नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या:गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील घटना
तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने नापिकी, कर्जबारीपणास कंटाळून विषारी द्रव प्राशन करीत शनिवारी आत्महत्या केल्याची घटना लखमापूर येथे घडली. चंद्रभान कचरू गाढे (५४) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री चंद्रभान गाढे हे गावातून जाऊन येतो असे सांगून घरातून निघाले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली पण ते सापडले नाही. शनिवार सकाळी ६…