Headlines

लाखमोलाच्या केळी बागांना तीव्र‎उष्णतेपासून वाचवण्यासाठी धडपड‎:बागेच्या चहूबाजूंनी ग्रीननेट, साड्या लावून उष्ण वाऱ्यांना करतात अटकाव

तांदलवाडी परिसरात केळी हे मुख्य पीक आहे. त्यामुळे वर्षभर निर्यातक्षम उत्पादनावर शेतकऱ्यांवर भर असतो. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णता वाढून तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे केळीचे पीक जोपासताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. उष्णतेचा कापणी . तापमान वाढीमुळे केळी झाडाची पाने कोरडी पडणे, घड निसटणे, पाने करपणे, प्रखर सूर्यकिरणांमुळे घड खराब होऊन काळे पडणे, पिकाची वाढ…

Read More

निवडणूक आयोग भाजपच्या 'पापाचा' भागीदार!:भारतात लोकशाही राहिली कुठे? निवडणुकांचे निकाल आता पाकिस्तान-रशियासारखे; राऊतांचा सवाल

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील विरोधकांचा पराभव हा देशासाठी, लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशात कोणत्याही राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे नाही, ही भूमिका ठेवत जर सत्ताधारी पक्ष काम करत असेल तर यापुढे विरोधकांनी लढायलाच नको, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदार कापले जातात. मतदारांची संख्या कमी करत विजय…

Read More

युवकांनी बैलगाडी ओढून नाथवंशजांना पार करून दिला 5 किमीचा घाट

“माझ्या जिवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी…’ या अभंगाच्या स्वरांनी आसमंत दुमदुमला, टाळ-मृदंगाचा अखंड निनाद, भगव्या पताकांची डौलदार उधळण आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा बीड जिल्ह्यातील हटकरवाडी (ता. पाटोदा) येथील गारमाथ्याच्या डोंगरातून होणारा खडतर पण तितकाच रोमांचकारी प्रवास सोमवारी भक्तिभावात पार पडला. निसर्गरम्य डोंगररांगांमधून पाच किलोमीटर पालखी ओढण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी…

Read More

तिसरी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन 12 जुलैला:शून्य प्लॅस्टिक, शून्य कार्बन वापर; पाळीव प्राण्यांसाठी 'पावाथॉन' शर्यत

गोल्डलिफ एन्टरटेन्मेंटतर्फे तिसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 12 जुलै 2026 रोजी करण्यात आले आहे. सदू शिंदे क्रिकेट मैदानावर ही मॅरेथॉन होणार असून, ती पूर्णपणे इको-फ्रेंडली असेल. आयोजक अथर्व अय्यर यांनी सांगितले की, दुसऱ्या आवृत्तीला मिळालेल्या प्रतिसादानंतर सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. या मॅरेथॉनमध्ये प्लॅस्टिक आणि कार्बनचा वापर शून्य असेल. जंपस्टार्ट…

Read More

महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राजवळ कोण… मराठा की ब्राह्मण?:पुण्यातील कार्यक्रमात भाजप आमदार पवार, खासदार मेधा कुलकर्णींत वाद

पुण्यातील सारथी संस्थेच्या एका कार्यक्रमात भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचेच आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या शेजारी रिकाम्या खुर्चीवर बसणे आणि कथित विधानावरून जोरदार वाद झाला. त्यामुळे कुलकर्णी कार्यक्रमातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी सांगितले की, आमदार पवार मला म्हणाले “मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे शोभत नाही,…

Read More

दौंड-मनमाड रेल्वे मार्गासाठी 15 मीटर जागेचे संपादन:मनमाड शहरातील 1200 रहिवाशांना दिलासा‎

दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी मनमाड शहरातील सर्व्हे नंबर २५५ आणि २५६ मधील शेकडो घरे व दुकाने जमीनदोस्त होणार, या चर्चेने महिन्याभरापासून हजारो नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, सोमवारी रेल्वे प्रशासन व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीनंतर या सर्व चर्चा फोल ठरल्या आहे. रेल्वे केवळ १५ मीटर जागा संपादित करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दौंड-मनमाड…

Read More

कळवण आगारातून सप्तश्रृंगगडासह नाशिकसाठी धावणार आधुनिक बस:5 ‘राजमाता जिजाऊ'' बस दाखल; आणखी 10 बस मिळणार‎

येथील एसटी महामंडळाच्या आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, या बसेसद्वारे कळवण-नाशिक आणि कळवण-सप्तश्रृंगगड मार्गावर सेवा दिली जाणार आहे. या बसेसचे लोकार्पण नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बसेस आगारात दाखल करण्यात आल्या आहेत….

Read More

निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार‎

आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक…

Read More

जंतरमंतरवरील आंदोलन संपले, स्वच्छता अभियान सुरू, 15 PHOTO:मंच – लाउडस्पीकर हटवले, आंदोलक परतले; बॅरिकेड्स रस्त्याच्या कडेला

नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात 20 जूनपासून जंतरमंतरवर सुरू असलेले धरणे प्रदर्शन शनिवारी संपले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आपले आंदोलन संपल्याची घोषणा केली. त्यानंतर जंतरमंतरवरून आंदोलक घरी परतले. येथे 36 दिवसांपासून लावलेला मंच काढण्यात आला. लाउडस्पीकर काढण्यात आले. त्यानंतर धरणेस्थळी राहिलेला कचरा एनडीएमसी आणि विद्यार्थ्यांनी साफ केला….

Read More

गुवाहाटीत भूस्खलन, आसाममध्ये पुराचा 1.7 लाख लोकांना फटका:JKत पुरामुळे 2 दिवसांत 23 जणांचा मृत्यू; MP -राजस्थानात मान्सून पुन्हा सक्रिय

जम्मू-काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या दोन दिवसांत पुरामुळे मृतांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. पूंछ आणि राजौरीच्या पूरग्रस्त भागांत सात लोक अजूनही बेपत्ता आहेत. सततच्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. सोमवारी मुसळधार पावसानंतर आसाममधील गुवाहाटी येथे भूस्खलन झाले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग ७१५ चा काही भाग पाण्याखाली गेला आहे. आसामचे…

Read More