Headlines

एनसीआरबी रिपाेर्ट:गृहिणींच्या आत्महत्या दुप्पट; दर तासाला 5 जणींचा शेवट, आत्महत्येचे सर्वात माेठे कारण काैटुंबिक वाद, विवाहित महिलांचे प्रमाण अधिक

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर शासनासह सर्वत्रच चर्चा केली जाते. मात्र, ‘एनसीआरबी’च्या ताज्या अहवालातून एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. देशात शेतकऱ्यांच्या (६.२%) तुलनेत गृहिणींच्या (१३%) आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. २०२४ मध्ये तब्बल २२,११३ गृहिणींनी जीवन संपवले असून, दर तासाला ५ विवाहिता मृत्यूला कवटाळत आहेत. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या या…

Read More

अमरावतीजवळ डबा पार्टीस गेलेल्या भावंडांसह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू:घातखेडा तलावातील गाळात एकामागाेमाग चाैघेही अडकले

अमरावतीमधील खोलापुरी गेट परिसरातील दहा मुले-मुली रविवारी शहरापासून १० किमी अंतरावरील घातखेडा तलावाजवळ डबा पार्टीसाठी गेले होते. जेवणानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या १२ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागोमाग चौघेजण तलावातील गाळात अडकले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य ऊर्फ मानव नरेंद्र जोशी (१३), पायल बबलू पंडित (२१), यश गजानन काकणे (१३, सर्व…

Read More

‘झीरो कॉस्ट’ मॉडेल:नागपूर मेट्रोचा जागतिक विक्रम! रुळांवर वीजनिर्मिती; वर्षाकाठी 2,900 हून अधिक झाडे लावण्याइतका पर्यावरणाला फायदा

नागपूरने पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. नागपूर मेट्रो (महा मेट्रो) आता प्रवासी वाहतूक यंत्रणेसह चक्क एक ‘फिरते पॉवर हाऊस’ बनली आहे. रुळांच्या मधल्या जागेचा आणि पिलर्सचा कल्पकतेने वापर करून सौर ऊर्जा निर्मिती करणारी ही महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील अत्यंत नावीन्यपूर्ण मेट्रो ठरली असल्याची माहिती वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट संचार) अखिलेश हळवे…

Read More

प्रगतिशील शेतकरी:दुष्काळी माळरानावर केशर आंब्याची बाग; 35 एकरांतून 1 कोटी उत्पन्न, लातूरच्या शेतकऱ्याचा जिद्दी प्रयोग

मराठवाडा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो पाचवीला पुजलेला दुष्काळ. पण याच मातीत जिद्द असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या एका तरुण शेतकऱ्याने घालून दिले. निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे या शेतकऱ्याने आपल्या 35 एकर खडकाळ माळरानावर 12 हजार केशर आंब्यांची लागवड केली. विशेष म्हणजे, या वर्षी केवळ 6 हजार झाडांतून…

Read More

शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे:पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा मोठा फटका आता भारतीय जनजीवनाला बसू लागला आहे. राज्यात एकीकडे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत असतानाच, दुसरीकडे घरगुती गॅससाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेतून देशाला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले असून, अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी ‘संयम आणि बचतीचा’ मार्ग…

Read More

'ते पन्नास दिवस' कादंबरीची प्रेरणा स्थलांतरित मजुरांचा संघर्ष:प्रगतिशील लेखक संघाच्या 'गाठभेट लेखकाशी' कार्यक्रमात पवन भगत यांचे मत

अमरावती: ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे लेखक पवन भगत यांनी सांगितले की, कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या वाट्याला आलेला जीवघेणा संघर्षच त्यांच्या कादंबरीची प्रेरणा ठरला. प्रगतिशील लेखक संघाच्या चांदूर रेल्वे शाखेतर्फे आयोजित ‘गाठभेट लेखकाशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. करोना महामारीच्या काळात भारताच्या विविध महानगरांत स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल अत्यंत वेदनादायी होते. बंद पडलेली उद्योग…

Read More

कुसुमकोटमध्ये माजी विद्यार्थी शाळांच्या मदतीसाठी पुढे:'मेळघाट शिक्षण लोकसंवाद' अभियानांतर्गत घेतला पुढाकार

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथील शाळांच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘खोज’ संस्थेच्या ‘मेळघाट शिक्षण लोकसंवाद’ कार्यक्रमांतर्गत नुकताच मोंटफोर्ट शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील सर्व शाळांच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. ‘खोज’ संस्थेने हाती घेतलेला ‘मेळघाट शिक्षण लोकसंवाद’ कार्यक्रम केजी ते पीजी शिक्षण भक्कम आणि दर्जेदार असावे यासाठी…

Read More

चिखलदरा अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के:सर्व 17 दृष्टीबाधित विद्यार्थी उत्तीर्ण, यशाची परंपरा कायम

चिखलदरा येथील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) संचालित निवासी अंध विद्यालयाने यावर्षीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवला आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व १७ दृष्टीबाधित विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. आकाश वाघमारे याने ८५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, ऋतुजा नांदुरकर आणि आरती गायकवाड यांनी प्रत्येकी ८३.८० टक्के गुण मिळवले….

Read More

42,680 जागांसाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू:पहिली यादी 14 मे रोजी, 19 पासून इनहाऊस कोटा, अल्पसंख्यकांनाही संधी

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये सुमारे ४२,६८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सोमवार, ११ मे पासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होत आहे, ज्याला ‘टप्पा दोन’ असे नाव देण्यात आले आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या निवडीचा पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. दहावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी घोषित…

Read More

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात कचऱ्याचे ढिग:खेळाडूंच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह, सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. विशेष म्हणजे, हा कचरा संकुलाच्या आतील नसून तो बाहेरून आणून टाकण्यात आला आहे. यामुळे क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत वास्तव्यास असलेल्या खेळाडूंचे आणि सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, येथील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या काही नागरिकांनीच संकुलातील कचऱ्याचा विषय समोर…

Read More