Headlines

चैतन्य देगलूकर वारकरी संप्रदायातील घुसखोर:त्यांनी राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय मंत्र रुजवला – शरद पवार गट




वारकरी संप्रदाय व संत साहित्य सर्वकाही संपण्याची भीती दाखवून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणारे चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील घुसखोर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. देगलूरकर यांनी राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय मंत्र रुजवला, असेही ते म्हणालेत. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका लेखाद्वारे वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून विकास लवांडे यांनी अशा लोकांची कथित पोलखोल करत आहेत. त्यांनी आज एक व्हिडिओ पोस्ट करत चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील प्रतिगामी विचारांचे घुसखोर असल्याचा तिखट आरोप केला. वारकरी संप्रदाय व संत साहित्याला भाजपशिवाय कुणीही वाचवू शकणार नाही अशी काल्पनिक भीती दाखवून ते आपल्या रसाळ वाणीने जनतेचा बुद्धिभेद करत आहेत, असे ते म्हणालेत. देगलूरकर यांच्याकडून जनतेचा बुद्धिभेद विकास लवांडे आपल्या पोस्टमध्ये जोडलेल्या व्हिडिओचा दाखला देत म्हणाले, हा घ्या आणखी एक पुरावा. हे आहेत देगलूरकर फडाचे शब्दप्रभू चैतन्य देगलूरकर आणि त्यांचे 2024 मधील पंढरपुरातील कीर्तनकारांच्या मेळाव्यातील भाषण. वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य सर्व काही संपणार आहे म्हणून भाजप शिवाय कुणीच आपल्याला वाचवणार नाही. अशी काल्पनिक भीती दाखवून निवडणुकीत प्रचार कसा करावा, जनतेचा बुद्धिभेद कसा करावा याचे आपल्या रसाळ वाणीने प्रशिक्षण देत आहेत. त्यानंतर राज्यात अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनातून भाजपाचा उघड खरा नव्हे खोटा प्रचार करत होते. सामान्य जनतेचा बुद्धिभेद करत होते. भागवत वारकरी संप्रदायातील संतांच्या कोणत्या ग्रंथात आहेत ? राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय नवा मंत्र रुजवणाऱ्या सन्माननीय देगलूरकर यांना वारकरी संप्रदायातील घुसखोर नाही म्हणायचे तर काय मग म्हणायचे ? त्यांच्या समर्थकांनी सांगावे. बाकी त्यांच्या देगलूरकर फडाचा पूर्व इतिहास, ते वर्णवर्चस्ववादी आहेत की नाही, त्यांची घराची परंपरा याच्याशी मला आत्ता काहीच बोलायचे नाही बोललो नाही. राम कृष्ण हरी, असे ते म्हणालेत. काय म्हणत आहेत देगलूरकर आपल्या व्हिडिओत? चैतन्य देगलूरकर आपल्या व्हिडिओत म्हणत आहेत की, मी साधा प्रश्न आपल्याला विचारतो, तुम्ही हाच प्रश्न कीर्तनातून समाजाला विचारा. मला सांगा, रामगिरी महाराजांचे काय चुकले? साधा प्रश्न आहे. काय चुकले त्यांचे? त्यांचे जे तथाकथित स्कॉलर्स म्हणून भाषणे देतात त्यांच्या भाषणातून हेच वक्तव्य येते. तेच वक्तव्य रामगिरी बाबांनी केले. आजही आपण तेच सांगू. झालंय ते झालंय. 9 वर्षांच्या मुलीशी लग्न झालंय. करता काय त्याला. हा इतिहास आहे. वस्तुस्थिती आहे. त्याला मी किंवा तुम्ही काही करू शकत नाही. इतिहास बदलणे हे कुणाच्याही हातात नाही. पण इतिहासातून शिकणे हे सगळ्यांच्या हातात आहे. आणि हे केलेच पाहिजे. आता व्यक्तिगत संबंधांना फारसा अर्थ राहिला नाही. व्यक्तिगत संबंधांना अर्थ नाही. सुदैवाने माझे खूप चांगले आहे. माझ्या मतदारसंघात जो उभा राहत आहे, तो माझ्या प्रेमाचाच आहे. त्यामुळे मला दुसऱ्या विकल्पाचा प्रश्नच नाही. पण अनेक ठिकाणी अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत की, तिथे प्रेमातला मनुष्य असतो, पण तो दुसऱ्या पक्षाचा असतो. त्यामुळे मी म्हणालो की, या निवडणुकीत वैयक्तिक संबंधांना धर्मासाठी, आपले अस्तित्व राखण्यासाठी, आपली विचारधारा अबाधित ठेवण्यासाठी, आपला धर्म राखण्यासाठी, आपले वाड्मय राखण्यासाठी हे सर्व बाजूला ठेवा. आपल्या अंतःकरणात धर्मनिष्ठता वाढती राहिली पाहिजे. कुठेतरी आपल्या अंतःकरणात आपले जाज्वल्य विचार नेहमी जागृत राहिले पाहिजे, यासाठी आपण नेहमी जागृत राहिले पाहिजे. आम्हाला चातुर्मासातून दुर्दैवाने बाहेर पडता येणार नाही. पण ज्यावेळी आमचे प्रवचनांची सांगता होईल, त्यावेळी यासंबंधीचे सविस्तर चिंतन आम्ही आमच्या प्रवचनातून मांडू. आम्हालाही याची काळजी आहे. आज तुम्ही जर तुम्ही योग्य बटणे दाबलीत, तर पुढचा चातुर्मास करता येण्याची शक्यता आहे. अन्यथा नाही. हे ही राहणार नाही. आपण योग्य बटण दाबून हिंदू उमेदवार निवडून दिले, हिंदुत्वाचा परामर्श घेऊन चालले पाहिजे. अहो काय केली हिंदुत्त्वाची व्याख्या. त्याला जीवनशैलीशी जोडण्यात आले. पण हिंदूत्व ही जीवनशैली नाही. ते आमचे रक्त आहे, हिंदूत्व हा आमचा प्राण आहे. हिंदूत्व हा आमची अस्मिता आहे, धर्म आहे. हिंदू हा आमचा संप्रदाय आहे. म्हणून हिंदू हा आमचे अस्तित्व आहे, या विचाराने आपण त्याच्याकडे पाहिले पाहिजे व त्या दृष्टिनेच आपण प्रवृत्त झाले पाहिजे. आत्ता फक्त अयोध्या झाली आहे. आपण योग्य बटणे दाबली तर नजिकच्या काळात मथुरा व काशी या दोन्हीकडे या दर्शनाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे हा विचार वाटतो तेवढा सामान्य नाही. हे हिमनगाचे एक टोक आहे. त्याच्या खाली फार मोठी षडंयंत्रे आहेत. फार मोठा दुर्विचार व दुर्बुद्धी आहे. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या आमच्या हातात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे हिंदूत्वाचा अभिनिवेष बाळगणाऱ्या उमेदवारा निवडून देणे. हे झाले की, शेवटी आपणच आहोत, असे बरेचकाही चैतन्य देगलूरकर म्हणालेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *