महाराणी सईबाई म्हणजे स्वराज्यास लाभलेली प्रेमळ सावली- निर्मळ:शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
सतराव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचा विवाह म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची महत्त्वपूर्ण राजकीय आणि सामाजिक पायाभरणी होती. महाराणी सईबाई निंबाळकर म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्याला लाभलेल्या एक प्रेमळ आणि खंबीर सावली होत्या असे प्रतिपादन बबनराव निर्मळ यांनी केले. पुणे येथील ऐतिहासिक लाल महालामध्ये १६ मे १६४० रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि…