Headlines

संतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, सोयगावला मोर्चा‎:नायब तहसीलदारांना निवेदन, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील पूजनीय संतांविषयी चुकीचे, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपावरून गुरुवारी (दि.२३) वारकरी संप्रदाय, सकल हिंदू समाजाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सोयगाव नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तींचा अवमान झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधव, सकल हिंदू समाजाच्या…

Read More

विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट?:99 टक्के उद्धव ठाकरेच उमेदवार; मविआमध्ये ठाकरेंच्या उमेदवारीवर संभ्रम; शेवटच्या क्षणी मोठा निर्णय?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी मात्र 99 टक्के उमेदवार उद्धव ठाकरेच असतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तरीही त्यांनी 1 टक्का सांगता येत नाही, पण बॉस इज ऑल्वेज राईट, असे म्हणत अंतिम निर्णय नेतृत्वावरच अवलंबून असल्याचे सूचित केले….

Read More

नागपूर विभागाचा बारावीचा निकाल 88.67 टक्के:राज्यात आठवे स्थान कायम, मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात नागपूर विभागाचा निकाल ८८.६७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. नागपूर विभागाने राज्यात आठवे स्थान कायम राखले आहे. या विभागाचा निकाल मागील काही वर्षांच्या तुलनेत किंचित कमी झाला आहे. २०२५…

Read More

पंतप्रधानांचे बचतीचे आवाहन, दिल्लीत मंत्री ई-रिक्षाने गेले:एमपी- जज सायकलने उच्च न्यायालयात पोहोचले, मुख्यमंत्र्यांचा ताफा कमी झाला; यूपीमध्ये वर्क फ्रॉम होम

पंतप्रधान मोदींच्या बचतीच्या आवाहनाचा परिणाम चार राज्यांमध्ये दिसत आहे. दिल्लीत मंत्री आशिष सूद यांनी कार्यक्रमाला जाण्यासाठी आधी मेट्रो, नंतर ई-रिक्षाने प्रवास केला. मध्य प्रदेशात न्यायमूर्ती डी.डी. बन्सल सायकल चालवून उच्च न्यायालयात पोहोचले. इतकंच नाही तर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे. तिकडे उत्तर प्रदेशात खासदार-आमदारांना एक दिवस बस-मेट्रोने प्रवास करण्याचा…

Read More

नवीन मक्याला दोन हजारांचा भाव; 43 अंश तापमानातही काढणी सुरू:मजूर मिळत नसल्याने यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल‎

एकीकडे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत, दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून उष्माघाताच्या घटना समोर येत आहेत. मात्र दुसरीकडे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ आणि परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर ४३ अंश सेल्सिअस तापमानातही जीवाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. सध्या परिसरात मका काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून कडक उन्हातही…

Read More

पावसाळ्यात शहरातील नाले, गटारी तुंबू नये म्हणून कुर्डुवाडीत स्वच्छता सुरू:कुर्डुवाडी नगरपालिकेने खबरदारी म्हणून आतापासूनच कंबर कसली‎

गतवर्षी पावसाळ्यात गटारी, नाले तुंबल्याने कुर्डुवाडी शहरातील रस्त्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना जगणेही अडचणीचे ठरले. यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी ओढे, नाले आणि अ . गतवर्षीच्या विदारक अनुभवातून धडा घेत, यंदा पावसाळ्यात शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कुर्डुवाडी नगरपालिकेने आतापासूनच कामे सुरू केली आहेत. प्रशासनाच्या…

Read More

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन ट्रक पलटी, दोघांचा मृत्यू:बोरघाटजवळ भीषण अपघात, वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाट परिसरात शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका ट्रकने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात तिन्ही ट्रक रस्त्यावर पलटी झाले, ज्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ५:०५ वाजताच्या सुमारास एक्सप्रेसवेवरील मुंबई वाहिनीवर किमी ३८.१०० जवळ घडला. पुणे बाजूकडून…

Read More

अर्चना सिंह म्हणाल्या- मला कोणी काम देत नाही:कपिल शर्मा शोमुळे चित्रपट सोडले; आता चित्रपट निर्मात्यांनी संपर्क साधणे बंद केले

चित्रपट ‘निकाह’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्चना पूरण सिंह आज ‘कपिल शर्मा शो’ च्या जज म्हणून ओळखल्या जातात. मात्र, याच प्रसिद्धीने त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला ब्रेक लावला आहे. एका मुलाखतीत अर्चना यांनी आपले दुःख व्यक्त करताना सांगितले की, कपिलच्या शोमधील व्यस्ततेमुळे त्यांनी इतक्या प्रोजेक्ट्सना नकार दिला की आता निर्मात्यांनी त्यांना काम ऑफर करणेच बंद केले आहे….

Read More

मेळघाटात जलसंकट गहिरे:8 गावांना 19 टँकरने पाणीपुरवठा सुरू

तापमानात वाढ झाल्याने मेळघाटातील जलसंकट अधिक गंभीर झाले आहे. चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये सध्या १९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये भूगर्भात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे टँकरशिवाय पाणीपुरवठा करण्याचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नोंदीनुसार, या आठही गावांमध्ये रहिवाशांसाठी दररोज पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले जात…

Read More

बिबट्याच्या दहशतीचे झाले ‘रसवंतीगृह’:आळेफाटा परिसरात हटके व्यवसायाची चर्चा‎

आळेफाटा व्यवसायाला नाव देताना अनेकदा देव किंवा कुटुंबीयांच्या नावाचा आधार घेतला जातो. मात्र, जुन्नर-आंबेगाव पट्ट्यातील बिबट्याच्या दहशतीलाच एका कल्पक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाची ओळख बनवले आहे. आळेफाटा-शिरूर मार्गावर सुरू झालेल्या ‘बिबट्या रसवंतीगृह’ या नावाने सध्या संपूर्ण परिसरात मोठी उत्सुकता निर्माण केली असून, उसाच्या रसासोबतच या नावाची गोडीही चर्चिली जात आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पारनेर या…

Read More