Headlines

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन:लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य; राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात हालचाली

राज्यातील बालविवाहाची कुप्रथा समूळ नष्ट करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यापुढे लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर (लग्नपत्रिका) वर आणि वधू या दोघांच्याही नावापुढे त्यांची अधिकृत जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सरकार संमत करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राजस्थान सरकारने हा नियम लागू…

Read More

हरियाणवी डान्सरवर हल्ला:दुचाकीस्वार तरुणांनी गाडीवर काठ्या मारल्या, रडत म्हणाली- निर्लज्जपणाची हद्द असते

हरियाणवी डान्सर डिंपल चौधरीवर उत्तर प्रदेशातील नोएडा येथे हल्ला झाला. तिचा दावा आहे की, दोन तरुणांनी काठीने मारून गाडीची पुढची काच फोडली. यापूर्वीही तिला फोनवर धमक्या मिळाल्या आहेत. डान्सरचे म्हणणे आहे की, ती या प्रकरणी नोएडा पोलिसांकडे तक्रार करेल. डिंपल चौधरीचा एक रडतानाचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात ती म्हणत आहे, “निर्लज्जपणाचीही एक मर्यादा असते….

Read More

निसर्गरम्य सह्याद्रीत अपघातांचे धोके वाढल्याने नियमावली जाहीर:रिल्स-सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नका, गिर्यारोहण महासंघाचे सुरक्षिततेचे आवाहन

मान्सूनच्या आगमनामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या असून, ओढे, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. हे विलोभनीय निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स सह्याद्रीकडे आकर्षित होतात. मात्र, पावसाळ्यात अपघातांचे धोकेही मोठ्या प्रमाणावर वाढतात. या पार्श्वभूमीवर, ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’ने पर्यटकांसाठी सुरक्षिततेचे आवाहन करत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी…

Read More

सोने ₹1,105 ने घसरून ₹1.44 लाखांवर आले:या महिन्यात सोने ₹12,573 स्वस्त झाले, चांदी आज ₹794 स्वस्त होऊन ₹2.27 लाख

सोने-चांदीच्या दरात २४ जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,१०५ रुपयांनी घसरून १.४४ लाख रुपयांवर आला आहे. यापूर्वी तो १.४५ लाखांवर होता. एक किलो चांदी ७९४ रुपयांनी घसरून २.२७ लाख रुपयांवर आली आहे. या महिन्यात सोन्याचे दर १२,५७३ रुपयांनी आणि चांदीचे दर ३,६६,६१…

Read More

स्मार्ट मीटरचा 40 हजार कोटींचा बोजा ग्राहकांवर: समितीचा आरोप:नागपुरात उद्या महावितरण कार्यालयावर विशाल मोर्चा

राज्यात लागू होणाऱ्या स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजनेचा 40 हजार कोटींचा खर्च सामान्य ग्राहकांकडून वसूल केला जाईल, असा आरोप नागरी संघर्ष समितीचे संयोजक मोहन शर्मा यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित 16 हजार कोटी रुपयांचा थेट भार जनतेवर पडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या सक्तीविरोधात उद्या, गुरुवारी (25) नागपुरात महावितरणच्या कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात…

Read More

लग्नाला नकार दिल्यावर हनीमूनचे डीपफेक फोटो बनवले:एका दिवसात 500 टॅक्सी घरी पाठवल्या; डोहाळे जेवणाचे बनावट कार्ड वाटले

भोपाळच्या एका युवतीसाठी उदयपूरच्या युवकाचं लग्नाचं स्थळ नाकारणं संकट बनलं. युवतीने युवकावर तिला आणि कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप केला आहे. युवतीचं म्हणणं आहे की, युवकाने तिचे बनावट फोटो बनवले, बनावट लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटली आणि ऑनलाइन कॅब बुकिंग करून तिला सतत त्रास दिला. जवळपास एक वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकरणाची तक्रार आता महिला आयोगापर्यंत पोहोचली…

Read More

शेतीला पाणी देण्यावरून ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला:लोणीकंद परिसरात चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीला पाणी देण्यावरून झालेल्या वादातून एका 61 वर्षीय ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. या प्रकरणी जखमी जालिंदर नामदेव नागवडे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांचा चुलतभाऊ सुधीर सुरसिंग नागवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेबोल्हाईतील शिरसवाडी येथे नागवडे कुटुंबीयांची शेतजमीन आहे….

Read More

एअर इंडियाचे विमान पाक हवाई हद्दीत घुसले:दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण, तांत्रिक बिघाडामुळे मार्ग चुकला, पाकिस्तानने इशारा देऊन परत पाठवले

एअर इंडियाचे एक विमान सोमवारी रात्री मार्ग भरकटून पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसले. पाकिस्तानच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने (Air Traffic Authority) त्याला इशारा देऊन परत पाठवले. विमानाने दिल्लीतून उड्डाण केले होते आणि ते अमृतसरला उतरणार होते. पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून विमान परत आले तोपर्यंत अमृतसर विमानतळावर वाहतूक वाढली होती, त्यामुळे ते परत दिल्लीला पाठवण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले…

Read More

शिंदे गटात जाण्याची प्लॅनिंग महिनाभरापासून सुरू होती:ओमराजे निंबाळकर खोटं बोलल्याचा भावाचा दावा; अर्चना पाटलांनीही दिली तिखट प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या या नव्या राजकीय वाटचालीला एकीकडे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या पाटील कुटुंबाकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे, तर दुसरीकडे खुद्द त्यांच्या घरातूनच, म्हणजेच त्यांच्या सख्ख्या चुलत भावाकडून या बंडाला कडाडून विरोध झाला आहे. ओमराजेंच्या घरातूनच…

Read More

शिवसेना एकत्रिकरणाच्या विधानापूर्वी बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली का?:शिंदेंची संमती असेल तर दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी आम्हीही प्रयत्न करू- भाजप

बच्चू कडू यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्या असे वाटत असेल हे विधान करण्यापूर्वी कडू यांनी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली आहे का? दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असे जर एकनाथ शिंदे यांना वाटत असेल तर त्यासाठी आम्ही देखील पुढाकार घेऊ, आमचीदेखील दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी आहे. पण बच्चू कडू यांनी असे विधान करण्यापूर्वी…

Read More