Headlines

अब्दुल सत्तारांची व्यथा खरी:संजय गायकवाडांनी महायुतीला दिला घरचा आहेर, म्हणाले- माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत. छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषदेची जागा ही भाजपला सुटल्याने शिवसेना शिंदे गटातून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलाचा म्हणजे समीर सत्तारचा उमेदवारीचा…

Read More

शिंदे गटाला पश्चाताप झाला असेल तर 'मातोश्री'वर यावे:शिंदे गट आमचा मुख्य शत्रू, पण भाजप काही दानशूर नाही; संजय राऊतांचा दोन्ही पक्षांवर जोरदार प्रहार

उबाठाचा पहिल्या क्रमाकांचा शत्रू हा शिंदे गट आहे. याचा अर्थ असा नाही की भाजप काही दानशूर पक्ष आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दोन्ही शिवसेना एकत्र यावे असे मत व्यक्त करत असाल तर आम्ही मातोश्रीवर बसलो आहोत. तुम्हाला पश्चताप झाला असेल तर तो व्यक्त करण्याची जागा ही मातोश्री हे निवासस्थान आहे. ज्या…

Read More

बंगाल- बंडखोर TMC आमदार ऋतब्रत-संदीपन विधानसभेत पोहोचले:50 आमदार सोबत असल्याचा दावा, अध्यक्षांना भेटू शकतात, TMC चिन्हाची मागणी

ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) दोन गटांमध्ये विभागला जाऊ शकतो. TMC मधून काढलेले 2 आमदार संदीपन साहा आणि ऋतब्रत बॅनर्जी बुधवारी कोलकाता येथे विधानसभेत पोहोचले. पक्षाच्या 80 पैकी 50 आमदार नवीन गटासोबत असल्याचा दावा केला जात आहे. संदीपन आणि ऋतब्रत आज अध्यक्षांना भेटू शकतात. ते त्यांच्यासमोर तीन मुद्दे मांडतील. पहिला- आम्हीच खरे तृणमूल काँग्रेस…

Read More

नागरिकांचा संताप:टाकरखेडा संभूत पाणीटंचाई; नवीन जलकुंभ अद्याप बंदच, समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा‎

येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकरखेडा संभूचा समावेश असला तरी नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच निकट भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या…

Read More

वयोवृद्धाला लुटणारा एलसीबीच्या जाळ्यात:दुचाकीवर लिफ्ट देवून पळवली होती रक्कम‎

वरुड पोलिस ठाणे हद्दीतील राजुरा बाजार येथे एका ७३ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला दुचाकीवर लिफ्ट देवून त्यांच्याकडील रोख घेवून पोबारा ठोकणारा एक लूटारु एलसीबीने पकडला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी व रोख रक्कम जप्त केली . मनीष अनिल जोशी (३३, रा. पार्वती नगर अमरावती, ह.मु. यश कॉलनी, टॉवर लाईन, अमरावती) असे अटक केलेल्या लूटारुचे…

Read More

नाशिक विधान परिषद निवडणूक:25 काेटी मालमत्ता असलेल्या दराडेंना 100 काेटीपार तीन उमेदवारांचे आव्हान, गणेश गिते 177, गोकुळ गिते 149, कोकणी 109 कोटींचे मालक

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळीत उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून संपत्तीचे डोळे दीपवणारे आकडे समोर आले आहेत. या निवडणुकीत शेती आणि व्यवसायातून कोट्यवधींची कमाई असलेले ‘धनदांडगे’ उमेदवार रिंगणात उतरल्याचे विवरण पत्रांवरून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत राजकीय ताकदीबरोबरच ‘आर्थिक’ ताकदीचीही मोठी चर्चा रंगत आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार आणि माजी आमदार नरेंद्र…

Read More

एमपी-यूपीसह 11 राज्यांमध्ये वादळी पाऊस:आग्रामध्ये रस्ते-फुटपाथ खचले, कार-ट्रॅक्टर खड्ड्यात उलटले; जम्मू-काश्मीरमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी झाली

देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तापमान 40°C च्या खाली आले आहे. मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये पाऊस झाला. यूपीमधील आग्रा येथे सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते आणि पदपथ खचले. यात ट्रॅक्टर-ट्रॉली, कार आणि ट्रक उलटले. एमपीमधील सिंगरौली येथे वीज कोसळल्याने एका किशोरवयीन मुलाचा,…

Read More

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट; मराठवाड्यासह अनेक भागात पावसाचा जोर वाढणार

राज्यातील जनतेला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला असून, सध्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर तो हळूहळू पुढे सरकेल. मान्सून दाखल होण्यापूर्वीच कोकण आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्याच्या अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, तापमानाचा विचार करता राज्यात सर्वाधिक…

Read More

राखेच्या धुळीने मासोद गावचा श्वास गुदमरला:आरोग्यासह पर्यावरण धोक्यात; ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनास दिले निवेदन‎

मासोद गावात गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरून आणून टाकण्यात येणाऱ्या राखेमुळे येथील नागरिकांचे जीवन अक्षरशः धुळीला मिळाले आहे. राखेच्या प्रचंड प्रदूषणामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. या विरोधात आता मासोदकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास ६ जूनपासून तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाच्या परिसरात मोठ्या…

Read More

चिमुकलीला पत्र्याच्या शेडमध्ये नेत असताना फटीतून पाहिले:आम्हाला बघून त्याने दगड मारले, नसरापूर प्रकरणी तीन मुलांची महत्त्वाची साक्ष

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, आरोपीवर दोषनिश्चिती करण्यात आली आहे. या खटल्यात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली असून, घटनेच्या वेळी आरोपीला पीडित चिमुकलीसोबत पत्र्याच्या शेडमध्ये जाताना पाहणाऱ्या तीन मुलांनी न्यायालयात निर्भीडपणे आपली साक्ष नोंदवली आहे. विशेष म्हणजे, या धाडसी मुलांनी येरवडा कारागृहात झालेल्या ओळख…

Read More