महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार:24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळणार वेग
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने १ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही भागांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामानातील या बदलामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण आहे. नद्यांना पूर, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ…