्रीची आहे. लग्नात 400 हून अधिक लोक उपस्थित होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जेवण सुरू झाले. काही लोकांच्या मते, आंब्याचा रस प्यायल्यानंतर तब्येत बिघडायला लागली. आजारी लोकांना तात्काळ जवळच्या सरकारी आणि…

Read More

हिंगोलीत बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देण्यास मनाई:जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोलपंप चालकांना कडक आदेश, परवापासून होणार अंमलबजावणी

हिंगोली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप चालकांनी बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देऊ नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले असून गुरुवारपासून ता. २१ या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. इंधनाचा अनधिकृत साठा होऊ नये आणि संभाव्य धोके टाळता यावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांपासून…

Read More