Headlines

हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का:3.5 रिश्टर स्केलची नोंद; जीवित किंवा वित्तहानी नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी रविवारी ता ३१ भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. हिंगोली तालुक्यातील माळधामणी शिवार भूकंपाचे केंद्रबिंदू असून भूकंप मापन केंद्रामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे. यामुळे कुठेही जीवित वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून भूगर्भातून आवाज येणे तसेच भूकंप जाणवण्याच्या घटना वाढत आहेत….

Read More

राम मंदिर देणगी चोरी- टिन्नू यादवसह 8 आरोपींना अटक:आज कोर्टात हजर करणार; अरविंद केजरीवाल घेणार रामललाचे दर्शन

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात, मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्यासह 8 आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करतील. तिथे त्यांच्या 14 दिवसांच्या रिमांडची मागणी केली जाईल. वास्तविक पाहता, गुरुवारी संध्याकाळी देणगी चोरी प्रकरणात पहिली एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली. श्रीराम जन्मभूमी…

Read More

CBSE Three-Language Policy Opposition; Justice Joymalyas Bench to Hear

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात CBSE च्या त्रिभाषा धोरणाला 19 लोकांच्या एका गटाने आव्हान दिले. यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा समावेश आहे. ही याचिका नववीत त्रिभाषा धोरण लागू करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आली. याविरोधात सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात सुनावणी करेल. CBSE ने 15 मे रोजी शैक्षणिक सत्र 2026-27 पासून त्रिभाषा धोरण लागू…

Read More

पुण्यात पाण्यात अडकलेल्या बसमधून सहा कर्मचाऱ्यांची सुटका:वाघोली-लोहगाव रस्त्यावर खासगी कंपनीच्या बसला अग्निशमन दलाने वाचवले

वाघोली-लोहगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी एका खासगी कंपनीची बस साचलेल्या पाण्यात अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुटका केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी सकाळी लोहगाव-वाघोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने, या रस्त्यावरून निघालेल्या बस चालकाने पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला….

Read More

पुण्यात दैवीशक्तीच्या नावाखाली भोंदूकडून महिलेचे 5 वर्षे शोषण:50 लाखांना गंडा; स्वारगेट पोलिसांत गुन्हा; कौटुंबिक वादाचा फायदा घेत कृत्य

नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यातील ऋषिकेश वैद्य ही भोंदूगिरीची प्रकरणे ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून ४३ वर्षीय औदुंबर मनोहर गडदे (रा. तरटगाव, पंढरपूर) या भोंदूने ४२ वर्षीय महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून वारंवार अत्याचार केला. केवळ शारीरिक शोषणच नाही, तर कौटुंबिक वाद सोडवण्याच्या नावाखाली या…

Read More

LCD Display, 45W Charger & IP69 Waterproof

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक टेक कंपन्या दरवर्षी मोबाईलचे नवीन मॉडेल बाजारात आणतात आणि दावा करतात की नवीन मॉडेल मागील मॉडेलपेक्षा चांगले आहे. ओप्पो ने नुकतेच K13 चे अपग्रेडेड व्हर्जन K14 बाजारात आणले आहे. दोघांची किंमत जवळपास सारखीच आहे… 19 हजार रुपयांपेक्षा थोडी कमी. आम्ही हा फोन एक महिना वापरला. चला जाणून घेऊया, हा फोन…

Read More

वेरूळ येथील चतुर्विधा मठाला संरक्षण द्यावे:सहायक पोलिस अधीक्षक अग्निहोत्री यांना निवेदन‎

वेरूळ येथे श्री चक्रधर स्वामींच्या भ्रमणकाळात त्यांनी दहा महिने वास्तव्य केले होते. त्यांच्या स्मरणार्थ वेरूळ येथे चतुर्विधामठ स्थापन करण्यात आला. आठशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मठावर अतिक्रमण करण्यात येत आहे. त्यास संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महानुभाव पंथाच्या वतीने सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून तरुणीचा खून:वाघोलीतून कर्नाटकचा प्रियकर फरार, मुलगी पश्चिम बंगालमधील असल्याचे आले समोर

चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. २६ वर्षीय रिहाना खातून असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर इम्रान राजेसाब बोदले खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान आणि रिहाना हे विवाह न करता वाघोलीतील शिवलक्ष्मी बिल्डिंगमध्ये…

Read More

अक्षय कुमारला भेटायला अनवाणी चालत आला:राजकोटहून 700 किमी चालत मुंबईला पोहोचला, एक महिना वाट पाहिल्यानंतर भेट झाली

मुंबईत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भेटण्यासाठी गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी अशोक कंजारिया यांनी ७०० किलोमीटरची पायी यात्रा केली. ते १७ फेब्रुवारी २०२६ रोजी तिरंगा घेऊन, अनवाणी पायांनी राजकोटहून निघाले आणि १८ दिवसांत मुंबईत पोहोचले. मात्र, मुंबईत पोहोचल्यानंतर अनेक दिवस त्यांची अक्षयशी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी शहरातच थांबून प्रयत्न सुरू ठेवले. ते अनेकदा अक्षय…

Read More

मुले ओरडली-आई वाचव…बाबा, जाळू नका:छतरपूरमध्ये वडिलांनी खोलीत कोंडून आग लावली; आईने फोनवर किंकाळ्या ऐकल्या, शेजाऱ्यांनी वाचवले

मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील नौगाव येथील तिवारी मोहल्ल्यात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका वडिलांनी आपल्या 8 आणि 5 वर्षांच्या दोन मुलांना भाड्याच्या खोलीत कोंडून आग लावली. त्याच वेळी मुलांच्या आईचा फोन आला, ज्यात तिने त्यांच्या किंकाळ्या ऐकल्या. घरातून धूर निघताना पाहून शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला. आग विझवून दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत मुले…

Read More