Headlines

खंडाळा कृषी महाविद्यालयाच्या ‎विद्यार्थ्यांनी चापानेरला दिली भेट‎:कृषी व्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्यांचाविद्यार्थ्यांना मिळाला अनुभव

हतनूर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्न कृषि महाविद्यालय, खंडाळा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जनजागृती व कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी सोमवारी चापानेर गावाला भेट दिली. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील कृषी व्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन केले होते. या भेटीदरम्यान गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी बांधव…

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तिसऱ्या दिवशी:नागरिकांचे हाल, तहसील कार्यालयातील कामे ठप्प, आरोग्य सेवा विस्कळीत

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयातून मिळणारे विविध दाखले बंद झाले आहेत, तर आरोग्य सेवाही कोलमडली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी आज,…

Read More

शहरात 4 केंद्रांवर SRPF ची लेखी परीक्षा संपन्न:8500 उमेदवारांनी दिली परीक्षा; परीक्षा केंद्राबाहेरील झाडांवर उमेदवारांच्या बॅगा

राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 20 वरणगाव यांच्यामार्फत रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे सशस्त्र पोलिस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत लेखी परीक्षा घेण्यात आली. तब्बल 8500 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. पण परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी आणलेले साहित्य ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांना आपल्या बॅगा परीक्षा केंद्राबाहेर उघड्यावर ठेवाव्या लागल्या काही बॅगा झाडांवर अडकवलेल्याही दिसून आल्या. राज्य राखीव…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो – धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी…

Read More

Maharashtra Corp, IAF & CSIR-CCMB Vacancies Announced

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये माहिती महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 407 रिक्त जागांची, भारतीय वायुसेनेत 47 पदांवर भरतीची. तसेच CSIR-CCMB मध्ये 28 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. महाराष्ट्र महानगरपालिकेत 407 भरती, परीक्षेविना निवड महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 407 पदांसाठी भरती निघाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट www.pcmcindia.gov.in वर…

Read More

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- सनातन धर्म संपवला पाहिजे:हे लोकांना विभाजित करते; आधी डेंग्यू, मलेरिया सांगितले होते, यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते

तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, लोकांना विभाजित करणाऱ्या सनातन धर्माला निश्चितपणे संपवले पाहिजे. त्यांनी तमिळ थाई वाझ्थुला प्रत्येक सरकारी कार्यक्रमात प्राधान्य देण्याची मागणीही केली. उदयनिधींनी नुकत्याच झालेल्या शपथविधी समारंभाचा उल्लेख करत आरोप केला की, तामिळनाडूचे पारंपरिक तमिळ आवाहन गीत ‘तमिळ थाई वाझ्थु’ला कार्यक्रमात तिसऱ्या स्थानावर ठेवण्यात आले, तर परंपरेनुसार त्याला…

Read More

टरबूज खाल्ल्यामुळे दोकाडिया कुटुंबाचा मृत्यू नाही:FDA चा कलिंगडात भेसळ आढळली नसल्याचा दावा; मग 4 जणांचा मृत्यू कशाने झाला?

मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृ्त्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने आपल्या अहवालात या कुटुंबाने खाल्लेल्या टरबुजात कोणताही कृत्रिम रंग किंवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा दावा केला आहे. परिणामी, टरबूज खाल्ल्यामुळे या कुटुंबाचा मृत्यू झाल्याची शक्यता मावळली आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4…

Read More

सुधाकर भारसाकळे शिवसेना शिंदे गटात जाणार, काँग्रेसला धक्का:संवाद मेळाव्यात मन मोकळे करत भूमिका स्पष्ट

अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावी नेते आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य सुधाकर पाटील भारसाकळे यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मंगळवार, २६ मे रोजी दर्यापूर शहरातील माहेश्वरी भवन येथे आयोजित संवाद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच भारसाकळे यांनी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा…

Read More

महिन्याभरात पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाणार:जयंत पाटील यांनी वर्तवले भाकित, जुन्या ट्विटवरून मुख्यमंत्र्यांना लगावला खोचक टोला

देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थेट ३ रुपयांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. “आज ९६ रुपयांना मिळणारा डॉलर महिन्याभरात १०० रुपयांवर जाईल, तर पेट्रोलचे दर १२०…

Read More

इंदिरा गांधींनी सोने खरेदी टाळायला सांगितली तेव्हा अस्वस्थता नव्हती का?:शेतकरी आत्महत्या होत होत्या तेव्हा अस्वस्थता नव्हती का? भाजपचा पवारांना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर शरद पवार म्हणातत की या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले होते त्यावेळी कोणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.जेव्हा तुम्ही कृषीमंत्री असताना महाराष्ट्रात शेकड्याने शेतकरी आत्महत्या करत होते त्यावेळी तुम्हाला अस्वस्थता जाणवली नाही का? त्यावेळी तुम्ही काही पावलं टाकली होती…

Read More