Headlines

इंडिगोचा मेगा प्लॅन, FY30 पर्यंत 20 कोटी प्रवाशांचे लक्ष्य:ताफ्यात 550 हून अधिक विमाने, आंतरराष्ट्रीय क्षमता 40% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट

भारताची सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने आर्थिक वर्ष 2029-30 (FY30) साठी आपली मेगा योजना सादर केली आहे. कंपनीचे उद्दिष्ट दरवर्षी सुमारे 200 दशलक्ष (20 कोटी) प्रवाशांना प्रवास घडवणे आणि भारताला एक मोठे जागतिक विमान वाहतूक संक्रमण केंद्र बनवणे आहे. ही ब्लूप्रिंट 8 जून रोजी एअरलाइनच्या ‘विश्लेषक दिनी’ सादर करण्यात आली. 5 घटक: इंडिगोच्या दीर्घकालीन योजनेची प्रमुख…

Read More

शेतकऱ्यांना हमीभावाचा मोठा दिलासा:महाराष्ट्राला 29.5 लाख क्विंटल अतिरिक्त धान खरेदीची मंजुरी; रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट थेट 89 लाख क्विंटलवर

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट केंद्र सरकारने तब्बल 29.5 लाख क्विंटलने वाढवून दिले आहे. यामुळे यंदाच्या हंगामातील एकूण धान खरेदीचे उद्दिष्ट 59.5 लाख क्विंटलवरून थेट 89 लाख क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती…

Read More

लग्नाविना सहमतीने संबंध वाईट चारित्र्याचा आधार नाही:सर्वोच्च न्यायालय म्हणाले – हा नैतिक दोष नाही, अर्जदाराच्या पोलिस नियुक्तीला मंजुरी दिली

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, दोन अविवाहित प्रौढांमधील सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य खराब ठरवण्याचा आधार बनवता येणार नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, असा कोणताही कायदा नाही जो दोन प्रौढ आणि अविवाहित व्यक्तींना त्यांच्या पसंतीचे संबंध ठेवण्यापासून प्रतिबंधित करतो. न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने तेलंगणा राज्यस्तरीय पोलिस भरती मंडळाच्या एका…

Read More

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस:सदर पाऊस पेरणीसाठी पुरेसा नाही, शेतकऱ्यांनी पेरणीचे घाई करू नये- कृषी विभाग

हिंगोली शहरासह जिल्हाभरात सोमवारी (ता. 8) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र सदर पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. हिंगोली जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मृगाच्या पहिल्याच दिवशी पावसाची प्रतिक्षा होती. मृग नक्षत्राच्या…

Read More

Jennifer Winget Wedding Rumours; Singapore Businessman

20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट लवकरच दुसरे लग्न करू शकते. ती सिंगापूरचा व्यावसायिक विल्यम इस्माईलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, विल्यमने एका सुट्टीदरम्यान जेनिफरला प्रपोज केले होते, ज्यासाठी तिने आपली संमती दिली आहे. मात्र, जेनिफर किंवा विल्यमकडून अजून या प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि तिचा प्रियकर…

Read More

मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:संघर्ष यात्रेदरम्यान आश्वासनांची काय स्थिती? ग्रामस्थांकडून घेताहेत माहिती‎

मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती. मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप जसेच्या तसे कायम असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या…

Read More

BYDच्या ‘सर्व काही स्वतःच बनवा’ मॉडेलची अग्निपरीक्षा:टेस्लाला मागे टाकणाऱ्या BYDचा नफा 4 वर्षांत पहिल्यांदाच घसरला

चीनमधील शेनझेन येथे ईव्ही क्षेत्रातील दिग्गज कंपनी बीवायडीचे मुख्यालय आहे. येथे येणाऱ्या पाहुण्यांना एक प्रात्यक्षिक पाहायला मिळत असे. एका ड्रिलने सामान्य ईव्हीला छेदले जात असे, ज्यामुळे ती लगेच आग पकडत असे. त्यानंतर बीवायडीच्या ब्लेड बॅटरीवर हेच प्रात्यक्षिक केले जात असे, पण ती सुरक्षित राहत असे. याच बॅटरीच्या जोरावर बीवायडी ईव्ही क्षेत्रात शिखरावर पोहोचली. पण आता…

Read More

वाढती महागाईवरून काँग्रेस आक्रमक:काँग्रेसने चुलीकडून गॅसवर आणले, भाजपने देशाला पुन्हा चुलीकडे नेले- विजय वडेट्टीवार

देशातील सध्याच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महागाईच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने नवी मुंबई येथे आंदोलन केले होते. त्यानंतर आता कॉंग्रेसनेही सरकारवर हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, कॉंग्रेसने देशाला चुलीकडून गॅसकडे नेले, देशाला पुन्हा गॅसकडून चुलीकडे नेण्याचे काम…

Read More

'ज्याचा दरबार लागत होता, त्याला दरबारी बनवले':नितीश कुमारविषयी आनंद मोहन यांचा JDU नेत्यांवर हल्ला; म्हणाले -आम्हालाही उत्तर देता येते

माजी खासदार आणि बाहुबली नेते आनंद मोहन यांनी पुन्हा एकदा नाव न घेता जेडीयूच्या काही नेत्यांवर तीव्र हल्ला चढवला आहे. मुजफ्फरपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, ‘विधानसभा निवडणुकीत ’25 ते 30, पुन्हा नितीश’ अशी घोषणा देण्यात आली होती, पण निवडणूक जिंकल्यानंतर अशा कोणत्या परिस्थिती निर्माण झाल्या की नितीश कुमार यांना सत्तेपासून दूर करण्यात आले?’ ते…

Read More

नाइट लँडिंगचे कारण देत गोव्याचे विमान 3 महिने बंद:हैदराबादच्या विमानाला सूर्यास्ताची अडचण पण गोव्याच्या उड्डाणावरही बंदी

सोलापूर-गोवा आणि सोलापूर- हैदराबाद ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सचे एकच विमान आहे. हैदराबादमधून सोलापुरात येणाऱ्या विमानाची वेळ सूर्यास्तावेळची आहे. नाइट लँडिंगच्या सुविधेअभावी पावसाळ्यात सूर्यास्तावेळी विमान टेकऑफ करणे कठीण आहे. त्यामुळे कंपनीने हैदराबादसह गोव्याचीही विमानसेवा २० जूनपासून पुढील ३ महिने म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादसाठी नाइट लँडिंगची अडचण असू शकेल, पण गोवा विमानाची वेळ…

Read More