Headlines

मोर्शीतील अर्धवट पुलासाठी काँग्रेसचा 'करो या मरो' इशारा:पाच दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा प्रशासनाला इशारा

मोर्शी येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या पाच ते सात दिवसांत सुरू न झाल्यास ‘करो या मरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख श्रणित राऊत यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत प्रशासनाला आंदोलनाची पूर्वकल्पना दिली आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा या रस्त्याचे बांधकाम चार ते पाच वर्षांपासून पूर्ण झाले…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जमीन मंजूर!:महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेची पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा येथील १.१६ हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या (शासकीय निवास व्यवस्था) उभारणीसाठी मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. गारखेडा येथील सर्व्हे क्रमांक…

Read More

ग्रामपंचायत निवडणूक रद्द करा; सरपंच संघाची मागणी:आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने कायदेशीर पेच

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षणामुळे निर्माण झालेला कायदेशीर पेच ताजा असतानाच, आता आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघाने’ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री,…

Read More

तिवस्यात काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार:विधानपरिषद निवडणुकीत पक्षादेश पाळत शिर्डीत दाखल

तिवसा नगरपंचायतीच्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. पक्षाच्या आदेशाचे पालन करत हे नगरसेवक रातोरात शिर्डीला रवाना झाले होते. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, १५ पैकी उर्वरित तीन नगरसेवकांनी मात्र मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदारसंघात पाय ठेवला नाही. त्यांच्या आजारपणामुळे…

Read More

अचलपुरात काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा दाखल:मतदान केंद्रात मोबाईल वापरल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई

अचलपूर येथे विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रात मोबाईल बाळगल्याप्रकरणी एका काँग्रेस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्राध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी (SDO) बळवंतराव अरखराव यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले. अचलपूर आणि चांदूरबाजार येथील एकूण ६९ मतदारांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या…

Read More

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी सुरु:20 जूनपर्यंत मुदत, 22 ते 25 दरम्यान प्रत्यक्ष प्रवेश

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी गुरुवार, १८ जूनपासून अमरावतीत सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २० जूनपर्यंत चालणार आहे. यावर्षी अकरावीच्या सर्व शाखांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. या टप्प्यात नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे, तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना भाग-१ आणि भाग-२ मध्ये बदल करण्याची संधी मिळेल….

Read More

मेळघाट जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ:आता 1 जुलैपासून होणार बंद, सप्टेंबरअखेरपर्यंत राहणार स्थगित

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ही सफारी १५ जूनपासून बंद होणार होती, परंतु आता तिला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक आता ३० जूनपर्यंत सफारीचा लाभ घेऊ शकतील. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मेळघाटमधील जंगल सफारी आता १ जुलैपासून बंद केली जाईल. संभाव्य…

Read More

Pune Metro Line 3 Trial Success: Hingewadi-Shivajinagar Route Soon

पुणे मेट्रो लाईन ३ च्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या २३ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गावर ‘एंड-टू-एंड’ चाचणी फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता व्यावसायिक सेवा सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. . हा कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केला जाईल. पहिल्या टप्प्यात, माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय दरम्यानचा १३.३ किलोमीटरचा मार्ग जून २०२६…

Read More

भंडारा-गोंदिया, नागपुरात विधान परिषदेसाठी 100% मतदान:नागपुरात एमआयएम, मुस्लिम लीग तटस्थ; 22 जूनला मतमोजणी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून रोजी विदर्भातील भंडारा-गोंदिया आणि नागपूर येथे मतदान पार पडले. दोन्ही मतदारसंघांत लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावल्याने तब्बल १०० टक्के मतदानाची नोंद झाली. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या जागांवर यापूर्वीच अविरोध निवड झाल्याने, संपूर्ण राज्याचे लक्ष नागपूर आणि भंडारा-गोंदियाच्या लढतीकडे लागले होते. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात…

Read More

'राम मंदिराच्या बेईमानांना 7 पिढ्यांपर्यंत शाप लागेल':नृपेंद्र मिश्रा म्हणाले- चर्चा आहे की लोक खिशात नोटांची बंडले घेऊन गेले, बँकही वाचू शकत नाही

‘चंपत राय श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कर्तेधर्ते आहेत. चंपत राय यांच्या निष्ठेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ते गेल्या 35 वर्षांपासून मंदिर आंदोलनाशी जोडले गेले आहेत. पण देखरेखीमध्ये कमतरता राहिली आहे. देणगीमध्ये बेईमानी करणाऱ्यांना 7 पिढ्यांपर्यंत शाप लागेल.’ अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात माजी आयएएस नृपेंद्र मिश्रा यांनी एका मीडिया हाऊसशी बोलताना हे सांगितले. 71…

Read More