किशोर रिठे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार:'सातपुड्याचा सातबारा' ग्रंथासाठी शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मान
अमरावती येथील ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांना महाराष्ट्राची आद्य साहित्य संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिष्ठित शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित एका समारंभात अभिनेता हृषीकेश जोशी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन २०२५ मधील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार देण्यात आले….