आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप:आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये शोककळा; मध्यरात्री अंत्यसंस्कारावेळी हंबरडा
आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या साताऱ्यातील आठ तरुणांवर सोमवारी मध्यरात्री उशिरा अत्यंत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेनंतर आसगाव, मर्ढे आणि खटाव परिसरात शोककळा पसरली असून गावागावांत हळहळ व्यक्त होत आहे. हे सर्व युवक कर्दे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासा दरम्यान पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार नियंत्रण सुटून खोल…