स्मार्ट मीटर विरोधात तिवसा येथे शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा:अदानीच्या फायद्यासाठी सक्ती थांबवा; वीज बिलात वाढीचा आरोप
तिवसा येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा) यांच्या तिवसा तालुका शाखेने सोमवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना, केवळ अदानी कंपनीच्या फायद्यासाठी जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या नवीन स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात थेट १०० ते २०० टक्क्यांची वाढ…