Headlines

'प्रत्येक स्त्री सन्मानाची हक्कदार आहे':'पेद्दी'मध्ये जान्हवीच्या भूमिकेवर आक्षेपानंतर दिग्दर्शकाची माफी, म्हटले- आक्षेपार्ह दृश्यांमध्ये बदल करू

फिल्म पेद्दीमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘अचियम्मा’ या भूमिकेवरून निर्माण झालेल्या वादामुळे दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चित्रपटातील महिला पात्राच्या सादरीकरणावर आक्षेप घेतला होता, त्यानंतर दिग्दर्शकाने प्रतिक्रिया देत महिलांच्या सन्मानाबद्दल बोलले आणि वादग्रस्त दृश्यांमध्ये बदल करण्याची ग्वाही दिली. दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर एक निवेदन…

Read More

देवस्थान इनाम जमिनींवर सरकारचा मोठा निर्णय:देवस्थानांचे हक्क अबाधित ठेवणार; बावनकुळेंची घोषणा, नवा कायदा डिसेंबरमध्ये

राज्यातील देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची घोषणा करत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यात सुमारे 5.5 लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनी असून या जमिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून विविध देवस्थानांना देण्यात आल्या होत्या. मात्र कालांतराने…

Read More

निदा खान प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रभर:संभाजीनगरमधील कथित धर्मांतर प्रकरणावरून संजय शिरसाट आक्रमक, वडेट्टीवारांवर वेड्याच्या रुग्णालयात उपचार करण्याची वेळ

शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी विविध राजकीय घडामोडींवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कथित धर्मांतर आणि फसवणुकीच्या प्रकरणाचा संदर्भ देत शिरसाट म्हणाले की, ‘निदा खान प्रकरण’ हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे आणि आता…

Read More

एआय तंत्रज्ञानातून ऊस उत्पादनात हमखास वाढ:कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेत शास्त्रज्ञ डॉ.एन.एन.पाटील यांचे मार्गदर्शन‎

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे हे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या राज्यस्तरीय समितीवर कार्यरत असून, त्यांच्या पुढाकारामुळे सभासद शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात हमखास वाढ होत आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. एन. एन. पाटील यांनी केले. शिंगणापूर येथील कोल्हे साखर कारखान्यात ऊस…

Read More

सोनईत एसटीच्या फलाटावर चक्क अवैध वाहनांचा वावर:ग्रामस्थ अन् विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप, नगरपर्यंत शटल बससेवेची मागणी‎

सोनई, शिंगणापूर, घोडेगाव ते अहिल्यानगर या मार्गावरील बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी सोनई व परिसरातील ग्रामस्थांनी नेवासा आगार व्यवस्थापकांकडे केली. मात्र, चालक, वाहक आणि गाड्यांच्या तुटवड्याचे रडगाणे पुढे करत महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी या मार्गावर बस सुरू करण्यास तूर्तास नकार दिला आहे. तर बसस्थानकातील फलाटावर अवैध खासगी वाहने प्रवासी…

Read More

कापरेवाडीत पर्यावरण रक्षणासाठी एकवटले शेकडो हात:कापरेवाडीमध्ये महाश्रमदान व वृक्षारोपणात ग्रामस्थांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग‎

“जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी पर्यावरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या काळात ‘पर्यावरण जगले तरच आपण जगू’ हे माणसाने वेळीच ओळखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे,” . यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना हभप अशोक महाराज बोंगाणे म्हणाले, “अध्यात्म, निसर्ग आणि विज्ञान या तीन गोष्टींचे…

Read More

CBSE 12th Re-evaluation Deadline Extended to June 7

नवी दिल्ली56 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CBSE ने 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जूनवरून वाढवून 7 जून केली आहे. बोर्डानुसार, हा निर्णय विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यासाठी आणि पोर्टलवर आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. CBSE ने 2 जून रोजी निकालानंतरच्या समस्यांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले होते. त्यानंतर…

Read More

पर्यावरण संवर्धन दुर्लक्षाविरोधात 20 संस्था तयार करणार दबावगट:पर्यावरण संवर्धनासाठी वज्रमूठ; 20 संस्थांचे 93 प्रतिनिधी आले एकत्र‎

राज्य सरकारने ३०० कोटी वृक्षलागवडीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. परंतु, सध्या उभ्या असलेल्या मोठ्या झाडांकडे वनविभाग, सामाजिक वनीकरण तसेच स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे पेटवून दिली जात आहेत. वृक्षसंवर्धन केवळ कागदाव . पर्यावरण संवर्धनात कसूर केल्यासविचारणार थेट जाब प्रशासकीय संस्थांकडून जर पर्यावरण संवर्धनात कसूर, केला जात असेल तर जिल्हास्तर समिती थेट…

Read More

महाराष्ट्र सरकार अत्यंत असंवेदनशील:प्रचंड घोडेबाजार होणार म्हणून पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून मविआची माघार- सुप्रिया सुळे

महाराष्ट्र सरकार हे कमालीचे असंवेदनशील असून ते राज्यातील जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. सध्या देश आणि महाराष्ट्र दोन्हीही मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून, आगामी काळात राज्यासमोर मोठी आर्थिक आव्हाने उभी ठाकणार आहेत. सरकारने इतर गोष्टींपेक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे….

Read More

मोदी सरकारने देश अमेरिका अन् दोन उद्योगपतींना विकला:मतदार यादीतून विशिष्ट समाजाची नावे वगळणे चुकीचे; 'एसआयआर' प्रक्रियेवर नाना पटोलेंचा आक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ज्यांना घाबरतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. देशासाठी काम करणाऱ्या लोकांना नजरकैदेत ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टींचे दिपके यांना चांगला पाठिंबा मिळत आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी देश विकला आहे. आपला रुपया मारला आहे. मोदी सरकार आल्यानंतर रुपयाची किंमत…

Read More