Headlines

मे महिन्याची सुरुवातच आव्हानात्मक:सूर्याने आग ओकल्यानंतर आता अवकाळी पावसाचे सावट, पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे

मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासाठी हवामानातील टोकाच्या बदलांची ठरली असून, एकीकडे पुणे आणि मुंबईसह अनेक शहरांत तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेल्याने नागरिक भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे जनजीवन होरपळून निघाले असतानाच, हवामान विभागाने आता अवकाळी पावसाचा इशारा देऊन राज्याच्या हवामानात नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. कडाक्याची उष्णता आणि संभाव्य अवकाळी पाऊस…

Read More

कुनिका सदानंदने दर्ग्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली:भागवत कथेत जाण्याचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली- दर्गा, मंदिर, चर्च, गुरुद्वारा सर्व ठिकाणी जाते

टीव्ही शो बिग बॉस 19 ची स्पर्धक आणि अभिनेत्री कुनिका सदानंदने नुकत्याच व्हायरल झालेल्या तिच्या दर्ग्यावर चादर चढवण्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. खरं तर, कुनिकाच्या एका पोस्टमध्ये एका युझरने X वर कमेंट करत अभिनेत्रीचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, मजारवर जाणाऱ्यांना मंदिरात जाणाऱ्यांशी अडचण होईल. तू फक्त एक गुलाम आहेस, आम्ही तुझं दुःख समजू शकतो. दुसरं…

Read More

From Label Sticker to Global Economys Face

न्यूयॉर्क2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आठ वर्षे…तीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष… 66 दर निश्चिती बैठका…महामारी, महागाई, राजकीय हल्ले, गुन्हेगारी तपास. या सगळ्या दरम्यान जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची सूत्रे हाती घेतली. 29 एप्रिल रोजी त्यांनी फेड चेअर म्हणून शेवटची धोरणात्मक बैठक घेतली. त्यांची कथा विश्वास, दबाव आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण बनली आहे. 15 मे रोजी चेअरमन…

Read More

मंत्री झिरवाळांनी हिंगोलीकरांच्या भावना दुखावल्या:कयाधूचे पाणी इसापूर मार्गे नांदेडला वळवण्याच्या विधानावर वाद होण्याची शक्यता

कयाधूच्या पाण्यावरून पालकमंत्री झिरवळांच्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे, हिंगोलीत मुबलक पाणी असेल तर त्यांनी पाणी न्यावे ः पालकमंत्री झिरवाळ हिंगोली जिल्ह्यातील कयाधूच्या पाणी प्रश्‍नावरर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनासाठी तसेच पाण्याची तहान भागत असेल तर इतर पाणी त्यांनी पाणी न्यावे,” असे विधान करत त्यांनी शेतकऱ्यांच्या…

Read More

साडीला इस्त्री करण्याच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीचा विनयभंग:गोंदियातील सेवानिवृत्त प्राचार्याचे संतापजनक कृत्य; आरोपी फरार

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे एका सेवानिवृत्त प्राचार्याने त्याच्याच घरी भाड्याने असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. एका सेवानिवृत्त प्राचार्याने असे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पत्नीच्या साडीला इस्त्री करून देण्याची बहाण्याने आरोपीने मुलीला घरी बोलावले व गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. “माझ्या पत्नीच्या साडीला प्रेस…

Read More

2025 मध्ये 4.4 कोटी भारतीयांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले:दक्षिणेकडील महिला सोने, तर उत्तर भारतातील व्यवसायासाठी घेत आहेत कर्ज

भारतीय कर्ज बाजाराचे स्वरूप बदलत आहे. पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांच्या (न्यू टू क्रेडिट) शर्यतीत महिला पुरुषांना टक्कर देत आहेत. क्रेडिट एजन्सी क्रिफ हाय मार्कच्या ‘ब्रिजिंग द गॅप’ अहवालानुसार, फेब्रुवारी 2026 पर्यंत 12 महिन्यांत महिलांचा सहभाग 41% झाला आहे, जो फेब्रुवारी 2022 पर्यंत 33% होता. म्हणजेच, 10 पैकी 4 नवीन कर्जदार महिला आहेत. विशेष म्हणजे, टीव्ही, फ्रीज,…

Read More

मिसिंग लिंक नाही, तर कनेक्टिंग लिंक म्हणा:मुख्यमंत्र्यांचे आवाहन; तत्कालीन ठाकरे सरकारची 13 कारणे फेटाळली, सुप्रिया सुळेंनाही प्रत्युत्तर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू…

Read More

भाजपची साथ सोडली तरच विलिनीकरण शक्य:रोहित पवारांची NCP पुढे अट; बारामतीत 'पवार विरुद्ध पवार' लढत होण्याचेही दिले संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या संभाव्य विलिनीकरणाची तार छेडली आहे. पण यासाठी त्यांनी राष्ट्रवादीपुढे भाजपची साथ सोडण्याची अट ठेवली आहे. अजित पवारांच्या पक्षाने भाजपची साथ सोडली, तरच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत…

Read More

महाराष्ट्र दिन सुतकी पद्धतीने?:राज ठाकरेंची टीका, हुतात्मा स्मारकावरून घेरलं; भावनिक आवाहन करत सरकारच्या भूमिकेवर सवाल

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकातील परिस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. स्मारकाजवळील वातावरण आणि तयारी पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर सडेतोड पोस्ट लिहिली असून, सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हुतात्मा चौक येथे जाऊन राज ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन…

Read More

दगडूशेठ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य:पुष्टिपती विनायक अवतार जयंतीनिमित्त ट्रस्टतर्फे शहाळे महोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे पुष्टिपती विनायक अवतार जयंतीनिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात दगडूशेठ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. उन्हाच्या काहिलीपासून भक्तांचे रक्षण व्हावे, दुष्काळ व पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्यात, यासाठी गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण…

Read More