![]()
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशातील युवकांनासोबत घेऊन विशेषतः जेन-झी पिढीला सोबत घेत मोठे आंदोलन उभारले होते. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि यश आले. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनंतर अभिजीत दिपके महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत. विमानतळावर उतरल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके म्हणाले, आज 40 दिवसांनंतर आणि एवढ्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो आहे, याचा मला खूप आनंद आहे. जेव्हापासून मी भारतात आलो तेव्हापासून आंदोलनच सुरू होते. त्यानंतर या आंदोलनाला यश आले आहे, देशातील विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे. आज घरी येतोय, याचा आनंद होत आहे. पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की सरकारने आता सुधरावे. 20 जुलैला जे तुम्ही विद्यार्थ्यांचे रक्त वाहिले, ते अतिशय वाईट होते. त्यानंतरही तुमचे मन भरले नाही. वेगवेगळ्या राज्यात ते विद्यार्थ्यांना घरी जाऊन त्रास देत आहेत. ते विद्यार्थी काही आतंकवादी नाही. ते या देशाचे भविष्य आहे. आज तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे, सरकारला जाग नाही आली तर हे विद्यार्थी हे सरकार सुद्धा बदलतील, असा इशारा दिपके यांनी दिला आहे. आम्हाला त्याची काळजी लागलेली असायची- अभिजीत दिपकेंचे वडील दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या विमानतळावर आगमनापूर्वी अभिजीतच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्हाला त्याची काळजी लागलेली असायची. आता तो सुखरूप येत आहे. आणि त्याच्या आईने त्याला गुरु म्हटले आहे, आता त्याच्या आईने म्हटले म्हणजे आहे. त्याने स्वतःचा जॉब देशासाठी सोडून दिला, या देशाच्या युवकांसाठी त्याने आंदोलन केले. आम्हाला एकदा धमकी सुद्धा आलेली होती. पण ते एकदाच झाले, त्यानंतर असे काही घडले नव्हते.
Source link
…तर हे विद्यार्थी सरकार सुद्धा बदलतील:अभिजीत दिपकेंचा इशारा; जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर दिपके छत्रपती संभाजीनगरात दाखल