Headlines

एअरटेल व व्होडाफोन आयडियाला हायकोर्टाकडून दिलासा:सरकारचा वन-टाइम स्पेक्ट्रम चार्ज वसूल करण्याचा निर्णय रद्द; बँक हमी देखील परत मिळेल

मुंबई उच्च न्यायालयाने भारती एअरटेल लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेडवर केंद्र सरकारने लादलेला वन-टाइम स्पेक्ट्रम चार्ज (OTSC) रद्द केला आहे. न्यायालयाने निर्णय दिला की, दूरसंचार परवाने दिल्यानंतर अनेक वर्षांनी आर्थिक अटी पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रोस्पेक्टिव्ह) बदलण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही. न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम व्ही. शिरसाट यांच्या खंडपीठाने सरकारच्या २०१२ च्या या निर्णयाला रद्द…

Read More

हिंगोलीत पाच दिवसांचे नवजात अर्भक काट्यात फेकले:पोलिसांच्या सतर्कतेने अर्भकास जिवदान, शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल

हिंगोली शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोरील निवासस्थानांच्या जवळ पाच दिवसांचे अर्भक सोमवारी ता. ८ दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास काट्यात फेकलेले आढळून आले. हिंगोली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अर्भकाला काट्यातून बाहेर काढून शासकिय रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून नवजात अर्भक फेकणाऱ्या मातेचा शोध सुरु…

Read More

ऑपरेशन सिंदूरचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा यांना वीर चक्र:3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या कर्नलला शौर्य चक्र मिळाले, राष्ट्रपतींनी जवानांचा सन्मान केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण समारंभात 7 कीर्ती चक्र, 15 वीर चक्र आणि 29 शौर्य चक्र प्रदान केले. सन्मानित झालेल्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा यांचाही समावेश होता, ज्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसेच, LoC वर 3 दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल नितेश भारती शुक्ला…

Read More

July Tariff Rates, UK Talks Boost 2026

नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा लवकरच अंतिम होऊ शकतो. दोन्ही देशांमधील हा करार जुलैनंतर भारतीय निर्यातीवर लागू होणाऱ्या शुल्क दरांवर पुष्टी मिळाल्यानंतर अंतिम रूप घेईल. सरकारी सूत्रांनुसार, अमेरिकेच्या कलम 301 च्या प्रक्रियेअंतर्गत जो शुल्क दर निश्चित केला जाईल, तोच दर या व्यापार करारात भारतासाठीही लागू होण्याची शक्यता…

Read More

जागतिक महासागर दिन विशेष‎:महासागर खेचतोय मान्सूनचे ढग, पावसाची 8 टक्के तूट शक्य; 10 वर्षांत तिसऱ्यांदा कमी पाऊस‎

महासागरातील तापमानातील बदलानुसार‎पर्जन्यमानात मोठे बदल पहायला मिळतात.‎मागील दहा वर्षातील पर्जन्यमान पाहता,‎अहिल्यानगर जिल्ह्यात दर दोन ते चार‎वर्षांनी पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसून‎येते. यापूर्वी २०२३ मध्ये कमी पाऊस झाला‎होता. आता पुन्हा २०२६ मध्ये पॅसिफिक‎महासागराचे तापमान‎ ०.५ अंशापेक्षा अधिक वाढल्याने,‎ एलनिनोचा प्रभाव निर्माण झाला. त्यामुळे‎ अहिल्यानगरसह भारतातील मान्सूनचे‎ ढग तिकडे ओढले जाऊन आठ ते दहा‎टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज‎…

Read More

अखेर नाफेडची बाजार समित्यांमध्ये एंट्री!:कांदा उत्पादकांना मोठा दिलासा; आजपासून 2 लाख टन खरेदीला सुरुवात, किती मिळणार दर?

नाशिक जिल्ह्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला योग्य भाव मिळावा, नाफेड आणि एनसीसीएफमार्फत थेट बाजार समित्यांमधून खरेदी व्हावी आणि सरकारने बाजारात हस्तक्षेप करावा, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांनंतर अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि NCCF मार्फत…

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:प्रेमविवाहानंतरच्या छळातून युवकाची आत्महत्या दहा जणांवर गुन्हा

प्रेमविवाह केल्यानंतर सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात एका युवकाच्या आत्महत्येनंतर दहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दहिगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील किरण महादेव ढवळे (३५) यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना घडली. त्यांच्या बहिणी शितल ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रेमविवाहाचा…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पुढे ढकलला:एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे तारखांमध्ये बदल, 10 ऐवजी 11 जूनला होणार!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यंदाचा 27 वा वर्धापन दिन एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला असून, आता हा सोहळा गुरुवार, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. दरवर्षी 10 जून रोजी साजरा होणाऱ्या या पक्षीय सोहळ्याच्या तारखेत नवी दिल्लीत ‘एनडीए’ची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने बदल करण्यात आला…

Read More

ट्विशा प्रकरण- दोरी एम्सला पाठवली नाही, SI च्या कारमध्ये ठेवली:फासाची ओळख पटवण्याचे रेकॉर्ड नाही; गिरिबालापर्यंत पोहोचताहेत तपासाचे धागेदोरे

अभिनेत्री ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय या प्रकरणातील दुवे जोडण्यात व्यस्त आहे, परंतु त्यापूर्वी झालेल्या पोलीस तपासाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या वतीने जबलपूर उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमधून समोर आले आहे की, तपासाशी संबंधित महत्त्वाचे तथ्य त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचत होते. यामुळेच त्यांना वेळेत अटकपूर्व जामीन…

Read More

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशासाठी "वासुदेवाची' साद:विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीच्या मोहिमेचा शुभारंभ; प्रभातफेरी काढून जागर

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे एका अनोख्या प्रवेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांनी चक्क ‘वासुदेवा’चे रूप धारण करून घरोघरी जात, पालकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचे भावनिक आणि प्रभावी आवाहन गायनाच्या माध्यमातून…

Read More