बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन:लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य; राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात हालचाली
राज्यातील बालविवाहाची कुप्रथा समूळ नष्ट करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यापुढे लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर (लग्नपत्रिका) वर आणि वधू या दोघांच्याही नावापुढे त्यांची अधिकृत जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सरकार संमत करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राजस्थान सरकारने हा नियम लागू…