राजकारणाचा चिखल करणाऱ्या नेत्यांचा माज आता जनतेनेच उतरवावा:गाड्या, पैसा असणाऱ्यांना अन् मित्रांनाच उमेदवारी- अमित ठाकरे
राजकारणाचा सध्या जो चिखल झाला आहे, त्याकडे आता जनतेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राजकीय पक्ष ज्याला उमेदवारी देतील तो जिंकेलच, हा नेत्यांचा अवाजवी आत्मविश्वास लोकांनीच आता मोडून काढला पाहिजे. जनतेमुळेच आपण तिथे खुर्चीवर बसलो आहोत, याची जाणीव आता नेत्यांना करून देण्याची वेळ आली आहे, असे म्हणत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र…