उजनी 15 दिवस उशिरा ‘मायनस’मध्ये ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याची कसरत:गतवर्षी एप्रिलमध्ये आले होते मृतसाठ्यात, सध्या 63 टीएमसी पाणीसाठा शिल्लक
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या १२ दिवसांत तब्बल १२ टीएमसी पाणी कमी झाले असून, मंगळवारी रात्री धरणाने उपयुक्त पाणीसाठ्यातून मृत साठ्यात (मायनस) प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत धरणातून विविध सिंचन योजना आणि नदीद्वारे सुमारे १० हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने प्रशासनासमोर ऑगस्टपर्यंत…