मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचे बंड शमले:मुलाचा अर्ज मागे घेणार, म्हणाले – यापुढे त्रास होणार नाही याची गॅरंटी दिली
गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तोफ डागणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये होणारा त्रास यापुढे होणार नाही, याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सत्तार यांनी आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शिवसेनेचे सहा आमदार आणि खासदारांनी महायुतीमध्ये एकजुटीने राहावे, असा आदेश उपमुख्यमंत्री…