वैजापूरमध्ये कृषी विभागाला नियंत्रण कक्षाचाच विसर:शेतकऱ्यांना मनस्ताप, गावांतील शेतकरी राज्यस्तरीय तक्रार व्यवस्थेवर अवलंबून
खरीप हंगामात शेतकऱ्याला एखादी गंभीर अडचण आली किंवा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला, की त्याच्यासमोर पहिला प्रश्न उभा राहतो, आता मार्गदर्शनासाठी कोणाला फोन करायचा? वैजापूर तालुक्यात या प्रश्नाचे कोणतेही स्थानिक उत्तर मात्र कृषी विभागाकडे मिळत नाही. तब्बल १६४ गावांचा विस्तार असलेल्या या तालुक्यात कृषी विभागाची स्वतःची स्वतंत्र हेल्पलाईन किंवा नियंत्रण कक्ष नसल्याची बाब समोर आली आहे….