Headlines

अमळनेरकर महाराज संघाच्या 8 व्या‎पारायणात 3,500 भाविक सहभागी‎:6 समित्यांच्या माध्यमातून 200 स्वयंसेवक कार्यरत, 10 लाख खर्च‎




अधिकमासानिमित्त आयोजित ८‎दिवसांच्या कथा, अखंड हरिनाम‎सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण‎सोहळ्याने शहरात एका‎आध्यात्मिक पर्वाची अनुभूती दिली‎आहे. अमळनेरच्या सखाराम‎महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या‎या उपक्रमात तब्बल ३,५०० भाविक‎एकाच मंडपाखाली बसून‎ज्ञानेश्वरीचे पारायण करत आहेत.‎या आयोजनासाठी महिनाभरापासून‎आयोजकांची तयारी सुरू होती.‎पारायणासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ थेट‎गोरखपूरहून मागवले आहेत.‎ सुमारे १५०० भक्तांचा परिवार‎असलेला हा संप्रदाय आहे.‎अमळनेरकर महाराज सेवा संघाच्या‎वतीने आयोजित केलेला हा आठवा‎मोठा कार्यक्रम आहे. या‎सप्ताहादरम्यान आलेल्या‎भाविकांसाठी दररोज सकाळचा‎नाष्टा आणि भोजनाची व्यवस्था‎करण्यात आली आहे. भक्ती आणि‎सेवेचा हा अनोखा संगम या‎सोहळ्यातून पाहायला मिळत आहे.‎ मायक्रो-मॅनेजमेंट अन् स्वयंसेवकांचे जाळे‎ कोणत्याही मोठ्या धार्मिक सोहळ्याचे‎यश हे केवळ भाविकांच्या गर्दीवर नाही,‎तर त्याच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनावर‎(मायक्रो-मॅनेजमेंट) अवलंबून असते.‎या सप्ताहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे‎येथील चोख नियोजन हे आहे. ३,५०० हून‎अधिक पारायणकर्ते आणि इतर भाविक‎अशा हजारो लोकांची व्यवस्था‎पाहण्यासाठी तब्बल २०० स्वयंसेवकांची‎फौज रात्रंदिवस राबत आहे. या संपूर्ण‎सोहळ्याच्या निर्दोष नियोजनासाठी ६‎वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात‎आल्या आहेत. भोजन, मंडप, ग्रंथ‎वितरण, स्वच्छता अशा प्रत्येक‎जबाबदारीचे समित्यांमध्ये योग्य वाटप‎झाल्याने एवढा मोठा सोहळा अत्यंत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎शांततेत आणि शिस्तीत पार पडत आहे. हे‎व्यवस्थापन शहरातील इतर संस्थांसाठी‎एक आदर्श मॉडेल ठरावे असेच आहे.‎ कॉर्पोरेट आयोजनाने तरुणाई आकर्षित‎ या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विठ्ठल,‎ज्ञानेश्वर, श्रीराम, गाय-वासरू, हत्ती यांच्या हुबेहूब प्रतिमा अत्यंत लक्षवेधी आहेत.‎धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन कॉर्पोरेट पद्धतीने केल्यामुळे तरुणाईला‎आकर्षित करण्यातही या सोहळ्याची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे समोर येते.‎ अधिकमासात ज्ञानेश्वरी‎पारायणाचे महत्त्व‎ वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीच्या‎पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व‎आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार‎अधिकमास हा जपासाठी,‎दानासाठी, ग्रंथाध्ययनासाठी‎सर्वोत्तममानला जातो. अमळनेरचे‎सखाराम महाराज यांनी आयुष्यभर‎भक्ती, नामस्मरण आणि नि:स्सीम‎सेवेचा मार्ग दाखवला. त्यांच्याच‎प्रेरणेने सुरू असलेला हा सप्ताह‎केवळ एक धार्मिक विधी न राहता,‎समाजाला एकत्र जोडणारा‎आध्यात्मिक सेतू बनला आहे.‎”अधिकमासात हजारो भाविकांनी‎एकत्र येऊन असे सामूहिक पारायण‎केल्याने समाजात सकारात्मक‎ऊर्जेचा महास्रोत निर्माण होतो,’‎असे आध्यात्मिक आणि‎तत्त्वज्ञानाचे अभ्यासक कृष्णा‎महाराज आरगडे म्हणाले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *