Headlines

जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावसाठी पाणी सोडणार‎:धरणाच्या डाव्या कालव्यातून जालना, परभणीसाठी पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग‎




जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने‎वाढ होत आहे. मात्र, माजलगाव धरणात केवळ‎१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे‎जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी‎पाणी सोडण्यात येणार आहे. माजलगाव धरणात‎२५ टक्क्यांपर्यंत साठा होईपर्यंत पाणी सोडण्यात‎येणार आहे. जालना, परभणी जिल्ह्यात पाऊस‎कमी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतून पाणी‎सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे‎येत्या २ ते ३ दिवसांत डाव्या कालव्यातून पाणी‎सोडण्यात येणार आहे.‎ मराठवाड्यात या वर्षी पाऊस कमी झाला‎आहे.त्यामुळे जायकवाडी हाच मोठा आधार‎छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या‎जिल्ह्यांसाठी आहे. सध्या खरिपासाठी पाऊस कमी‎असल्यामुळे सिंचनासाठी पाण्याचा मार्ग‎जायकवाडीमुळे मोकळा झाला आहे.‎ शुक्रवारी पाणी सोडणार बीडमधील अधीक्षक‎अभियंता पल्लवी काळे यांनी ‘दिव्य मराठी’शी‎बोलताना सांगितले की, माजलगाव धरणात‎पाणीसाठा अत्यल्प आहे. सध्या पाण्याची गरज‎आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून तयारी केली‎जात आहे. उजव्या कालव्यातून साधारण ११००‎क्युसेक पाणी सोडण्याची तयारी केली जात आहे.‎डाव्या कालव्यातून १ लाख ४१ हजार हेक्टर सिंचन‎होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड‎जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. जालना,‎परभणी जिल्ह्यांतून पाणी सोडण्याची मागणी‎करण्यात आली आहे. त्यामुळे हे पाणी सोडल्यास‎कापूस, सोयाबीन, तूर पिकांना खरिपात संरक्षक‎पाणी पाळी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे‎शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. संभाजीनगर,‎जालना, बीड या जिल्ह्यांत आतापर्यंत खरिपाच्या‎१७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.‎ परभणी जिल्ह्यामध्ये‎आतापर्यंत ५७ % पाऊस‎ परभणी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ‎२०० मिमी पाऊस झाला आहे. ३५०‎मिमी पाऊस अपेक्षित असताना‎सरासरीच्या केवळ ५७ टक्के आहे.‎परभणीत जायकवाडीचे ९७ हजार‎हेक्टर क्षेत्र आहे. डाव्या कालव्याच्या‎माध्यमातून १ लाख ४१ हजार हेक्टर‎सिंचन होते. कालव्यातून पाणी‎सोडल्याने विहिरीच्या पातळीत वाढ‎होण्यासाठी मदत होईल. जलसंपदा‎विभागाकडून मान्यता देण्यात आली‎आहे, अशी माहिती अधीक्षक‎अभियंता राजेंद्र धोपटकर यांनी दिली.‎ साठा ६५ टक्के, समन्यायी‎पाणी वाटपाची बैठक रद्द‎ जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा अधिक‎पाणीसाठा झाला आहे. जायकवाडीत ६५‎टक्क्यापेक्षा कमी साठा झाल्यास समन्यायी‎पाणी वाटपासाठी ऊर्ध्व गोदावरी‎खोऱ्यातील धरणांतून पाणी सोडले जाते.‎अनेकदा अहिल्यानगर, नाशिक विरुद्ध‎मराठवाडा असा वाद होतो. मात्र,‎जायकवाडीत ६७ टक्के पाणीसाठा‎झाल्यामुळे नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती‎संभाजीनगर यांच्यात समन्यायी पाणी‎वाटपासाठी होणारी बैठक यंदा होणार‎नसल्याचे जलसंपदा विभागातील‎अधिकाऱ्यांनी सांगितले.‎ ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील‎धरणे पूर्णपणे भरत आली‎ जायकवाडी प्रकल्पाचे बहुतांश‎पाणलोट क्षेत्र अहिल्यानगर व‎नाशिक जिल्ह्यांत आहे. संभाजीनगर‎जिल्ह्यात मुक्त पाणलोट क्षेत्राचा‎भाग येतो. त्यात कन्नड, वैजापूर,‎गंगापूर, छत्रपती संभाजीनगर या‎तालुक्यांचा भाग आहे. मात्र,‎प्रकल्पात बहुतांश पाणी‎अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यांतून‎येते. यंदा गोदावरी खोऱ्यांतील २१‎धरणांमध्ये सध्या ८६ टक्के‎जलसाठा आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *