Headlines

तेल कंपन्यांना दररोज ₹1,700 कोटींचे नुकसान:10 आठवड्यांत ₹1 लाख कोटींचे नुकसान, कारण- जागतिक तणावामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले नाहीत

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती 50% पर्यंत वाढल्या आहेत. तरीही, भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या दोन वर्षांच्या पातळीवर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्या देशातील ग्राहकांना जागतिक ऊर्जा धक्क्यापासून वाचवण्यासाठी मोठा आर्थिक भार म्हणजेच नुकसान सोसत आहेत. पीटीआयच्या सूत्रांनुसार, गेल्या 10 आठवड्यांत या कंपन्यांना ₹1 लाख कोटींहून अधिक नुकसान…

Read More

अमरावती जिल्हा परिषदेत बदली सत्र सुरू:चार विभागांतील 38 कर्मचाऱ्यांचे स्थानांतर; आरोग्य विभागाचा टप्पा बाकी

अमरावती: जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रात चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात पूर्ण झाली. आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोमवारी केल्या जाणार आहेत. बदली सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन आयोजित…

Read More

आदर्श हायस्कूलचा दहावीत 100 टक्के निकाल:130 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत; भूमिका साखरे 97% गुणांसह प्रथम, जानवी येवले द्वितीय

दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल १३० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. या निकालात एकूण १०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. भूमिका साखरेने ९७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. जानवी येवलेने ९५ टक्के…

Read More

अंजनगाव सुर्जी खरीप बैठक:राजकारणामुळे शेतकरी संतप्त, अर्ध्यातूनच परतले; कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा, कृषी विभागावर प्रश्नचिन्ह

अंजनगाव सुर्जी येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा अधिक झाल्याने अनेक शेतकरी संतप्त होऊन बैठकीतून अर्ध्यातच निघून गेले. या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी विभागामार्फत सिद्धेश्वर मंगलम येथे ही तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार गजानन लवटे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीचा उद्देश शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तांत्रिक…

Read More

विजयच्या शपथविधीत राष्ट्रगीत-वंदे मातरमवर वाद:DMK म्हणाली- आधी तमिळ गीत वाजवण्याची परंपरा, याला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले; डावे-व्हीसीकेचाही विरोध

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधी समारंभात ‘तामिळ थाई वाजथु’ (तामिळ राज्यगीत) वाजवण्यापूर्वी ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ वाजवल्याने वाद सुरू झाला आहे. डीएमकेने यावर आक्षेप घेतला आहे. डीएमकेचे म्हणणे आहे की, राज्याच्या सन्मानासाठी तामीळ राज्यगीत सर्वात आधी वाजवले ​​पाहिजे होते, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेले. ही परंपरेच्या विरोधात आहे. यावर विजय यांच्या पक्षाने…

Read More

माझ्या मुलांना हिंदू धर्माविरुद्ध भडकवले जात आहे:सेलिना जेटली म्हणाली- त्यांना कुठेतरी लपवून ठेवले आहे; पतीवर घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने मदर्स डेच्या निमित्ताने एक अत्यंत भावनिक नोट शेअर केली आहे. तिने सांगितले की, तिला तिच्या मुलांपासून दूर ठेवले जात आहे आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं तर, सेलिना जेटली आणि तिचा पती पीटर हाग यांच्यात कायदेशीर वाद सुरू आहे. मुंबई पोलिसांनी पीटरविरुद्ध घरगुती हिंसाचार, क्रूरता आणि फसवणुकीच्या आरोपांखाली…

Read More

पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला:मनमाडमध्ये नाशिकच्या तरुणाचा, तर अमरावतीत 'रील' बनवताना 4 जणांचा बुडून मृत्यू

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूल आणि तलावांवर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच, दोन भीषण दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. मनमाडमध्ये लग्नासाठी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला, तर अमरावतीमध्ये रील बनवण्याच्या नादात चार मुला-मुलींना तलावात जलसमाधी मिळाली. मातृदिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लग्नासाठी आला अन् काळाने…

Read More

PM मोदी म्हणाले- पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा:भारतात मोठ्या तेलाच्या विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, आजच्या काळात पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा लागेल. शेजारील युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. पंतप्रधानांनी हैदराबादमध्ये सांगितले की, भारतावर या जागतिक संकटाचा परिणाम जास्त आहे, आपल्याकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत. ते म्हणाले की, ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. कारपूलिंग…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरण:रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तास चाकणकरांना प्रश्नांच्या फेऱ्यात पकडले होते. अशोक खरात प्रकरणात…

Read More

योगी मंत्रिमंडळात 6 नवीन मंत्री, 2 जणांना बढती मिळाली:शपथविधीनंतर राज्यपाल-मुख्यमंत्र्यांच्या पाया पडले

यूपीच्या योगी मंत्रिमंडळाचा आज दुसऱ्यांदा विस्तार झाला. 2 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री असे एकूण 6 नवीन सदस्य सामील झाले. तर 2 राज्यमंत्र्यांना पदोन्नती देऊन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले. राजभवनात रविवारी आयोजित समारंभात सर्वात आधी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली. त्यानंतर सपाचे बंडखोर आमदार मनोज पांडे यांनी शपथ घेतली. दोघांनाही कॅबिनेट मंत्री…

Read More