साल्हेर ग्रामपंचायतीला महिलांनी लावले कुलूप:पाणीटंचाईने वाढला संताप; अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने जोरदार घोषणाबाजी
तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्यासाल्हेर येथील महिलांनी रविवारी(दि. ७) थेट ग्रामपंचायतकार्यालयाला कुलूप ठोकतप्रशासनाविरोधात आक्रमक पवित्राघेतला. पिण्याच्या पाण्यासाठीवणवण भटकंती करावी लागतअसताना ग्रामपंचायत कार्यालयातएकही जबाबदार अधिकारी अथवाकर्मचारी उपस्थित नसल्यानेमहिलांचा संताप अनावर झाला.//”पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खालीकरा,” अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. साल्हेर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैलभटकंती…