Headlines

वाराणसीत 20 तास पाऊस, 5 जणांचा मृत्यू:छत्तीसगडमध्ये नदी, नाल्यांना पूर, MP च्या 5 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा




मध्य प्रदेशात मान्सून सक्रिय आहे. हवामान विभागाने टीकमगढ, दमोह, नरसिंगपूर, बैतूल आणि राजगडमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तीन दिवस राज्यात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये २० तासांच्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. रस्ते आणि गल्ल्या पाण्याने भरल्या. अनेक घरांमध्येही पाणी शिरले. शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. दिल्लीच्या अनेक भागांत मंगळवारीही जोरदार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. गेल्या २४ तासांत अनेक भागांत सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली. छत्तीसगडमध्ये गेल्या २४ तासांत बस्तर, रायपूर, बिलासपूर आणि सरगुजा विभागात मुसळधार पाऊस झाला. कोरबामध्ये जोरदार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. उत्तराखंडमध्ये हवामान विभागाने देहरादून, पिथौरागढ, नैनिताल आणि बागेश्वर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विभागाच्या मते, या जिल्ह्यांमध्ये एक आठवडा हवामान खराब राहणार आहे. सॅटेलाइट नकाशात मान्सून ढगांची स्थिती पहा देशभरातील हवामानाची छायाचित्रे
देशभरातील हवामानाशी संबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी खाली दिलेला लाइव्ह ब्लॉग पहा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *