Headlines

सलमानच्या सेक्युरिटीला आमिरच्या मुलाला ओळखता आले नाही:ना दिखावा, ना स्टारचा ॲटिट्यूड; जुनैदला ओळखण्यात सुरक्षा पुन्हा चुकली

आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि ‘आमिर खान प्रोडक्शन्स’च्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत एका सेलिब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी या कार्यक्रमात सलमान खानसह बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सलमानला भेटण्यासाठी आमिर खानचा मुलगा जुनैद पोहोचला. मात्र, सलमानच्या सुरक्षा रक्षकांना जुनैदला ओळखता आले नाही आणि त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न…

Read More

राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार:महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला! पक्ष एकत्रीकरणाचा विषय आम्ही बाजूला ठेवलाय- रोहित पवार

उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्र महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य बनत चालले असून, राज्यात तासाला एका महिलेवर अत्याचार होत आहे, महिला अपहरणात महाराष्ट्र देशात पहिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. ‘शक्ती कायद्या’ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत त्यांनी 31,141 गायब झालेल्या मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. रोहित पवार…

Read More

पंजाबमध्ये रेल्वे रुळावर स्फोट:रुळ तुटला, जवळच छिन्नविछिन्न मृतदेहही आढळला; एक आठवड्यापूर्वी स्फोटाची धमकी आली होती

अंबाला ते अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉर लाईनवर सोमवारी रात्री IED स्फोट झाला. ही घटना रात्री सुमारे साडेआठ वाजता राजपुरा-शंभू रेल्वे स्थानकाजवळ घडली. माहिती मिळताच जीआरपी, आरपीएफ, पंजाब पोलीस आणि इतर तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि तपास सुरू करण्यात आला. अहवालानुसार, काही काळापूर्वी रेल्वे लाईनवर सुरक्षेसंबंधी धमकी मिळाली होती, ज्याला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही आणि कोणताही…

Read More

मोहोळ तालुक्यात खरिपाचा पेरा वाढणार:20 हजार मेट्रिक टन खत पुरवठ्याचे केले नियोजन, मशागतीची कामे युद्धपातळीवर; कृषी विभागाला 30500 हेक्टरवर पेरणीची आशा

निसर्गाचा लहरीपणा आणि सूर्याचा आग ओकणारा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना करत मोहोळ तालुक्यातील बळीराजा आगामी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून, गेल्या वर्षी . तालुक्यात सध्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात दुपारी शुकशुकाट…

Read More

रणवीर सिंहच्या समर्थनार्थ आले राम गोपाल वर्मा:डॉन 3 वादावर बोलले- FWICEला बॅन करा, अभिनेत्याला नाही

‘डॉन 3’ वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा रणवीर सिंहच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्याचबरोबर त्यांनी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) द्वारे रणवीरविरुद्ध जारी केलेल्या ‘नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ (असहयोग निर्देश) वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राम गोपाल वर्मा यांनी लिहिले, FWICE ला बंदी घाला, रणवीर सिंहला नाही. गांधीजींच्या शैलीतील ही तथाकथित बंदी किंवा असहयोग…

Read More

थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक:डॉ. अतुल कुलकर्णी यांचे महर्षी कर्वे जयंती व्याख्यानात प्रतिपादन

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६८ वी जयंती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘महर्षी कर्वे व्याख्यानमाले’त जनकल्याण रक्तकेंद्र, पुणे चे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी ‘थॅलेसेमिया’ या रक्तविकारावर मार्गदर्शन केले. थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दिवसभरात संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Read More

खेडमध्ये वारस नोंदीसाठी महिला तलाठी, कोतवाल लाच घेताना जेरबंद:5,500 रुपयांची लाच घेताना एसीबीची कारवाई

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वारसनोंदीसाठी 5,500 रुपयांची लाच घेताना एका महिला तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव खंडोबा येथील तलाठी मनीषा साहेबराव माने (वय 45) आणि कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय…

Read More

अजित पवारांच्या मृत्यूशी अशोक खरातचा संबंध!:मृत्यूच्या 6 दिवस आधी खरातने बदलले 4 मोबाईल, अंजली दमानियांचा दावा

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात अशोक खरात याची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मृत्यूच्या अवघे 6 दिवस आधी अशोक खरातने तब्बल 4 मोबाईल फोन बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशयास्पद हालचालींमुळे अजित पवार यांच्या मृत्यूचा थेट संबंध खरातशी असल्याची दाट…

Read More

लातूर हादरलं!:बोअरची वायर चोरल्याच्या संशयावरून तीन अल्पवयीनांना खांबाला बांधून बेदम मारहाण; संतापजनक VIDEO व्हायरल

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील बोअरवेलची इलेक्ट्रिक वायर चोरी केल्याच्या संशयावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरोळा गावातील एका शेतातील बोअरवेलची…

Read More

स्थलांतरित मजुरांना सहज मिळेल 5 किलोचा गॅस सिलेंडर:सरकारने राज्यांची दैनंदिन मर्यादा दुप्पट केली, इराणमधील युद्धामुळे निर्णय घेतला

केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 5KG फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलिंडर्सची दैनंदिन मर्यादा दुप्पट केली आहे. वाढवलेला कोटा विशेषतः स्थलांतरित मजुरांसाठी राखीव असेल. सरकारने 2-3 मार्चच्या सरासरी विक्रीच्या आधारावर 5KG एलपीजी सिलिंडरचा अतिरिक्त पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, जो आधीच निश्चित केलेल्या 20% मर्यादेपेक्षा वेगळा असेल. अमेरिका-इराण यांच्यातील युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा बाधित होत…

Read More