Headlines

वैजापूरमध्ये कृषी विभागाला नियंत्रण कक्षाचाच विसर:शेतकऱ्यांना मनस्ताप, गावांतील शेतकरी राज्यस्तरीय तक्रार व्यवस्थेवर अवलंबून‎

खरीप हंगामात शेतकऱ्याला एखादी गंभीर अडचण आली किंवा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला, की त्याच्यासमोर पहिला प्रश्न उभा राहतो, आता मार्गदर्शनासाठी कोणाला फोन करायचा? वैजापूर तालुक्यात या प्रश्नाचे कोणतेही स्थानिक उत्तर मात्र कृषी विभागाकडे मिळत नाही. तब्बल १६४ गावांचा विस्तार असलेल्या या तालुक्यात कृषी विभागाची स्वतःची स्वतंत्र हेल्पलाईन किंवा नियंत्रण कक्ष नसल्याची बाब समोर आली आहे….

Read More

भरधाव कारच्या धडकेत निवृत्त वायरमनचा मृत्यू:पत्नी गंभीर, वैजापूर स्टेशन रोडवरील अपघात‎

शहरातील स्टेशन रोडवरील राजपाल क्लॉथ सेंटरसमोर रविवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महावितरणचे निवृत्त वायरमन माधव मुरलीधर दळवी (७७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पुष्पलता माधव दळवी (६७) या गंभीर जखमी झाल्या. मूळचे खंडाळा (ता. वैजापूर) येथील रहिवासी माधव दळवी यांनी महावितरणमध्ये वायरमन म्हणून संपूर्ण सेवा खंडाळा परिसरात बजावली…

Read More

पैठण येथील जांभूळबनात सेवेकऱ्यांचा पर्जन्यचंडीयाग:कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम

पैठण प्रशांत महासागरातील बदलांमुळे निर्माण झालेल्या एल निनोच्या प्रादुर्भावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जांभूळबनात रविवारी श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या वतीने पर्जन्यचंडीयाग करण्यात आला. देशावरचे दुष्काळाचे सावट टळावे आणि बळीराजा सुखावावा, यासाठी स्वामी चरणी सुपर्जन्यासाठी साकडे घालण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा व…

Read More

जायकवाडी धरणामध्ये 1986 नंतर मत्स्यबीज सोडण्यास मुहूर्तच मिळेना:50 हजार मच्छीमार 40 वर्षांपासून वन, मत्स्यव्यवसाय विभागात समन्वयाचा अभाव‎

जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदा घटत चालली असून १९८६ नंतर धरणात एकदाही शासकीय पातळीवर नियोजनबद्ध रीतीने नवीन मत्स्यबीज सोडण्यात आलेले नाही. तब्बल ४० वर्षांपासून नव्या मत्स्यबीज संचयनाला मुहूर्त न मिळाल्यामुळे जलाशयातील गोड्या पाण्यातील अनेक पारंपरिक माशांच्या प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रशासकीय अनास्थेमुळे धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे ५० हजार पारंपरिक मच्छीमारांचा रोजगार संकटात सापडला आहे….

Read More

मोदी मंत्रिमंडळातून हे 6 मंत्री बाहेर पडू शकतात:श्रीकांत शिंदेंसह 9 नवीन चेहऱ्यांच्या समावेशाची चर्चा; मोठ्या फेरबदलामागची कहाणी

धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना मोदी मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मंत्रालय बदलले जाण्याची आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना नवे अर्थमंत्री बनवले जाण्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, मोदी मंत्रिमंडळात हा मोठा फेरबदल पुढील काही आठवड्यांत होऊ शकतो. 1. धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री हे कोण आहेत: संघ आणि विद्यार्थी परिषदेची…

Read More

प्रगतिशील शेतकरी:आंतरपीक शेवग्याच्या पानांपासून दरमहा 40 हजारांचा नफा‎, अमरावतीच्या वरूड येथील शेतकऱ्याचा संत्रा बागेत शेवगा व लक्ष्मीतरूच्या लागवडीचा प्रयोग‎

पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित‎उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण‎‎शेतकऱ्याने संत्रा बाग कायम‎‎ठेवत त्यामध्ये मोरिंगा‎‎(शेवगा) आणि लक्ष्मीतरू‎‎यासारख्या आंतरपिकांची‎‎लागवड केली. या‎‎प्रयोगामुळे त्यांना दरमहा‎‎किमान मजुरी खर्च ज . अमरावती‎जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अजिंक्य खेरडे (३५) यांच्या प्रयाेगाचे सर्वत्र‎काैतुक हाेत अाहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत‎शिक्षण घेतले. काही वर्षे पुणे आणि नागपूर येथे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांच्याकडे‎वरूडपासून जवळच असलेल्या…

Read More

शिऊर येथील जि.प. शाळेचा लवकरच होणार कायापालट:वॉटरप्रूफिंग, फरशी, किचन शेड, रंगरंगोटीचे होणार काम

शिऊर केंद्रांतर्गत येणाऱ्या धनगर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा छताचा एक भाग पहिल्याच जोरदार पावसात कोसळल्याची खळबळजनक घटना घडली. सुदैवाने ही दुर्घटना शाळा सुटल्यानंतर बुधवारी घडल्याने मोठा अनर्थ टळला. याची तत्काळ दखल घेत शिऊर गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी शनिवारी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि स्वतःच्या खर्चातून संपूर्ण…

Read More

आज वटपौर्णिमा, पूजेचा मुहूर्त 6 ‎तास, भद्रा काळातही नाही अडथळा‎:सकाळी 9: 12 ते 10: 52 तर दुपारी 3:52 ते 7:12 वाजेपर्यंत शुभमुहूर्त‎

पतीच्या दीर्घायुष्यासाठी महत्त्वाची मानली‎जाणारी वटसावित्री पौर्णिमा सोमवारी साजरी‎होणार आहे. यंदा पहाटे ३.०७ पासून दुपारी‎४.१७ वाजेपर्यंत भद्रा काळ आहे. तरी‎ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला येणारा भद्रा‎दोष मानला जात नाही. हा काळ वर्ज्य नाही.‎त्यामुळे पूजेसाठी सकाळी तीन तास आणि‎सायंकाळी साडेतीन तास असा साडेसहा‎तासांचा विशेष पुण्यपर्वकाळ आहे.‎ हिंदू धर्मात वटवृक्षाला शिवस्वरूप मानून‎ब्रह्म, सावित्री आणि वटवृक्षाच्या पूजनाची‎प्राचीन परंपरा आहे. वटवृक्ष हा‎पर्यावरणाचा समतोल…

Read More

राम मंदिर देणगी चोरी…:सर्व 8 आरोपींच्या घरांवर छापे, कागदपत्रांसह इतर पुरावे जप्त; आरोपींना आज कोठडी मागणार

अयोध्या श्रीराम मंदिरात देणगीच्या कथित चोरीप्रकरणी पोलिस व प्रशासनाच्या पथकाने रविवारी सकाळी सात वाजता एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्व ८ आरोपींच्या घरांवर एकाच वेळी छापा टाकला. झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे व इतर पुरावे गोळा केले. कुटुंबीय व शेजाऱ्यांचीही चौकशी केली. आरोपींकडून ~७९.८५ लाख रुपयांची रोकड यापूर्वीच जप्त केली आहे. सोमवारी पोलिस आरोपींना न्यायालयात हजर करून कोठडीची…

Read More

प्रेमविवाहचा अंत:सांगलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या छातीवर बसून आवळला गळा, झोपेत मृत्यू झाल्याचा केला बनाव

पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्येची घटना ताजी असतानाच सांगलीच्या विश्रामबाग भागात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने तिच्या २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने छातीवर बसून गळा दाबून खून केला. प्रेमविवाह आणि दोन मुले असतानाही पत्नीने हे कृत्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद हणमंत सर्जे (२८, रा….

Read More