Headlines

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, विदर्भ- मराठवाड्यात उद्योगक्रांती:राज्यात उभारले जाणार ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशाल प्रकल्प; हजारो तरुणांना रोजगार

राज्यात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ₹89,731 कोटींच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे 20 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला…

Read More

Singapore Court Finds Byju Raveendran Guilty of Hiding Assets, Fines Him SGD 1 Million

Marathi News Business Singapore Court Finds Byju Raveendran Guilty Of Hiding Assets, Fines Him SGD 1 Million नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील पहिल्या एडटेक स्टार्टअपला युनिकॉर्न बनवणारे बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाने 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना त्यांच्या मालमत्तेशी (असेट्स) संबंधित कागदपत्रे लपवल्याबद्दल आणि त्यासंबंधीच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल दोषी…

Read More

विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे स्पष्ट बहुमत:तरी शिवसेना-राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; युतीत जागावाटपावरून चुरस वाढली

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीत भाजपचा मोठा दबदबा दिसून येत आहे. राज्यातील 17 पैकी 14 मतदारसंघांमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडे फक्त एका मतदारसंघात,…

Read More

Shivraj Singh Chauhan Modi Apnapan Book: 10 Kissey

विजय सिंह बघेल. भोपाळ2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या त्यांच्या 35 वर्षांच्या अनुभवांवर एक पुस्तक लिहिले आहे. ‘अपनापन : नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव’ नावाच्या या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीत मंगळवारी (26 मे) माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी…

Read More

इंधन दरवाढीविरोधात अमरावतीत काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने:ग्रामीण भागात खदखद; डिझेलच्या महागाईने शेतकरी होरपळणार‎

केंद्र सरकारच्या वतीने सलग चौथ्यांदा करण्यात आलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज, मंगळवार, २६ मे रोजी जयस्तंभ चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महागाईचे भीषण संकट ओढवले असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या…

Read More

वरुडमधील 32 टक्के लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित:मुदतवाढीसाठी आ. यावलकर यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट‎

महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु प्रशासकीय ढिसाळपणामुळे वरुड तालुक्यातील हजारो लाभार्थी एप्रिल महिन्याच्या अन्नधान्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत मोर्शी विधानसभेचे आमदार चंदू यावलकर यांनी थेट मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली….

Read More

29 वाहन धारकांना 2 लाख 90 हजाराचा दंड:अवैध वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर‎‎

शहरात वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून मंगळवारी २६ मे रोजी विशेष धडक मोहीम राबवण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २९ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित वाहनधारकांकडून एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात काही दिवसांपासून नियमबाह्य पद्धतीने…

Read More

निकृष्ठ धान्य पुरवठ्याचा भाकपकडून तीव्र निषेध:तहसीलदारांना दिले निवेदन, गहू खाण्यास चांगला नसून तांदळामध्ये बारीक चुरी, भुकटी मिश्रीत कण‎

सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना पुरविण्यात आलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान खाण्यायोग्य धान्य मिळावे, या मागणीसाठी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले . केंद्र व राज्य सरकार गरीब आणि निराधार जनतेला अन्नावाचून कोणी राहु नये, प्रत्येकास उपजिविका करता यावी, या उदात्त हेतूने प्रतिमानसी प्रतिमाह तीन किलो तांदूळ…

Read More

श्री रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग दर्जाची मागणी:2.50 कोटी मंजूर, तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेंतर्गत 2.50 कोटीतून 90% कामे पूर्ण‎

तालुक्यातील दहीहंडा येथील श्री संत रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह ग्रामविकास विभागाच्या सह . श्री रूपनाथ महाराज संस्थान हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील लाखो भाविक भक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे. महाराजांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येथे…

Read More

प्राजक्त तनपुरेंचा भाजपप्रवेश निश्चित? 30 मेची तारीख चर्चेत:विधानपरिषदेची उमेदवारीही ठरणार; जयंत पाटलांचा फोटो डीपीला ठेवला

अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात…

Read More