Headlines

नागपुरात मायलेकीचा दुर्दैवी अंत:सुसाईड नोटमध्ये सासरच्यांना मृतदेह देण्यास नकार; काय आहे नेमके प्रकरण?

नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मायलेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगीत ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (विवाहित मुलगी) अशी मृतांची नावे असून, या दोघी नंदनवन परिसरात एकत्र राहत होत्या. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ…

Read More

मावळमध्ये धरण, नदीत बुडून 4 पर्यटकांचा मृत्यू:महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त घडली घटना

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. जाधववाडी धरण आणि पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिली हृदयद्रावक घटना नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरण परिसरात घडली. अजय गारुडे, संतोष एडके…

Read More

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:1 लाख 40 हजार पक्षी नष्ट करण्याचे 'कलिंग ऑपरेशन' सुरू

नवापूर शहरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन विभागाने आज १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ‘कलिंग ऑपरेशन’ (पक्षी नष्ट करण्याची मोहीम) अधिकृतपणे सुरू केली आहे. शहरालगतच्या तीन प्रमुख पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे 40 कर्मचारी 10 अधिकारी…

Read More

'राजा शिवाजी' 1 मे रोजी प्रदर्शित:प्रदर्शनानिमित्त रितेश-जेनेलिया तुळजाभवानीच्या चरणी; तुळजाईचा आशीर्वाद घेत केली आरती

‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दांपत्याने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींची आरती करत त्यांनी पारंपरिक पद्धतीने कुलधर्म व कुलाचार केले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनेलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला…

Read More

एमपीमधील क्रूझ अपघातात पायलटसह 3 जणांना बडतर्फ केले:एक कर्मचारी निलंबित, बरगी धरणात 9 मृतदेह सापडले, 3 मुलांसह 4 अजूनही बेपत्ता

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी सुमारे ५ वाजता पर्यटन विभागाचे एक क्रूझ अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे बुडाले. आतापर्यंत ९ मृतदेह सापडले आहेत. प्रशासनानुसार, २८ लोकांना वाचवण्यात आले आहे. तीन मुलांसह ४ लोक बेपत्ता आहेत. शुक्रवार संध्याकाळपर्यंत बेपत्ता लोकांचा शोध लागला नाही. बचावकार्यादरम्यान तिथे जोरदार पाऊसही सुरू झाला. त्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले आहे….

Read More

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सरकारला इशारा:शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू

शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास शासन का करीत आहे असा सवाल करीत सदर महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शुक्रवारी ता एक सरकारला दिला आहे. पत्रादेवी ते पवनार हा शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जात आहे. मात्र या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना…

Read More

बंगळुरूमध्ये जनगणनेसाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन:आवश्यक माहिती देण्यासही नकार दिला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बंगळुरूमध्ये राष्ट्रीय जनगणनेच्या कामादरम्यान एका महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्याने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि काम करण्यापासून रोखले. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 30 एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे 4 वाजता घडली. महिला गणक जनगणनेच्या कामासाठी टी दसरहल्ली परिसरातील मल्लासंद्रा येथील एका घरी गेल्या होत्या. त्याचवेळी…

Read More

सर्वोच्च न्यायालयाने पवन खेरा यांना अग्रिम जामीन मंजूर केला:म्हटले – न सांगता भारत सोडू नका; काँग्रेस म्हणाली – खेरा यांना घाबरवण्यासाठी 60 पोलिस पाठवले

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. हे प्रकरण आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे 3 परदेशी पासपोर्ट आणि अमेरिकेत 50 हजार कोटी रुपयांची कंपनी असल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. पवन खेरा यांनी 5 एप्रिल रोजी दिल्ली आणि गुवाहाटी येथे पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले होते. यानंतर रिनिकी भुईया…

Read More

शिवरायांचा इतिहास बदलण्याचे पाप कोणी केले?:बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त विधानावर जयंत पाटलांचा सवाल, सरकारवरही निशाणा

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर जगभरातील मराठी बांधवांचे आणि देशवासीयांचे अस्मितास्थान असल्याने त्यांच्या इतिहासावरून वारंवार सामाजिक आणि वैचारिक संघर्ष उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे. इतिहासाची सोयीस्कर मांडणी करण्यावरून होणाऱ्या वादात आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांच्या संदर्भात केलेल्या विधानाची भर पडली असून, यावरून नवा वाद…

Read More

पालघरमधील त्या दोन मृत्यूंचा उलगडा:अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहून जखमी मित्रानेही संपवली जीवनयात्रा, परिसरात खळबळ

पालघरमधील नानिवली येथे आज पहाटे दोन मित्रांचे मृतदेह आढळल्याच्या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला असून सीसीटीव्ही फुटेजमधून या भीषण अपघाताचे वास्तव समोर आले आहे. भरधाव वेगातील दुचाकी आधी इलेक्ट्रिक सोलर पोलला आणि नंतर थेट झाडावर आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अपघाताच्या या भीषण धक्क्यातून सावरू न शकलेल्या दुसऱ्या जखमी मित्राने शेजारीच असलेल्या झाडाला गळफास…

Read More